शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

पावसामुळे भाजीपाल्याच्या भावात होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या चांगला पाऊस होत असल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे, मात्र या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या चांगला पाऊस होत असल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे, मात्र या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन त्यांचे भाव वाढत आहेत. दुसरीकडे घसरण झालेल्या खाद्यतेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून डाळींचेही भाव काहीसे वधारले आहेत.

पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली होती. मात्र या काळात पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक चांगली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून पाऊस होत असल्याने त्याचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन भाव पुन्हा वाढत आहे. दुसरीकडे खाद्यतेलाच्या भावात काहीशी वाढ झाली आहे. मध्यंतरी १४० रुपयांवर आलेले सोयाबीन तेल पुन्हा १४५ रुपये, शेंगदाणा तेल १५० रुपयांवरून १६० रुपये, सूर्यफूल तेल १४० वरून १४७, तर पाम तेल १२० वरून १२६ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.

डाळीतही वाढ

मध्यंतरी घसरण झालेल्या डाळींच्या भावात थोडी वाढ झाली आहे. यात तूरडाळ ९० ते ९४ रुपये, मूगडाळ ८५ ते ९० रुपये, उडीदडाळ ८५ ते ९० रुपये, हरभरा डाळ ६२ ते ६६ रुपये, मसूर डाळ ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. यामध्ये बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रति किलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रति किलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये, तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रति किलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहेत.

कोथिंबीर ८० रुपयांवर

पावसाचा हिरव्या पालेभाज्यांवर परिणाम झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांचे भाव वाढले आहेत. यामध्ये कोथिंबीरचे भाव ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तसेच मेथीदेखील ८० रुपये प्रति किलोवर तर पालक ७० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

हिरवी मिरची ६० रुपयांवर

हिरव्या मिरचीचेदेखील भाव वधारले असून ती ४० रुपयांवरून ६० रुपयांवर पोहोचली आहे. टमाटेदेखील ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. लिंबू ४० रुपये, बटाटे २० रुपये प्रति किलो तर कांद्याचे भाव अजूनही ३० रुपये प्रति किलोवर आहेत. लसूण १५० ते २०० रुपयांवर आहे.

भाजीपाल्याचे भाव वाढतच आहे. यात खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते, मात्र आता ते पुन्हा वाढल्याने महागाईच्या झळाही वाढत आहेत.

- युवराज जाधव, ग्राहक

खाद्यतेलाचे भाव मध्यंतरी कमी होते, मात्र आता ते काहीसे वाढले असून डाळींच्याही भावात काहीशी वाढ झाली आहे. तशी ग्राहकही अजून कमीच आहेत.

- राजेश वाणी, व्यापारी

पाऊस होत असल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढत आहे. कांदे, बटाटे मात्र स्थिर आहेत.

- अरुण गायकवाड, भाजीपाला विक्रेते