शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

साडेसात कोटींची वसुली पुन्हा थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:27 IST

जळगाव : जिल्ह्यातील तब्बल ७१६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांवर योजनांमधील अपहारांबाबत लेखापरीक्षकांनी जबाबदारी निश्चित केली आहे. मात्र, वर्षानुवर्षे केवळ ...

जळगाव : जिल्ह्यातील तब्बल ७१६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांवर योजनांमधील अपहारांबाबत लेखापरीक्षकांनी जबाबदारी निश्चित केली आहे. मात्र, वर्षानुवर्षे केवळ चालढकल कारभारामुळे साडेसात कोटी रुपयांची रक्कम वसूल होत नसल्याचे गंभीर चित्र जिल्हा परिषदेत आहे. वारंवार सभांमध्ये सदस्य विषय काढतात, संताप व्यक्त करतात. मात्र, त्यांच्या संतापाला व विषयाला केराची टोपली दाखविली जात आहे.

जिल्ह्यातील पाच ग्रामसेवकांना दप्तर न दिल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी थेट गजाआड केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करावी लागते, तोपर्यंत स्थानिक जि.प. प्रशासन व ग्रामपंचायत विभागाकडून कारवाई का झाली नाही, असा प्रश्न सदस्यांनी सभेत उपस्थित केला होता. शिवाय वर्षानुवर्षांची थकलेली अपहार वसुली याबाबत ग्रामपंचायत विभागाने काय केले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

केवळ नोटिसा, पुढे काय

ग्रामपंचायत विभाग केवळ नोटीस व पत्र देऊन विषय सोडून देत असल्याने ही वर्षानुवर्षे ही मोठी रक्कम वसूल झालेली नाही. यात अनेक योजना बंद झालेल्या आहेत. ज्यांच्यावर जबाबदारी निश्चित आहे. ते ग्रामसेवक हयात आहेत किंवा नाही, हादेखील डाटा विभागाकडे नाही. शिवाय ग्रामविकास निधीबाबत दुसऱ्यांदा नोटीस देऊनही काही ग्रामसेवक जुमानतच नसल्याने ग्रामपंचायत विभागाने आता त्यांच्याकडून येईल तेव्हा खुलासा स्वीकारायचा अशी थंड भूमिका घेतल्याचे चित्र आहे.