शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

मराठा समाजाविरोधात मोर्चासाठी संघाचा होता प्रस्ताव - वामन मेश्राम

By admin | Updated: January 12, 2017 00:29 IST

जळगाव : कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाजातर्फे मूकमोर्चे काढण्यात येत होते.

जळगाव : कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाजातर्फे मूकमोर्चे काढण्यात येत होते. मराठा समाजाविरोधात दलितांनी मोर्चे काढावे, त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक रसद पुरविण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्याचा खळबळजनक आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य संयोजक प्रा.वामन मेश्राम यांनी केला. बहुजनांचे लाखोंचे मोर्च राज्यभरात निघत असल्याने ओबीसींना सुखावण्यासाठी मागणी नसताना ओबीसी मंत्रालयाची घोषणा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील विचारमंचावर भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सपकाळे, भुसावळचे नगरसेवक राजू सुर्यवंशी, रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे, माजी उपमहापौर करीम सालार, समाजवादी पक्षाचे मुफ्ती हारून नदवी, किशोर सूर्यवंशी, चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास विसावे, जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे, बाळासाहेब सैंदाणे, सुरेश सोनवणे, गोपाल ठाकूर, अशोक लाडवंजारी, डॉ.मिलिंद बागुल, अॅड. राजेश झाल्टे, राजू मोरे सागर सपके व विविध जाती-धर्माचे मान्यवर उपस्थित होते.बहुजनांचा स्वत:च्या ताकदीवर मोर्चाअहमदनगरमध्ये काढलेल्या बहुजन क्रांती मोर्चासाठी एक कोटी 67 लाखांचा खर्च झाला. त्यासाठी आम्ही कुणाकडूनही एक रुपया घेतला नाही.  गावागावात नागरिकांना कुपन दिले. तसेच मोर्चाला येताना शिदोरी सोबत आणण्याची सुचना केली. बहुजनांचे पैसे, कौशल्य आणि परिश्रम यामुळे स्वत:च्या ताकदीवर हे मोर्चे काढले. स्वाभिमान व स्वावलंबनासाठी मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाच्या मोर्चानंतर दलितांनी मोर्चे काढू नये असे काही नेत्यांनी सांगितले होते. मात्र बहुजन बांधव लाखात एकत्र आला आणि त्यांनी नेत्याचे म्हणणे नाकारले. जनतेला आता नेत्यांची गरज नाही असा संदेश या मोर्चाच्या निमित्ताने गेला आहे.