शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पावसामुळे भाजीपाल्याच्या भावात होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या चांगला पाऊस होत असल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे, मात्र या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या चांगला पाऊस होत असल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे, मात्र या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन त्यांचे भाव वाढत आहेत. दुसरीकडे घसरण झालेल्या खाद्यतेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून डाळींचेही भाव काहीसे वधारले आहेत.

पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली होती. मात्र या काळात पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक चांगली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून पाऊस होत असल्याने त्याचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन भाव पुन्हा वाढत आहे. दुसरीकडे खाद्यतेलाच्या भावात काहीशी वाढ झाली आहे. मध्यंतरी १४० रुपयांवर आलेले सोयाबीन तेल पुन्हा १४५ रुपये, शेंगदाणा तेल १५० रुपयांवरून १६० रुपये, सूर्यफूल तेल १४० वरून १४७, तर पाम तेल १२० वरून १२६ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.

डाळीतही वाढ

मध्यंतरी घसरण झालेल्या डाळींच्या भावात थोडी वाढ झाली आहे. यात तूरडाळ ९० ते ९४ रुपये, मूगडाळ ८५ ते ९० रुपये, उडीदडाळ ८५ ते ९० रुपये, हरभरा डाळ ६२ ते ६६ रुपये, मसूर डाळ ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. यामध्ये बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रति किलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रति किलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये, तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रति किलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहेत.

कोथिंबीर ८० रुपयांवर

पावसाचा हिरव्या पालेभाज्यांवर परिणाम झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांचे भाव वाढले आहेत. यामध्ये कोथिंबीरचे भाव ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तसेच मेथीदेखील ८० रुपये प्रति किलोवर तर पालक ७० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

हिरवी मिरची ६० रुपयांवर

हिरव्या मिरचीचेदेखील भाव वधारले असून ती ४० रुपयांवरून ६० रुपयांवर पोहोचली आहे. टमाटेदेखील ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. लिंबू ४० रुपये, बटाटे २० रुपये प्रति किलो तर कांद्याचे भाव अजूनही ३० रुपये प्रति किलोवर आहेत. लसूण १५० ते २०० रुपयांवर आहे.

भाजीपाल्याचे भाव वाढतच आहे. यात खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते, मात्र आता ते पुन्हा वाढल्याने महागाईच्या झळाही वाढत आहेत.

- युवराज जाधव, ग्राहक

खाद्यतेलाचे भाव मध्यंतरी कमी होते, मात्र आता ते काहीसे वाढले असून डाळींच्याही भावात काहीशी वाढ झाली आहे. तशी ग्राहकही अजून कमीच आहेत.

- राजेश वाणी, व्यापारी

पाऊस होत असल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढत आहे. कांदे, बटाटे मात्र स्थिर आहेत.

- अरुण गायकवाड, भाजीपाला विक्रेते