शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मराठा समाजाविरोधात मोर्चासाठी संघाचा होता प्रस्ताव - वामन मेश्राम

By admin | Updated: January 12, 2017 00:29 IST

जळगाव : कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाजातर्फे मूकमोर्चे काढण्यात येत होते.

जळगाव : कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाजातर्फे मूकमोर्चे काढण्यात येत होते. मराठा समाजाविरोधात दलितांनी मोर्चे काढावे, त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक रसद पुरविण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्याचा खळबळजनक आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य संयोजक प्रा.वामन मेश्राम यांनी केला. बहुजनांचे लाखोंचे मोर्च राज्यभरात निघत असल्याने ओबीसींना सुखावण्यासाठी मागणी नसताना ओबीसी मंत्रालयाची घोषणा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील विचारमंचावर भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सपकाळे, भुसावळचे नगरसेवक राजू सुर्यवंशी, रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे, माजी उपमहापौर करीम सालार, समाजवादी पक्षाचे मुफ्ती हारून नदवी, किशोर सूर्यवंशी, चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास विसावे, जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे, बाळासाहेब सैंदाणे, सुरेश सोनवणे, गोपाल ठाकूर, अशोक लाडवंजारी, डॉ.मिलिंद बागुल, अॅड. राजेश झाल्टे, राजू मोरे सागर सपके व विविध जाती-धर्माचे मान्यवर उपस्थित होते.बहुजनांचा स्वत:च्या ताकदीवर मोर्चाअहमदनगरमध्ये काढलेल्या बहुजन क्रांती मोर्चासाठी एक कोटी 67 लाखांचा खर्च झाला. त्यासाठी आम्ही कुणाकडूनही एक रुपया घेतला नाही.  गावागावात नागरिकांना कुपन दिले. तसेच मोर्चाला येताना शिदोरी सोबत आणण्याची सुचना केली. बहुजनांचे पैसे, कौशल्य आणि परिश्रम यामुळे स्वत:च्या ताकदीवर हे मोर्चे काढले. स्वाभिमान व स्वावलंबनासाठी मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाच्या मोर्चानंतर दलितांनी मोर्चे काढू नये असे काही नेत्यांनी सांगितले होते. मात्र बहुजन बांधव लाखात एकत्र आला आणि त्यांनी नेत्याचे म्हणणे नाकारले. जनतेला आता नेत्यांची गरज नाही असा संदेश या मोर्चाच्या निमित्ताने गेला आहे.