शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

अवकाळी पावसाचा पुन्हा बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:23 IST

पिकांचे नुकसान : काही भागात जोरदार तर काही ठिकाणी लावली तुरळक हजेरी

जळगाव : जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसा अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. बुधवारी रात्री पडलेल्या पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर लगेचच पावसाने कमी- अधिक प्रमाणात पुन्हा हजेरी लावत शेतकऱ्यांचे थोड्या-फार प्रमाणात नुकसान केले आहे.काही भागात हलक्या सरी कोसळल्याधरणगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, तसेच पाचोºयासह सामनेर येथे व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. दिवसभर आभ्राच्छादीत वातावरण होते. यामुळे पाऊस पडेल की काय, असो वाटत होते. हा पाऊस गहू, हरभरा व इतर पिकांसाठी हानीकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.चाळीसगाव परिसरात जोरदार सलामीअवकाळी पावसाने परिसरात शुक्रवारी पहाटे व सकाळी पावणे नऊ वाजता पुन्हाजोरदार सलामी दिली. मात्र कृषी विभागाकडे कोणत्याही नुकसानीची नोंद नाही.गेल्या तीन ते चार दिवसांपासून चाळीसगाव परिसरात ढगाळ हवामान आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ३० मिनिटे पाऊस झाला. सकाळी पुन्हा नऊ वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. जवळपास ४५ मि. पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.दरम्यान वाघडू ता चाळीसगाव परिसरात गहू , हरभरा, मका, बाजरी, ज्वारी ही प्रमुख पिके कापणीवर आलेली असताना शुक्रवारी पहाटे पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे.उंबरखेडला गहू, बाजरी, मका, हरभरा जमीनदोस्तउंबरखेड ता.चाळीसगाव : येथे रोजी सायंकाळी तासभर आणि २८ रोजी सकाळी चार वाजता दीड तास विजांच्या कडकडाटात व वादळी वाºयासह जोरदार पावसाने गहू , बाजरी, मका, ज्वारीचे उभे पीक आडवे झाल्याने काढणीवर आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पीक आडवे झाल्यामुळे काढणीचे काम जिकिरीचे झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.यावल तालुक्यात गहू आणि कांद्याचे नुकसानयावल शहर व परीसरात गुरूवारी रात्री व शुक्रवारी दुपारी कमी-अधिक प्रमाणात पाउस झाला आहे. या पावसाने गहु, हरभरा, व कांद्याचे काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचे शेतक-यांमध्ये बोलले जात आहे.तालुक्यात गुरूवारी रात्री सौखेडा, दहीगाव परीसरात तर शुक्रवारीही तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.मात्र याबाबत येथील महसुल प्रशासनाकडे कोणतीही नुकसानीची नोद नाही.भडगाव तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसानभडगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरणासह विजेच्या कडकडाटात अर्धा ते पाउणतास कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामळे गहु, हरभरा, मका आदी पिकांची कापणी करुन ठेवल्या पिकांचे नुकसान झाले आहे. हा माल खराब झाला आहे. भातखंडे, गुढे आदी ठिकाणीही अनेक शेतकºयांना फटका बसला आहे.