शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

ठराव झाला, धोरण निश्चित, मात्र गाळे कारवाई का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेची सर्व आर्थिक परिस्थिती ही केवळ गाळे प्रश्नावर अवलंबून असून, गाळे प्रश्न मार्गी लागला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेची सर्व आर्थिक परिस्थिती ही केवळ गाळे प्रश्नावर अवलंबून असून, गाळे प्रश्न मार्गी लागला तरच मनपाची आर्थिक परिस्थिती सावरेल, असे मत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी अंदाजपत्रक सादर करताना व्यक्त केले होते. या प्रश्नावर आता मनपाने धोरण निश्चित करून, तसा ठरावदेखील सत्ताधाऱ्यांनी महासभेत बहूमताने मंजूर केला आहे; मात्र धोरण निश्चित करून, ठराव करून दीड महिन्यांपेक्षा अधिकचा वेळ होऊनही मनपा प्रशासन गाळे प्रश्नावर अजूनही कारवाई किंवा लिलाव करण्यास अपयशी ठरलेले दिसून येत आहे.

गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मालकी असलेल्या राजकमल चौक परिसरातील १८ मुदत संपलेले गाळे जिल्हा परिषदेने सील करून, ताब्यात घेतले आहेत. तीन वर्षांपूर्वीचा प्रश्न जिल्हा परिषदेने सोडविला असून, तब्बल ९ वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला गाळे प्रश्न मात्र मनपा प्रशासनाला सोडविता आलेला नाही. याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत. याच विषयावर मनपाची सर्व आर्थिक परिस्थिती अवलंबून आहे. याच विषयामुळे मनपाला शहरातील नागरिकांना सुविधा देण्यात अडथळे निर्माण होत आहेत. असे असतानाही आता मनपाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाडे वसुलीसह गाळे ताब्यात घेण्याची कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

ठरावाला केवळ ३५ जणांनी दिला पाठिंबा

१२ मे रोजी झालेल्या महासभेत गाळे प्रश्नाबाबत मनपाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला महासभेत मंजुरी मिळाली होती; मात्र ऑनलाइन सभेत हा विषय घेण्यात येवू नये, अशी भूमिका भाजपच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी घेतली होती, तसेच सेनेकडून ४२ जणांचा पाठिंबा असल्याचे सांगत हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता; मात्र या प्रस्तावाला केवळ ३५ जणांनी पाठिंबा दिला असून, सेना व बंडखोर नगरसेवकांमधील अनेक नगरसेवकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचे दिसून येत नाही. दरम्यान, ऑनलाइन सभेत त्यावेळी ५३ जण उपस्थित असल्याचे दिसून येत होते. तर काही जण कनेक्ट होऊ शकले नव्हते. या ठरावामुळेदेखील मनपाने कारवाई थांबवली आहे का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.

भाजपकडूनही प्रस्ताव नाही

महासभेत हा ठराव बहुमताने मंजूर केल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी ऑनलाइन महासभेत पूर्ण बहुमत नसल्याचे सांगत हा विषय प्रलंबित ठेवण्याची मागणी केली होती. हा ठराव मंजूर झाला तर न्यायालयात जाण्याचा इशारा भाजप सदस्यांनी दिला होता; मात्र दीड महिन्यात भाजपनेदेखील याप्रकरणी न्यायालयात धाव घेतलेली नाही. त्यामुळे भाजपनेदेखील या ठरावाला अप्रत्यक्ष पाठिंबाच दिल्याचे दिसून येत आहे.

जि.प.करू शकते, मग मनपा का नाही?

गाळे प्रश्नावर जिल्हा परिषद प्रशासनाने ज्या प्रकारे कारवाई केली आहे, त्या प्रकारे मनपा प्रशासन का कारवाई करत नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष जि.प.मालकीच्या गाळ्यांबाबतच्या प्रश्नावर जि.प.चे कोणतेही आर्थिक गणित फारसे अवलंबून नव्हते. तरी जि.प.ने याप्रकरणी कारवाई केली; मात्र मनपा प्रशासनाला आता कारवाई करण्यास नेमका काय अडथळा आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.