शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जून अखेर भुसावळला ‘रेल नीर’ प्रकल्प सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:14 IST

सहायक महाव्यवस्थापकांची माहिती : प्रकल्पात स्थानिक युवकानांच रोजगार देणार सचिन देव जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत ‘रेल नीर’ प्रकल्प ...

सहायक महाव्यवस्थापकांची माहिती : प्रकल्पात स्थानिक युवकानांच रोजगार देणार

सचिन देव

जळगाव : भुसावळला आयआरसीटीसी मार्फत ‘रेल नीर’ प्रकल्प उभारण्यात येत असून, हे काम वेगाने सुरू आहे. या वर्षी जूनअखेर हा प्रकल्प सुरू होणार असून, या

प्रकल्पात स्थानिक युवकांनाच रोजगार देण्यात येणार असल्याची माहिती आयआरटीसीचे सहायक महाव्यवस्थापक आनंद झा यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मार्फत भुसावळला गेल्या दीड वर्षांपासून रेल्वे नीर प्रकल्पाचे काम सुरू आहे. सध्या हे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. भुसा‌वळातील एमआयडीसीत हा प्रकल्प उभारला जात असून, हैदराबाद येथील हायमॅक्स कंपनीतर्फे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मशिनरींची उभारणी करण्यात येत आहे. ८ हजार ५५० चौरस मीटरमध्ये या प्रकल्पाचे काम असून, यासाठी ८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या प्रकल्पात तीन पाळीत कर्मचारी काम करणार असून, २४ तासात ७२ हजार पाण्याच्या सीलबंद बाटल्या तयार होणार आहेत. ही पाण्याची बॉटल भुसावळ विभागातील सर्व स्टेशनवर १५ रुपये किमतीला विक्री करण्यात येणार आहे. यामुळे स्टेशनवरील इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बॉटल विक्रीला बंदी घालण्यात येणार आहे.

इन्फो :

महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प

भुसावळ एमआयडीसीत उभारण्यात येणारा ‘रेल नीर’चा प्रकल्प हा महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प ठरणार आहे. सध्या राज्यात नागपूर व अंबरनाथ येथे प्रकल्प सुरू असून, लवकरच भुसावळ येथेही सुरू होणार आहे. दरम्यान, या प्रकल्पात मनुष्यबळाच्या भरतीसाठी आयआरसीटीसीतर्फे लवकरच नोकर भरतीची जाहिरात काढण्यात येणार असून, योग्य अर्हता प्राप्त असलेल्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. साधारणत : १०० ते १२५ जागांची या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार असल्याचे आयआरसीटीसीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

प्रवाशांना मिळणार स्वस्त व शुद्ध पाणी

सुमारे आठ कोटी रुपये खर्चून उभ्या राहणाऱ्या भुसावळातील ‘रेल नीर’ प्रकल्पामध्ये प्रवाशांना अवघ्या १५ रुपयात स्वस्त व शुद्ध पाण्याची बॉटल मिळणार आहे. या नीर प्रकल्पात विविध प्रकारच्या १२ टप्प्यात जल शुद्धीकरणाची प्रक्रिया होणार असून, यामध्ये तुरटी प्रक्रिया, क्लोरिनायझेशन, कार्बन फिल्टर, त्यानंतर १० मायक्रॉन ते ०. ५ मायक्रॉन पर्यंतच्या फिल्टर प्रक्रियेतून हे पाणी शुद्ध होणार आहे. एस.एन. फुड्स या कंपनीला हे काम सोपविण्यात आले असल्याचे आयआरटीसीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

आयआरसीटीसीतर्फे भुसावळला ‘रेल नीर’ प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प सुरू होईल. या प्रकल्पात २४ तासात ७२ हजार पाण्याच्या बॉटल तयार होणार असून, या प्रकल्पात कामासाठी स्थानिक तरुणांनाच नोकरीची संधी देणार आहोत.

- आनंद झा, सहायक महाव्यवस्थापक तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी, दिल्ली.