शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब मेलला १०९ वर्षे झाली पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST

वासेफ पटेल भुसावळ : महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांना जोडणाऱ्या पंजाब मेल या सर्वात जुन्या रेल्वेला १ जून ...

वासेफ पटेल

भुसावळ : महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांना जोडणाऱ्या पंजाब मेल या सर्वात जुन्या रेल्वेला १ जून रोजी १०९ वर्षे पूर्ण झाली. काळानुरूप या रेल्वेने बदल स्वीकारले.

सुरुवातीला मुंबई ते पेशावर चालणाऱ्या पंजाब मेलची सुरुवात कुठून झाली याची मात्र माहिती नाही. उपलब्ध कागदपत्राच्या आधारे पंजाब मेल १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पियर मोल स्थानकातून प्रथमच सुटल्याचा (सुरू झाल्याचा) अंदाज करण्यात आला आहे.

पंजाब मेल ही ग्लॅमरस फ्रंटियर मेलपेक्षा १६ वर्षे आधीपासून सुरू आहे. बॅलार्ड पियर मोल स्टेशन खरे म्हणजे जीआयपी रेल्वे सेवांसाठी एक केंद्र होते. पंजाब मेल किंवा पंजाब लिमिटेड तेव्हा तिला संबोधन केले जात होते. १ जून १९१२ रोजी ही मेल सुरू झाली. प्रारंभी, भारतात प्रथमच पोस्टिंग झालेले सरकारी अधिकारी त्यांच्या पत्नीसमवेत मेलमधून आणले जात होते. साऊथॅम्प्टन आणि बॉम्बे दरम्यान स्टीमरचा प्रवास तेरा दिवस चालायचा. ब्रिटिश अधिकारी मुंबईला जाण्यासाठी तसेच त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी रेल्वेने प्रवासासाठी एकत्रित तिकिटे घेत असत. त्यामुळे येथे आल्यावर ते मद्रास, कलकत्ता किंवा दिल्ली यापैकी एका रेल्वेगाडीने प्रवास करीत. मुंबईच्या बल्लार्ड पियर मोल स्थानकापासून ते पेशावरकडे जीआयपी मार्गे, सुमारे ४७ तासांत २४९६ किमी अंतर कापत असे. ट्रेनमध्ये सहा डब्यांचा समावेश होता. तीन प्रवाशांसाठी आणि तीन माल आणि टपालासाठी. तीन प्रवासी डब्यांतील प्रवाशांची क्षमता फक्त ९६ इतकी होती. सर्व डब्बे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकणारे (कॉरिडॉर कार) होते आणि डबे प्रथम श्रेणीच्या, दोन बर्थ असलेल्या कंपार्टमेंटसह बनवले गेले होते. उच्च-श्रेणीतील प्रवाशांसाठी असल्याने गाड्यांमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा असत. तसेच बाथरूम, एक रेस्टॉरंट कार, साहित्यासाठी डबा आणि एक डबा गोऱ्या साहेबांच्या नोकरांकरिता असे. स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाब लिमिटेड ही ब्रिटिश भारतातील सर्वात वेगवान ट्रेन होती. पंजाब लिमिटेडचा मार्ग जीआयपी ट्रॅकवरून मोठ्या प्रमाणात जात होता आणि पेशावर छावणी येथे संपण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरमधून जात होता. १९१४ पासून या रेल्वेचे बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) येथून प्रस्थान व आगमन होऊ लागले. त्यानंतर ही गाडी पंजाब लिमिटेड ऐवजी पंजाब मेल म्हणून ओळखली जाऊ लागली आणि याची दैनंदिन सेवा सुरू झाली. सन १९४५ मध्ये पंजाब मेलला वातानुकूलित डबा जोडण्यात आला.