शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

धान्याची आवक कमी होऊनही भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहत असल्याने त्यानंतर मालाची आवकही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहत असल्याने त्यानंतर मालाची आवकही होत नाही. यात ऐन खरेदीच्या हंगामातच गहू व इतर धान्याची आवक कमी झाली असून, त्यांचे भावदेखील कमी होत आहेत. यात गहू एक हजार ८०० ते दोन हजार ३०० रुपये प्रती क्विंटलने विक्री होत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने घरातील माल लवकर विक्री करून शेती कामे करण्याच्या तयारीत शेतकरी असल्याने भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.

वर्षभराचे धान्य खरेदीचा हा हंगाम असतो. त्यात मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांतून गव्हाची अधिक आवक होते व तेथेच राज्य सरकारने गव्हाची खरेदी वाढविल्याने त्याची आवक कमी होऊन भाववाढ झाली होती. त्यानंतर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते ११ या वेळेतच उघडी ठेवता येत आहे. ११ वाजल्यानंतर दुकान बंद झाल्यानंतर मालाची आवकही थांबत आहे. त्यामुळे आवक कमी होऊन भाव वाढ होणार असे वाटत असताना उलट भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हाती पैसा मिळविणे महत्त्वाचे

वेळेच्या निर्बंधामुळे धान्याची दिवसभर व पूर्ण विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक वेळा बाजार समितीमधून माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे सकाळी लवकर येऊन ११ वाजेपर्यंत जे भाव मिळतील त्या भावात माल विकून हाती पैसा पडणे महत्त्वाचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मे महिन्यापासून शेतीमध्ये खरीप हंगामाची कामे केली जातात. आता शेतकरी त्यात अडकणार असल्याने घरात असलेला माल विकण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गहू, लाल हरभरा, दादर, जाड हरभरा यांचे भाव कमी झाले आहेत.

मोठी घसरण

खरीप हंगामामुळे शेतकरी माल विक्रीचा अधिक प्रयत्न करीत आहे. बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील चोपडा तसेच शिरपूर, मध्य प्रदेश, राजस्थान या भागातून गहू व इतर धान्य येते. यात कमी वेळ असल्याने जिल्ह्यातील व परिसरातील शेतकरी मिळेल त्या भावात माल विकत आहे. त्यामुळे त्यांचे भाव कमी-कमी होत आहे. दोन आठवड्यांपूर्वी २००० ते २५०० रुपये प्रती क्विंटल दरम्यान असलेल्या गव्हाचे भाव १८०० ते २३०० रुपये प्रती क्विंटल दरम्यान आले आहेत. अशाच प्रकारे ३००० ते ३४०० रुपये प्रती क्विंटल असलेली दादर आता १४०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल, लाल हरभरा ५००० ते ५१०० रुपये प्रती क्विंटलवरून ४८०० ते ४९०० रुपये प्रती क्विंटल, जाड हरभरा ९२०० ते ९३०० रुपये प्रती क्विंटलवरून ८६०० ते ८७०० रुपये प्रती क्विंटलवर आला आहे.

————————————

सध्या निर्बंधामुळे दुकानांच्या वेळा कमी आहेत. त्यामुळे शेतकरी सकाळी लवकर जेवढा माल विकला जाईल, तेवढा अधिकाधिक प्रयत्न करीत आहे. त्यात खरीप हंगाम तोंडावर असल्याने धान्याची विक्री करणे आवश्यक असून, त्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. दिवसभर धान्य येत नसल्याने त्याची आवक कमी झाली असून, भावदेखील कमी होत आहे.

- अशोक राठी, धान्य व्यापारी.