शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

कॉफी टेबल बुकद्वारे ‘जलयुक्त’ जळगावचे सादरीकरण

By admin | Updated: May 10, 2017 13:46 IST

जिल्हा प्रशासनाचा उपक्रम : जिल्ह्यातील कामांचा सादर केला सचित्र लेखाजोखा

ऑनलाईन लोकमत विशेष
जळगाव, दि.10- शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून शेतीचा विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची आखणी करीत जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचे सादरीकरण जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘कॉफी टेबल बुक’ च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
*दुष्काळमुक्तीकडे नेणारे जलयुक्त शिवार*
सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियानाची गरज, या अभियानाची व्याप्ती, अभियानातंर्गत करण्यात येणारी कामे आणि कालावधी यासारख्या आवश्यक उपाययोजनांची तांत्रिक माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. यासोबत जिल्हास्तरीय आराखडय़ात जलयुक्त शिवार अभियानासाठी यंत्रणानिहाय कामांचा आराखडा सादर केला आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व विद्यमान जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या पुस्तकाचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलींद दुसाने यांनी संपादन केले आहे.
* क्यूआर कोड्सद्वारे नागरिकांर्पयत विस्तृत माहिती *
‘जलयुक्त जळगाव’ या कॉफी टेबल पुस्तकातील आशय हा इंटरनेटवरील वेबपेजमध्ये स्टोअर केला आहे. स्मार्ट फोन किंवा कॅमे:याद्वारे हा कोड स्कॅन करून जलयुक्त जळगावचे वेबपेज ओपन करता येणार आहे. क्यूआर कोड्सच्या माध्यमातून ‘जलयुक्त जळगाव’ या पुस्तकातील विस्तृत माहिती ही अधिकाधिक नागरिकांर्पयत पोहचविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर वाचकाचा वेळ आणि श्रम वाचणार आहे. 
* जळगाव तालुक्यातील 15 गावांचा पाण्याचा ताळेबंद *
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत गेल्या वर्षी निवडण्यात आलेल्या 232 गावांमध्ये ग्रामस्थ, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवार फे:या आयोजित करीत प्रत्येक गावाचा पाण्याचा ताळेबंद केला आहे. जळगाव तालुक्यातील उमाळे, कंडारी, देव्हारी, शिरसोली, प्र.न. व प्र.बो., सुभाषवाडी, वडली, वसंतवाडी, नशिराबाद, निमगाव बुद्रुक, शेळगाव, आसोदा या 15 गावांचा त्यात समावेश केला आहे. या ताळेबंद मध्ये गावाचे भौगोलिक क्षेत्र, गावाला लागणारे पाणी, पावसामुळे उपलब्ध होणारे पाणी, जुन्या कामांमुळे अडवलेले पाणी, जलयुक्त शिवार अभियानामुळे अडविले जाणारे पाणी तसेच त्या गावासाठी कमी पडणारे किंवा जास्तीच्या पाण्याचा ताळेबंद पुस्तिकेत दिला आहे.
* जलयुक्त शिवारमुळे 58 हजार टीसीएम साठा *
कॉफी टेबल पुस्तकात जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यात 58 हजार 549.41 टीसीएम पाण्याची साठवण क्षमता निर्माण झाली असून 57 हजार 512 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र तयार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या अभियानामुळे टँकर्सच्या संख्येत देखील घट झाल्याचा दावा केला आहे.
* जिल्ह्यातील जलसमृद्धीची सचित्र यशोगाथा *
पुस्तकात चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव, माळशेवगे, वाकडी, अमळनेर तालुक्यातील नगाव, पारोळा तालुक्यातील तरवाडे खुर्द, भडगाव तालुक्यातील  वलवाडी, मळगाव, पाचोरा तालुक्यातील लोहारा, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा, जळगाव तालुक्यातील कडगाव, कंडारी, जामनेर तालुक्यातील वाकोद, देऊळगाव, गोंदेगाव, पहूर, रावेर तालुक्यातील लालमाती, वढोदा, भुसावळ तालुक्यातील कु:हे पानाचे या गावातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या यशोगाथा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यासोबतच शेतकरी व शासकीय अधिका:यांचे मनोगत  देण्यात आले आहे.