शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भाजीपाल्याच्या भावात होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या चांगला पाऊस होत असल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे, मात्र या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या चांगला पाऊस होत असल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे, मात्र या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन त्यांचे भाव वाढत आहेत. दुसरीकडे घसरण झालेल्या खाद्यतेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून डाळींचेही भाव काहीसे वधारले आहेत.

पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली होती. मात्र या काळात पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक चांगली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून पाऊस होत असल्याने त्याचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन भाव पुन्हा वाढत आहे. दुसरीकडे खाद्यतेलाच्या भावात काहीशी वाढ झाली आहे. मध्यंतरी १४० रुपयांवर आलेले सोयाबीन तेल पुन्हा १४५ रुपये, शेंगदाणा तेल १५० रुपयांवरून १६० रुपये, सूर्यफूल तेल १४० वरून १४७, तर पाम तेल १२० वरून १२६ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.

डाळीतही वाढ

मध्यंतरी घसरण झालेल्या डाळींच्या भावात थोडी वाढ झाली आहे. यात तूरडाळ ९० ते ९४ रुपये, मूगडाळ ८५ ते ९० रुपये, उडीदडाळ ८५ ते ९० रुपये, हरभरा डाळ ६२ ते ६६ रुपये, मसूर डाळ ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. यामध्ये बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रति किलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रति किलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये, तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रति किलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहेत.

कोथिंबीर ८० रुपयांवर

पावसाचा हिरव्या पालेभाज्यांवर परिणाम झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांचे भाव वाढले आहेत. यामध्ये कोथिंबीरचे भाव ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तसेच मेथीदेखील ८० रुपये प्रति किलोवर तर पालक ७० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

हिरवी मिरची ६० रुपयांवर

हिरव्या मिरचीचेदेखील भाव वधारले असून ती ४० रुपयांवरून ६० रुपयांवर पोहोचली आहे. टमाटेदेखील ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. लिंबू ४० रुपये, बटाटे २० रुपये प्रति किलो तर कांद्याचे भाव अजूनही ३० रुपये प्रति किलोवर आहेत. लसूण १५० ते २०० रुपयांवर आहे.

भाजीपाल्याचे भाव वाढतच आहे. यात खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते, मात्र आता ते पुन्हा वाढल्याने महागाईच्या झळाही वाढत आहेत.

- युवराज जाधव, ग्राहक

खाद्यतेलाचे भाव मध्यंतरी कमी होते, मात्र आता ते काहीसे वाढले असून डाळींच्याही भावात काहीशी वाढ झाली आहे. तशी ग्राहकही अजून कमीच आहेत.

- राजेश वाणी, व्यापारी

पाऊस होत असल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढत आहे. कांदे, बटाटे मात्र स्थिर आहेत.

- अरुण गायकवाड, भाजीपाला विक्रेते