शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जून अखेर भुसावळला ‘रेल नीर’ प्रकल्प सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

सहायक महाव्यवस्थापकांची माहिती : प्रकल्पात स्थानिक युवकानांच रोजगार देणार सचिन देव जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत ‘रेल नीर’ प्रकल्प ...

सहायक महाव्यवस्थापकांची माहिती : प्रकल्पात स्थानिक युवकानांच रोजगार देणार

सचिन देव

जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत ‘रेल नीर’ प्रकल्प उभारण्यात येत असून, हे काम वेगाने सुरू आहे. या वर्षी जूनअखेर हा प्रकल्प सुरू होणार असून, या

प्रकल्पात स्थानिक युवकांनाच रोजगार देण्यात येणार असल्याची माहिती आयआरटीसीचे सहायक महाव्यवस्थापक आनंद झा यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मार्फत भुसावळला गेल्या दीड वर्षांपासून रेल्वे नीर प्रकल्पाचे काम सुरू आहे. सध्या हे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. भुसा‌वळातील एमआयडीसीत हा प्रकल्प उभारला जात असून, हैदराबाद येथील हायमॅक्स कंपनीतर्फे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मशिनरींची उभारणी करण्यात येत आहे. ८ हजार ५५० चौरस मीटरमध्ये या प्रकल्पाचे काम असून, यासाठी ८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या प्रकल्पात तीन पाळीत कर्मचारी काम करणार असून, २४ तासात ७२ हजार पाण्याच्या सीलबंद बाटल्या तयार होणार आहेत. ही पाण्याची बॉटल भुसावळ विभागातील सर्व स्टेशनवर १५ रुपये किमतीला विक्री करण्यात येणार आहे. यामुळे स्टेशनवरील इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बॉटल विक्रीला बंदी घालण्यात येणार आहे.

इन्फो :

महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प

भुसावळ एमआयडीसीत उभारण्यात येणारा ‘रेल नीर’चा प्रकल्प हा महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प ठरणार आहे. सध्या राज्यात नागपूर व अंबरनाथ येथे प्रकल्प सुरू असून, लवकरच भुसावळ येथेही सुरू होणार आहे. दरम्यान, या प्रकल्पात मनुष्यबळाच्या भरतीसाठी आयआरसीटीसीतर्फे लवकरच नोकर भरतीची जाहिरात काढण्यात येणार असून, योग्य अर्हता प्राप्त असलेल्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. साधारणत : १०० ते १२५ जागांची या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार असल्याचे आयआरसीटीसीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

प्रवाशांना मिळणार स्वस्त व शुद्ध पाणी

सुमारे आठ कोटी रुपये खर्चून उभ्या राहणाऱ्या भुसावळातील ‘रेल नीर’ प्रकल्पामध्ये प्रवाशांना अवघ्या १५ रुपयात स्वस्त व शुद्ध पाण्याची बॉटल मिळणार आहे. या नीर प्रकल्पात विविध प्रकारच्या १२ टप्प्यात जल शुद्धीकरणाची प्रक्रिया होणार असून, यामध्ये तुरटी प्रक्रिया, क्लोरिनायझेशन, कार्बन फिल्टर, त्यानंतर १० मायक्रॉन ते ०. ५ मायक्रॉन पर्यंतच्या फिल्टर प्रक्रियेतून हे पाणी शुद्ध होणार आहे. एस.एन. फुड्स या कंपनीला हे काम सोपविण्यात आले असल्याचे आयआरटीसीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

आयआरसीटीसीतर्फे भुसावळला ‘रेल नीर’ प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प सुरू होईल. या प्रकल्पात २४ तासात ७२ हजार पाण्याच्या बॉटल तयार होणार असून, या प्रकल्पात कामासाठी स्थानिक तरुणांनाच नोकरीची संधी देणार आहोत.

- आनंद झा, सहायक महाव्यवस्थापक तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी, दिल्ली.