शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

कॉफी टेबल बुकद्वारे ‘जलयुक्त’ जळगावचे सादरीकरण

By admin | Updated: May 10, 2017 13:46 IST

जिल्हा प्रशासनाचा उपक्रम : जिल्ह्यातील कामांचा सादर केला सचित्र लेखाजोखा

ऑनलाईन लोकमत विशेष
जळगाव, दि.10- शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून शेतीचा विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची आखणी करीत जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचे सादरीकरण जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘कॉफी टेबल बुक’ च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
*दुष्काळमुक्तीकडे नेणारे जलयुक्त शिवार*
सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियानाची गरज, या अभियानाची व्याप्ती, अभियानातंर्गत करण्यात येणारी कामे आणि कालावधी यासारख्या आवश्यक उपाययोजनांची तांत्रिक माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. यासोबत जिल्हास्तरीय आराखडय़ात जलयुक्त शिवार अभियानासाठी यंत्रणानिहाय कामांचा आराखडा सादर केला आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व विद्यमान जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या पुस्तकाचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलींद दुसाने यांनी संपादन केले आहे.
* क्यूआर कोड्सद्वारे नागरिकांर्पयत विस्तृत माहिती *
‘जलयुक्त जळगाव’ या कॉफी टेबल पुस्तकातील आशय हा इंटरनेटवरील वेबपेजमध्ये स्टोअर केला आहे. स्मार्ट फोन किंवा कॅमे:याद्वारे हा कोड स्कॅन करून जलयुक्त जळगावचे वेबपेज ओपन करता येणार आहे. क्यूआर कोड्सच्या माध्यमातून ‘जलयुक्त जळगाव’ या पुस्तकातील विस्तृत माहिती ही अधिकाधिक नागरिकांर्पयत पोहचविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर वाचकाचा वेळ आणि श्रम वाचणार आहे. 
* जळगाव तालुक्यातील 15 गावांचा पाण्याचा ताळेबंद *
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत गेल्या वर्षी निवडण्यात आलेल्या 232 गावांमध्ये ग्रामस्थ, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवार फे:या आयोजित करीत प्रत्येक गावाचा पाण्याचा ताळेबंद केला आहे. जळगाव तालुक्यातील उमाळे, कंडारी, देव्हारी, शिरसोली, प्र.न. व प्र.बो., सुभाषवाडी, वडली, वसंतवाडी, नशिराबाद, निमगाव बुद्रुक, शेळगाव, आसोदा या 15 गावांचा त्यात समावेश केला आहे. या ताळेबंद मध्ये गावाचे भौगोलिक क्षेत्र, गावाला लागणारे पाणी, पावसामुळे उपलब्ध होणारे पाणी, जुन्या कामांमुळे अडवलेले पाणी, जलयुक्त शिवार अभियानामुळे अडविले जाणारे पाणी तसेच त्या गावासाठी कमी पडणारे किंवा जास्तीच्या पाण्याचा ताळेबंद पुस्तिकेत दिला आहे.
* जलयुक्त शिवारमुळे 58 हजार टीसीएम साठा *
कॉफी टेबल पुस्तकात जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यात 58 हजार 549.41 टीसीएम पाण्याची साठवण क्षमता निर्माण झाली असून 57 हजार 512 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र तयार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या अभियानामुळे टँकर्सच्या संख्येत देखील घट झाल्याचा दावा केला आहे.
* जिल्ह्यातील जलसमृद्धीची सचित्र यशोगाथा *
पुस्तकात चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव, माळशेवगे, वाकडी, अमळनेर तालुक्यातील नगाव, पारोळा तालुक्यातील तरवाडे खुर्द, भडगाव तालुक्यातील  वलवाडी, मळगाव, पाचोरा तालुक्यातील लोहारा, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा, जळगाव तालुक्यातील कडगाव, कंडारी, जामनेर तालुक्यातील वाकोद, देऊळगाव, गोंदेगाव, पहूर, रावेर तालुक्यातील लालमाती, वढोदा, भुसावळ तालुक्यातील कु:हे पानाचे या गावातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या यशोगाथा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यासोबतच शेतकरी व शासकीय अधिका:यांचे मनोगत  देण्यात आले आहे.