शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सन्मानाने जगण्याची उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 15:46 IST

आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला समाजात सन्मानाने जगता यावे, घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबाची होणारी परवड थांबावी म्हणून महाराष्ट्रात एकमेव नाशिक विभागात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अभिनव ह्यउभारीह्ण संकल्पना अमलात आणली असून त्याचे सकारात्मक परिणामदेखील जाणवू लागले आहेत

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला समाजात सन्मानाने जगता यावे, घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबाची होणारी परवड थांबावी म्हणून महाराष्ट्रात एकमेव नाशिक विभागात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अभिनव ह्यउभारीह्ण संकल्पना अमलात आणली असून त्याचे सकारात्मक परिणामदेखील जाणवू लागले आहेतकर्जबाजारी झाल्याने किंवा निसर्गाने तोंड फिरवल्याने मोठा आर्थिक फटका बसला की अनेक शेतकरी आत्महत्या करतात. शासन राजकीय आणि सामाजिक नेते तेवढ्यापुरते सहानुभूती दाखवून मदतीचे आश्वासन देऊन निघून जातात. नंतर मात्र प्रत्यक्ष अर्ज करण्याससुद्धा मदत केली जात नाही एव्हडी हेळसांड त्या कुटुंबाची होते. अगदी शासकीय पातळीवरदेखील तलाठी किंवा इतर अधिकारी साधा वारस लावण्यासाठी मदतीऐवजी फिरवाफिरव करून अनेकदा त्यांची आर्थिक लूट केल्याचेही उघडकीस आले आहे. समाजात या कुटुंबाची पत रहात नाही म्हणून आयुक्त गमे यांनी या पीडितांच्या व्यथा जाणून त्यांच्याबद्दलची सहानुभूती जागृत करून त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, स्वावलंबी व्हावे म्हणून उभारी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.उभारी योजनेंतर्गत गमे यांनी महसूल विभागातील पालक अधिकारी नेमले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तेथे पालक अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब यांचे सर्वेक्षण करायचे त्या त्या कुटुंबाची जबाबदारी पालक अधिकाऱ्यांकडे दिली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या पीडित नागरिकांच्या प्रती वर्तणुकीतदेखील आपोआप बदल होऊ लागले आहेत.पालक अधिकाऱ्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला महसूल विभाग, पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी सोडवायच्या आहेत त्यांच्या वारसांना कागदोपत्री सर्व मदत व सहकार्य करायचे आहे त्या कुटुंबाना संजय गांधी, इंदिरा गांधी, कुटुंब अर्थसहाय्य, प्राधान्य कुटुंब योजना यात जेथे पात्र ठरतील त्याचा लाभ देणे तसेच बांधावरील वृक्ष लागवड, घरकुल योजना, गोठा शेड, कृषी विभागाच्या फळबाग योजना, बियाणे, अवजार वाटप यात लाभ व रोजगार मिळवून देणे आदी कामे करायची असून विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन त्या पीडित कुटुंबातील मुलांचे शिक्षण, नोकरी यासाठी मदत मिळवून द्यायची आदी जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याने पालक अधिकारी कामास लागले आहेत. अमळनेर तालुक्यात ५१ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करून एक कुटुंबातील मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध करून दिला आहे तर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील स्थानिक प्रांत व तहसीलदार या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला उभारी देण्याचे काम निव्वळ नाशिक विभागात केले जात आहे ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे. गमे यांचा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात राबवला गेल्यास खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे तर भ्रष्टाचाराचा बट्टा लागलेले महसूल कर्मचारी संपूर्ण राज्यात आदर्श ठरतील.आयुक्त गमे यांच्या उभारी संकल्पनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये सेवाभावी वृत्ती वाढली आहे. निराधार कुटुंबाला मदत करून त्यांच्या जीवनाची दिशा बदलल्याचे समाधान देखील मिळत आहे.-मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार,अमळनेर

टॅग्स :GovernmentसरकारAmalnerअमळनेर