शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे व बससेवेला अडथळ्याची शर्यत, विमानसेवेला अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

जळगाव : पावसामुळे मुंबई पाठोपाठ पश्चिम मार्गावरही रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्यामुळे, गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांनी विमानसेवेचा ...

जळगाव : पावसामुळे मुंबई पाठोपाठ पश्चिम मार्गावरही रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्यामुळे, गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांनी विमानसेवेचा पर्याय स्वीकारला आहे. रविवारी जळगावहून विमानाने अहमदाबादला ३४ प्रवासी गेले तर शनिवारी ३५ प्रवासी गेले होते. एरव्ही अहमदाबाद मार्गावर बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी मिळत असताना, पावसामुळे मात्र रेल्वे गाड्यांचा खोळंबा होत असल्याने प्रवासी गैरसोय टाळण्यासाठी विमानसेवेकडे वळत आहेत.

विमानाच्या तांत्रिक दुरूस्तीसाठी महिनाभरापासून बंद असलेली विमानसेवा गेल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. सध्या ही सेवा आठवड्यातून दर बुधवारी, शनिवारी व रविवारी सुरू आहे. विशेष म्हणजे विमानतळावर गेल्या वर्षापासून नाईट लॅंडिंगची सुविधा झाल्यामुळे, ही सेवा नियमित सुरू आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई मार्गावरची प्रवासी संख्या निम्म्याने कमी झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबई मार्गावर कधी १५ तर कधी २० प्रवासी मिळत असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. अहमदाबादपेक्षा मुंबई मार्गावर नेहमीच प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतांना, पावसामुळे मात्र पहिल्यादांच मुंबई मार्गावरची प्रवासी संख्या घटली असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

अहमदाबाद मार्गावरची प्रवासी संख्या वाढली :

पावसामुळे एकीकडे मुंबईकडे जाणाऱ्या विमानाच्या प्रवासी संख्येत दुपटीने घट झाली असतांना, दुसरीकडे अहमदाबाद मार्गावरही पावसामुळे अनेक रेल्वे गाड्या विलंबाने धावत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून अनेक प्रवासी विमानाने अहमदाबादकडे जाण्याला प्राधान्य देत आहेत. सध्या पावसामुळे या गाड्यांना अधिकच विलंब होत असल्यामुळे, प्रवासी अवघ्या एका तासांत अहमदाबादला पोहोचत असल्यामुळे, प्रवाशांचा कल विमानसेवेकडे आहे.