शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

धान्याची आवक कमी होऊनही भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहत असल्याने त्यानंतर मालाची आवकही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहत असल्याने त्यानंतर मालाची आवकही होत नाही. यात ऐन खरेदीच्या हंगामातच गहू व इतर धान्याची आवक कमी झाली असून, त्यांचे भावदेखील कमी होत आहेत. यात गहू एक हजार ८०० ते दोन हजार ३०० रुपये प्रती क्विंटलने विक्री होत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने घरातील माल लवकर विक्री करून शेती कामे करण्याच्या तयारीत शेतकरी असल्याने भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.

वर्षभराचे धान्य खरेदीचा हा हंगाम असतो. त्यात मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांतून गव्हाची अधिक आवक होते व तेथेच राज्य सरकारने गव्हाची खरेदी वाढविल्याने त्याची आवक कमी होऊन भाववाढ झाली होती. त्यानंतर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते ११ या वेळेतच उघडी ठेवता येत आहे. ११ वाजल्यानंतर दुकान बंद झाल्यानंतर मालाची आवकही थांबत आहे. त्यामुळे आवक कमी होऊन भाव वाढ होणार असे वाटत असताना उलट भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हाती पैसा मिळविणे महत्त्वाचे

वेळेच्या निर्बंधामुळे धान्याची दिवसभर व पूर्ण विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक वेळा बाजार समितीमधून माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे सकाळी लवकर येऊन ११ वाजेपर्यंत जे भाव मिळतील त्या भावात माल विकून हाती पैसा पडणे महत्त्वाचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मे महिन्यापासून शेतीमध्ये खरीप हंगामाची कामे केली जातात. आता शेतकरी त्यात अडकणार असल्याने घरात असलेला माल विकण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गहू, लाल हरभरा, दादर, जाड हरभरा यांचे भाव कमी झाले आहेत.

मोठी घसरण

खरीप हंगामामुळे शेतकरी माल विक्रीचा अधिक प्रयत्न करीत आहे. बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील चोपडा तसेच शिरपूर, मध्य प्रदेश, राजस्थान या भागातून गहू व इतर धान्य येते. यात कमी वेळ असल्याने जिल्ह्यातील व परिसरातील शेतकरी मिळेल त्या भावात माल विकत आहे. त्यामुळे त्यांचे भाव कमी-कमी होत आहे. दोन आठवड्यांपूर्वी २००० ते २५०० रुपये प्रती क्विंटल दरम्यान असलेल्या गव्हाचे भाव १८०० ते २३०० रुपये प्रती क्विंटल दरम्यान आले आहेत. अशाच प्रकारे ३००० ते ३४०० रुपये प्रती क्विंटल असलेली दादर आता १४०० ते २२०० रुपये प्रती क्विंटल, लाल हरभरा ५००० ते ५१०० रुपये प्रती क्विंटलवरून ४८०० ते ४९०० रुपये प्रती क्विंटल, जाड हरभरा ९२०० ते ९३०० रुपये प्रती क्विंटलवरून ८६०० ते ८७०० रुपये प्रती क्विंटलवर आला आहे.

————————————

सध्या निर्बंधामुळे दुकानांच्या वेळा कमी आहेत. त्यामुळे शेतकरी सकाळी लवकर जेवढा माल विकला जाईल, तेवढा अधिकाधिक प्रयत्न करीत आहे. त्यात खरीप हंगाम तोंडावर असल्याने धान्याची विक्री करणे आवश्यक असून, त्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. दिवसभर धान्य येत नसल्याने त्याची आवक कमी झाली असून, भावदेखील कमी होत आहे.

- अशोक राठी, धान्य व्यापारी.