शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जून अखेर भुसावळला ‘रेल नीर’ प्रकल्प सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

सहायक महाव्यवस्थापकांची माहिती : प्रकल्पात स्थानिक युवकानांच रोजगार देणार सचिन देव जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत ‘रेल नीर’ प्रकल्प ...

सहायक महाव्यवस्थापकांची माहिती : प्रकल्पात स्थानिक युवकानांच रोजगार देणार

सचिन देव

जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत ‘रेल नीर’ प्रकल्प उभारण्यात येत असून, हे काम वेगाने सुरू आहे. या वर्षी जूनअखेर हा प्रकल्प सुरू होणार असून, या

प्रकल्पात स्थानिक युवकांनाच रोजगार देण्यात येणार असल्याची माहिती आयआरटीसीचे सहायक महाव्यवस्थापक आनंद झा यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मार्फत भुसावळला गेल्या दीड वर्षांपासून रेल्वे नीर प्रकल्पाचे काम सुरू आहे. सध्या हे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. भुसा‌वळातील एमआयडीसीत हा प्रकल्प उभारला जात असून, हैदराबाद येथील हायमॅक्स कंपनीतर्फे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मशिनरींची उभारणी करण्यात येत आहे. ८ हजार ५५० चौरस मीटरमध्ये या प्रकल्पाचे काम असून, यासाठी ८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या प्रकल्पात तीन पाळीत कर्मचारी काम करणार असून, २४ तासात ७२ हजार पाण्याच्या सीलबंद बाटल्या तयार होणार आहेत. ही पाण्याची बॉटल भुसावळ विभागातील सर्व स्टेशनवर १५ रुपये किमतीला विक्री करण्यात येणार आहे. यामुळे स्टेशनवरील इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बॉटल विक्रीला बंदी घालण्यात येणार आहे.

इन्फो :

महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प

भुसावळ एमआयडीसीत उभारण्यात येणारा ‘रेल नीर’चा प्रकल्प हा महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प ठरणार आहे. सध्या राज्यात नागपूर व अंबरनाथ येथे प्रकल्प सुरू असून, लवकरच भुसावळ येथेही सुरू होणार आहे. दरम्यान, या प्रकल्पात मनुष्यबळाच्या भरतीसाठी आयआरसीटीसीतर्फे लवकरच नोकर भरतीची जाहिरात काढण्यात येणार असून, योग्य अर्हता प्राप्त असलेल्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. साधारणत : १०० ते १२५ जागांची या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार असल्याचे आयआरसीटीसीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

प्रवाशांना मिळणार स्वस्त व शुद्ध पाणी

सुमारे आठ कोटी रुपये खर्चून उभ्या राहणाऱ्या भुसावळातील ‘रेल नीर’ प्रकल्पामध्ये प्रवाशांना अवघ्या १५ रुपयात स्वस्त व शुद्ध पाण्याची बॉटल मिळणार आहे. या नीर प्रकल्पात विविध प्रकारच्या १२ टप्प्यात जल शुद्धीकरणाची प्रक्रिया होणार असून, यामध्ये तुरटी प्रक्रिया, क्लोरिनायझेशन, कार्बन फिल्टर, त्यानंतर १० मायक्रॉन ते ०. ५ मायक्रॉन पर्यंतच्या फिल्टर प्रक्रियेतून हे पाणी शुद्ध होणार आहे. एस.एन. फुड्स या कंपनीला हे काम सोपविण्यात आले असल्याचे आयआरटीसीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

आयआरसीटीसीतर्फे भुसावळला ‘रेल नीर’ प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प सुरू होईल. या प्रकल्पात २४ तासात ७२ हजार पाण्याच्या बॉटल तयार होणार असून, या प्रकल्पात कामासाठी स्थानिक तरुणांनाच नोकरीची संधी देणार आहोत.

- आनंद झा, सहायक महाव्यवस्थापक तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी, दिल्ली.