शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भाजीपाल्याच्या भावात होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या चांगला पाऊस होत असल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे, मात्र या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या चांगला पाऊस होत असल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे, मात्र या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन त्यांचे भाव वाढत आहेत. दुसरीकडे घसरण झालेल्या खाद्यतेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून डाळींचेही भाव काहीसे वधारले आहेत.

पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली होती. मात्र या काळात पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक चांगली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून पाऊस होत असल्याने त्याचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन भाव पुन्हा वाढत आहे. दुसरीकडे खाद्यतेलाच्या भावात काहीशी वाढ झाली आहे. मध्यंतरी १४० रुपयांवर आलेले सोयाबीन तेल पुन्हा १४५ रुपये, शेंगदाणा तेल १५० रुपयांवरून १६० रुपये, सूर्यफूल तेल १४० वरून १४७, तर पाम तेल १२० वरून १२६ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.

डाळीतही वाढ

मध्यंतरी घसरण झालेल्या डाळींच्या भावात थोडी वाढ झाली आहे. यात तूरडाळ ९० ते ९४ रुपये, मूगडाळ ८५ ते ९० रुपये, उडीदडाळ ८५ ते ९० रुपये, हरभरा डाळ ६२ ते ६६ रुपये, मसूर डाळ ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. यामध्ये बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रति किलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रति किलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये, तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रति किलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहेत.

कोथिंबीर ८० रुपयांवर

पावसाचा हिरव्या पालेभाज्यांवर परिणाम झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांचे भाव वाढले आहेत. यामध्ये कोथिंबीरचे भाव ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तसेच मेथीदेखील ८० रुपये प्रति किलोवर तर पालक ७० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

हिरवी मिरची ६० रुपयांवर

हिरव्या मिरचीचेदेखील भाव वधारले असून ती ४० रुपयांवरून ६० रुपयांवर पोहोचली आहे. टमाटेदेखील ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. लिंबू ४० रुपये, बटाटे २० रुपये प्रति किलो तर कांद्याचे भाव अजूनही ३० रुपये प्रति किलोवर आहेत. लसूण १५० ते २०० रुपयांवर आहे.

भाजीपाल्याचे भाव वाढतच आहे. यात खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते, मात्र आता ते पुन्हा वाढल्याने महागाईच्या झळाही वाढत आहेत.

- युवराज जाधव, ग्राहक

खाद्यतेलाचे भाव मध्यंतरी कमी होते, मात्र आता ते काहीसे वाढले असून डाळींच्याही भावात काहीशी वाढ झाली आहे. तशी ग्राहकही अजून कमीच आहेत.

- राजेश वाणी, व्यापारी

पाऊस होत असल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढत आहे. कांदे, बटाटे मात्र स्थिर आहेत.

- अरुण गायकवाड, भाजीपाला विक्रेते