शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

रेल्वे व बससेवेला अडथळ्याची शर्यत, विमानसेवेला अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

जळगाव : पावसामुळे मुंबई पाठोपाठ पश्चिम मार्गावरही रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्यामुळे, गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांनी विमानसेवेचा ...

जळगाव : पावसामुळे मुंबई पाठोपाठ पश्चिम मार्गावरही रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्यामुळे, गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांनी विमानसेवेचा पर्याय स्वीकारला आहे. रविवारी जळगावहून विमानाने अहमदाबादला ३४ प्रवासी गेले तर शनिवारी ३५ प्रवासी गेले होते. एरव्ही अहमदाबाद मार्गावर बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी मिळत असताना, पावसामुळे मात्र रेल्वे गाड्यांचा खोळंबा होत असल्याने प्रवासी गैरसोय टाळण्यासाठी विमानसेवेकडे वळत आहेत.

विमानाच्या तांत्रिक दुरूस्तीसाठी महिनाभरापासून बंद असलेली विमानसेवा गेल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. सध्या ही सेवा आठवड्यातून दर बुधवारी, शनिवारी व रविवारी सुरू आहे. विशेष म्हणजे विमानतळावर गेल्या वर्षापासून नाईट लॅंडिंगची सुविधा झाल्यामुळे, ही सेवा नियमित सुरू आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई मार्गावरची प्रवासी संख्या निम्म्याने कमी झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबई मार्गावर कधी १५ तर कधी २० प्रवासी मिळत असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. अहमदाबादपेक्षा मुंबई मार्गावर नेहमीच प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतांना, पावसामुळे मात्र पहिल्यादांच मुंबई मार्गावरची प्रवासी संख्या घटली असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

अहमदाबाद मार्गावरची प्रवासी संख्या वाढली :

पावसामुळे एकीकडे मुंबईकडे जाणाऱ्या विमानाच्या प्रवासी संख्येत दुपटीने घट झाली असतांना, दुसरीकडे अहमदाबाद मार्गावरही पावसामुळे अनेक रेल्वे गाड्या विलंबाने धावत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून अनेक प्रवासी विमानाने अहमदाबादकडे जाण्याला प्राधान्य देत आहेत. सध्या पावसामुळे या गाड्यांना अधिकच विलंब होत असल्यामुळे, प्रवासी अवघ्या एका तासांत अहमदाबादला पोहोचत असल्यामुळे, प्रवाशांचा कल विमानसेवेकडे आहे.