शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

रेल्वे प्रशासनातर्फे गांधीधाम, पोरबंदर, राजकोटसाठी विशेष साप्ताहिक गाड्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:15 IST

सुविधा : जळगावला थांबा असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी येत्या १६ ...

सुविधा : जळगावला थांबा असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी येत्या १६ एप्रिलपासून गांधीधाम - पुरी, पोरबंदर - संत्रागाची व राजकोट ते रेवा दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व साप्ताहिक गाड्यांना जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे मर्यादित गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून १६ एप्रिलपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये दर शुक्रवारी (गाडी क्रमांक ०९४९३) गांधीधाम ते पुरी दरम्यान धावणार असून, परतीच्या प्रवासासाठी (गाडी ०९४९४) ही दर सोमवारी पुरीहून गांधीधामकडे रवाना होणार आहे. तसेच १६ एप्रिल रोजीच पोरबंदर ते संत्रागाची दरम्यान (गाडी क्रमांक ०९०९३) दर शुक्रवारी धावणार असून, परतीच्या प्रवासासाठी (गाडी क्रमांक ०९०९४) ही संत्रागाचीहून दर रविवारी पोरबंदरकडे रवाना होणार आहे. त्यानंतर राजकोट ते रेवा दरम्यान ११ एप्रिल रोजी (गाडी क्रमांक ०९२३७) ही दर रविवारी धावणार आहे तर परतीच्या प्रवासासाठी (गाडी क्रमांक ०९२३८) ही दर सोमवारी रेवाहून राजकोटकडे रवाना होणार आहे. दरम्यान, या सर्व साप्ताहिक गाड्यांना जळगावला थांबा देण्यात आला असून, गाड्यांच्या वेळाबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

इन्फो :

तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश

रेल्वे प्रशासनातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या साप्ताहिक गाड्यांनाही तिकीट आरक्षण सक्तीचे केले आहे. तिकीट आरक्षित असेल तरच गाडीत प्रवेश देण्यात येणार आहे. या गाड्यांना जनरल तिकीट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जे प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळतील, त्यांच्यावर रेल्वे प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे.

इन्फो :

कुशीनगर एक्स्प्रेस तीन दिवस बंद

कुशीनगर एक्स्प्रेसचा १३ एप्रिलपासून गाडी क्रमांक बदलणार असल्याने, रेल्वे प्रशासनातर्फे ही गाडी ९ ते १२ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली असून, ही गाडी यापुढे सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावणार असल्याचेही रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.