सध्या मधून-मधून होणारा अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा, यासाठी वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ्लेक्स, बॅनर्स, प्लास्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो.
याशिवाय सैल झालेले गार्डिंग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करणे अपेक्षित आहे. वीज रोहित्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे. रोहित्रांचे अर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर्स या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करणे. फांद्या तोडणे, फुटलेले पिन आणि इन्सुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, वाहिन्यांचे खराब झालेले लाइटनिंग अरेस्टर बदलणे, भूमिगत वाहिन्यांचे तात्पुरते असलेले जॉइंट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदलणे, जीर्ण झालेल्या वायर बदलणे, जळालेल्या-टलेल्या वायर बदलणे आदी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मे महिन्याच्या उत्तरार्धातच केली जावीत यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी सूचना केली होती.
ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार दाखल
महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होत असतो. यामुळे उन्हाळा व त्यानंतर लगेच सुरू होणारा पावसाळा, हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा, यासाठी मान्सूनपूर्व कामे महावितरणने कोणत्या अधिकृत एजन्सीला काम दिले आहे, अशी विचारणा केली असता अधिकारी वर्गाने उत्तर देण्यास असमर्थता दर्शवली म्हणून शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे.
दरवर्षीप्रमाणे भुसावळ शहरात मान्सूनपूर्व कामांची सुरुवात जून महिन्यात केली जाते, असे चित्र आहे.