शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

गूळ खातोय भाव, पण साखरेला मागणी अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST

आहारात गुळाचा वापर वाढला, आरोग्याप्रती जागरूक झाले जळगावकर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याप्रती नागरिक जागरूक ...

आहारात गुळाचा वापर वाढला, आरोग्याप्रती जागरूक झाले जळगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याप्रती नागरिक जागरूक झाले आहे. त्यामुळे आता गुळाचा ‘भाव’देखील वाढत आहे. असे असले तरी साखरेची मागणी अजूनही तेवढीच आहे. गुळाच्या आरोग्यदायक गुणधर्मांमुळे अनेकजण आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर करीत आहेत.

साखर ही ग्लुकोज स्वरुपात शरीराला मिळते. त्यामुळे मधुमेहासह अनेक आजारांना शरीर निमंत्रण देते, असे आहारतज्ज्ञ सांगतात. गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये अनेकजण आपल्या आरोग्याप्रती जागरूक झाले आहेत. त्यामुळे सगळीकडे साखर वापरावी की गूळ वापरावा, यावर चर्चा होते. पूर्वीच्या काळी सर्वत्र फक्त गूळच वापरला जात होता किंवा फार तर आहारात खांडसरीचा वापर होता. मात्र, नंतरच्या काळात राज्यात अनेक साखरेचे कारखाने उभे राहिले. साखर मुबलक प्रमाणात मिळू लागली. तेव्हा गूळ हा गरिबांचा, तर साखर ही श्रीमंताची मानली गेली. हीच साखर स्वस्त किमतीत मिळू लागल्याने तिची खरेदी वाढली आणि गुळाला कुणीही विचारेनासे झाले. आता मात्र हे दिवस बदलले आहेत. अनेकांनी आपल्या आहारात गुळाचा किंवा खांडसरीच्या साखरेचा वापर सुरू केला आहे.

गुळाचा चहा बनले स्टेटस

सध्या जागोजागी चहा विक्री करणारे अनेक ब्रँड्स उभे राहिले आहेत. त्यांच्याकडे साधा साखर घातलेल्या चहापेक्षा गुळाच्या चहाची किंमत ही दुप्पट असते. एकेकाळी गुळाच्या चहाला गरिबांचा चहा म्हणून हिणविले जात होते. मात्र, अनेकजण हा गुळाचा चहा स्टेटस सिम्बॉल बनला आहे. आरोग्याबद्दल जागरूक असलेले अनेकजण हा गूळ घातलेला चहाच घेतात किंवा घरातील अन्य गोड खाद्यपदार्थांमध्ये गुळाचाच वापर केला जातो.

भाव

फेब्रुवारी

गूळ ४८

साखर ३६

मार्च

गूळ ४८

साखर ३६

एप्रिल

गूळ - ४७

साखर ३६

मे गूळ ४७

साखर ३६

जून गूळ ४४

साखर ३६

कोट : गूळ हा उष्ण आहे. त्यात फ्रुक्टोज असते, तर साखरेत ग्लुकोज असते. गूळ हा साखरेपेक्षा नक्कीच आरोग्यदायी आहे. साखरेत प्रीझर्वेटिव्ह म्हणून घातक रसायनेदेखील टाकली जातात. त्यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो - डॉ. मिलिंद कांबळे, आयुर्वेद तज्ज्ञ.

कोट - ग्रामीण भागात मात्र अजूनही साखरेचा वापर जास्त केला जातो. त्यामुळे गुळापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात साखर विकली जात आहे. गुळाचा वापर क्वचितच खाद्यपदार्थांमध्ये केला जातो - महेश वाणी, व्यापारी

कोट : गेले काही वर्षांमध्ये गुळाची विक्री वाढली असली तरी भाव स्थिर आहेत. सरकारने साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवले असल्याने त्याचे भावात फारसे बदल झालेले नाहीत. सध्या अनेक ठिकाणी साखरेऐवजी गुळाची मागणी होत आहे. - सचिन छाजेड, व्यापारी.

कोट : गुळाला अजूनही फारशी मागणी नाही. त्याऐवजी दररोज साखरच वापरली जाते. गेल्या काही महिन्यांमध्ये गुळाला बऱ्यापैकी मागणी येत आहे. - रवी नेवे, व्यापारी.