शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

रेल्वे स्टेशन लॉकडाउन, अनेकांचा रोजगार हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 14:48 IST

भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर शुकशुकाट असून फलाटांवर खाद्यपदार्थाची विक्री करणाºया हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानकावर शुकशुकाटफलाटांवर सुमारे तिनशेपेक्षा जास्त खाद्यपदार्थ विक्रेतेखाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या हातमजुरांवर उपासमारीची वेळ

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : कोरोनाची प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने प्रवासी रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर शुकशुकाट असून फलाटांवर खाद्यपदार्थाची विक्री करणाºया हातमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.भुसावळ विभागात भुसावळ रेल्वेस्थानकावर दररोज १८० पेक्षा जास्त प्रवासी गाड्यांची ये-जा करतात. स्थानकावरील फलाटांवर सुमारे तिनशेपेक्षा जास्त खाद्यपदार्थ विक्रेते आलेल्या प्रवासी गाड्यांवर दिवस-रात्र उभे पाय मेहनत करून कुटुंबियांसाठी पोटाचा प्रश्न सुटावा याकरिता दोन पैसे मिळावे या हेतूने डोळ्यात तेल ओतून अख्खी गाडी पिंजून काढायचे मात्र गेल्या २३ मार्चपासून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानक गाड्यांचे आगमन होत नसल्याने प्रवेशबंदी करण्यात आले असून कोणतीही प्रवासी गाडी येत नसल्याने स्थानकावरील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.रेल्वे स्थानकावर फूड प्लाझा, सेल किचन, फळांचे स्टॉल, खेळणीचे स्टॉल, तीन वॉटर वेंडिंग मशिन याद्वारे तिनशेपेक्षा जास्त मजूर चहा, वडापाव, स्नॅक्स, कोल्ड्रिंक विकून आपला उदरनिर्वाह भागवत होते.रेल्वेस्थानकाबाहेरील व्यावसायिकांनी वरही उपासमारीची वेळस्थानकावरील जी स्थिती हातमजुरांची आहे ती स्थिती रेल्वेस्थानकाच्या बाहेरील असलेले छोटे-मोठे उद्योगधंदे चहा, फराळाचे दुकाने बंद पडल्यामुळे रेल्वेच्या आवारातसुद्धा असलेले दुकान बंद असल्याने सुमारे आठशेपेक्षा जास्त विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.रेल्वेच्या प्रवाशांचे ओझे वाहून नेणारे कुलीसुद्धा रेल्वे बंद असल्यामुळे अडचणीत आले आहेत. रेल्वे अवलंबून असणारे हमाल, आॅटो चालक, चहापान हमालांची स्थावर मालमत्ता नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व तळागाळातील जीवन जगत होते. उदरनिर्वाह कसा चालवावा याची त्यांना चिंता सतावत आहे. कोरोनामुळे यांना चांगलाच फटका बसलाय. प्रशासनाने रेल्वेस्थानकावरील हातावरच्या मजुरांची उदरनिवार्हाची व्यवस्था करावी. विशेषत: ज्या मक्तेदारांकडे मजूरवर्ग कामावर होते त्यांनी तरी निदान या परिस्थितीमध्ये त्यांना आर्थिक सहकार्यातूून जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.लॉकडाऊन नंतर प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी आतापासूनच नियोजन हवेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत पहिले लॉकडाऊन व १५ एप्रिल ते ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविले. परिस्थिती आटोक्यात असली तर दुसरे लावून जर तीन महिन्यानंतर उघडलेस तर रेल्वे स्थानकावर येणाºया प्रत्येक प्रवाशांची आरोग्य तपासणी वावी व प्रवास सुरक्षित व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले तर येणारा काळामध्ये कोरोनाचा धोका टळू शकतो मात्र यासाठी चोख नियोजन हवे आहे नाहीतर ‘प्यास लगी तब खोदा कुवा’ असे व्हायला नको यावर गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.लॉकडाऊन झाल्यापासून रेल्वेस्थानकावरील हातावर पोट भरणारे वेंडर्सवर उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वेला सेवा बजावणाºया वेंडर्सकडे लक्ष द्यावे. ज्याप्रमाणे कुली बांधवांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली निदान तेवढे तरी मदत करावी, उभ्या आयुष्यापासून रेल्वेसाठी सेवा बजावत आहेत.-कय्युम खाटीक, सचिव, रेल्वे वेंडर्स असोसिएशन, भुसावळ