शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला रब्बीचा पेरा अवघा ३४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 21:55 IST

कांदा लागवडीवरही परिणाम : गहू, हरभरा आणि मका लागवडीचे क्षेत्र वाढणार, अवकाळीचा फटका

चाळीसगाव : यंदा झालेल्या अवकाळी पावसाचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले असून रब्बी हंगाम देखील २१ दिवस लांबला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस तालुक्यात एकूण उद्दिष्टापैकी अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावर रब्बीची लागवड झाल्याचे वास्तव समोर आले आहे. रब्बी हंगाम ३१ डिसेंबरपर्यत लांबणार असल्याचे शेतकरी वगार्तून सांगितले जात आहे.अवेळी झालेल्या पावसाने कांदा लागवडीचेही चक्र बिघडवले असल्याने यंदा गहू, हरभरा आणि मका पिकाच्या लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. तालुक्यात पाच हजार १११ हेक्टर क्षेत्रात रब्बीची लागवड होते. आठ डिसेंबरअखेर एक हजार ७५० हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाल्याचे तालुका कृषी अधिकारी सी.डी.साठे यांनी सांगितले. यावर्षी अवकाळी माऱ्याने खरीपाची पुरती वाट लागली. निवडणुकीमुळे शेतीशिवाराचे पंचनामेही लांबले. खरीपाचे उत्पन्न बुडाल्याने बळीराजाला रब्बीसाठी उभारी घेता आली नाही. शेतात अजूनही ओल असल्याने यंदा रब्बी हंगामाचे वेळापत्रक चांगलेच कोलमडले आहे. हाती पैसा नसल्याने रब्बीचा पेरा करायचा कसा? या चक्रातही शेतकरी गुरफटले आहे. अवकाळी आपत्तीचे दृष्य परिणाम पुन्हा दिसू लागले आहेत. साधारपणे एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत रब्बी लागवडीची लगबग असते. यावर्षी अवेळी झालेल्या पावसाने हे नियोजन विस्कटून टाकले असून रब्बीची लागवड ३१ डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे लावडीच्या ५० दिवसांपैकी ३८ दिवसात फक्त ३४ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे.यंदा परतीच्या पावसानंतर अवेळी पुन्हा पावसाचे कमबॅक झाले. यामुळे शेतीशिवारांमध्ये उभ्या असलेल्या खरीपाच्या पिकाची खिंडीत गाठल्यासारखी स्थिती झाली. उभी पिके अवकाळी माºयाने आडवी झाली. खरीपाचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. ७० टक्क्यांहून अधिक उत्पन्न बाधित झाले. कपाशी, बाजरी, मका आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. ऐन सीझन मध्येच मालाची आवक होत नसल्याने बाजार समितीही ओस पडली होती.बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला मका पूर्णपणे भिजला. त्याला कोंब फुटले. कपाशीची देखील अशीच दैना झाली.पाऊस लांबल्याने पुढे रब्बीच्या लागवडीवरही याचा परिणाम झाला. शेतात अद्यापही ओल असल्याने आणि थंडीही वाढल्याने रब्बीच्या लागवडीत व्यत्यय येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत रब्बी लागवडीचे क्षेत्र काहीअंशी वाढणार आहे. गहू, हरभरा आणि मक्याच्या पेºयात वृद्धी होईल.

अवेळी झालेल्या पावसाने उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला. काढणीला आलेल्या कांदा पिकाला पावसाने झोडपून काढल्याने उत्पन्नाला मोठी कात्री लागली. रब्बीत लागवड करावयाची रोपेही पिवळी पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यावर्षी तालुका कृषी विभागाने तीन हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असले तरी आठ डिसेंबरअखेर फक्त ५६० हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली असून महागडी रोपे खरेदी करुन काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे.