शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

अवसायक कंडारे याने सीआयडीचीही दिशाभूल केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:16 IST

सण्डे मुलाखत जळगाव : बीएचआरमधील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, अवसायक जितेंद्र कंडारे याच्या जागी दुसऱ्या अवसायकाची नियुक्ती करावी तसेच ...

सण्डे मुलाखत

जळगाव : बीएचआरमधील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, अवसायक जितेंद्र कंडारे याच्या जागी दुसऱ्या अवसायकाची नियुक्ती करावी तसेच संस्थेतील गैरव्यवहाराबाबत १४ जून २०१६ ते ११ जुलै २०२० या कालावधीत केंद्रीय सहकारमंत्री, केंद्रीय सहकार संचालक, पोलीस महासंचालक, सीआयडी, ईडी यांसह इतर ठिकाणी ४२ तक्रारी केल्या. खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत जाऊन प्रत्यक्ष अधिकारी व मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. सातत्याने पाठपुरावा केला, तेव्हा कुठे कारवाईचे सत्र सुरू झाले. दरम्यान, चौकशीदरम्यान अवसायक कंडारे याने सीआयडीचीही तपासात दिशाभूल केली, अशी माहिती ठेवीदारांसाठी लढणाऱ्या ॲड. कीर्ती रवींद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.

प्रश्न : तुम्ही हा लढा कधीपासून सुरू केला. याआधी कधी चर्चा झाली नाही?

ॲड. कीर्ती पाटील : खरे तर २०१६ मध्येच बीएचआरबाबत सीबीआय, ईडी, सीव्हीसी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्याकडे तक्रारी करून चौकशीची मागणी केली. या विभागाकडून राज्याकडे पत्रव्यवहार व चौकशी सुरू झाल्या होत्या. मात्र, त्याची चर्चा झाली नाही. २०१८ पासून आतापर्यंत ४२ तक्रारी केल्या. काही वेळा मला चौकशीसाठी बोलावण्यात आले. आपण यंत्रणेच्या कार्यालयात जाऊन संपूर्ण माहिती दिली. याबाबत मी देखील कधीच प्रसारमाध्यमांना माहिती दिली नाही.

प्रश्न : बीएचआर संस्थेकडून तुम्हाला काय माहिती मिळाली?

ॲड. कीर्ती पाटील : संस्थेकडून माहितीच मिळत नव्हती. अवसायक कंडारे सतत टाळाटाळ करायचे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याला बोलावण्यात आले. मात्र, तेव्हा देखील मी केंद्राला बांधील आहे, राज्याला नाही, असे सांगून माहिती देणे टाळले. वकील म्हणून जेव्हा नियम व पोटनियमांची जाणीव करून दिली. तेव्हा पंधरा दिवसांत माहिती देतो, म्हणून सांगितले व तेव्हा देखील कंडारेने हात वर केले. शेवटी सुलोचना कर्नावट यांच्या माध्यमातून माहिती अधिकाराचा वापर केला. तत्कालीन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती मिळविली.

प्रश्न : आता पुढे काय भूमिका असणार

ॲड. कीर्ती पाटील : संचालक, अवसायक यांनी संस्थेचे वाटोळे केले आहे. अजूनही संस्थेच्या ताब्यात किती मालमत्ता आहेत. त्या विक्री करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी कशा परत करता येतील, यासाठी प्रयत्न राहणार आहे. प्रामाणिक अवसायकाची येथे निवड व्हावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. अनेक ठेवीदारांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांना ठेवी मिळालेल्या नाहीत. अनेकांच्या मुलांचे लग्न, शिक्षण व इतर कार्य याच ठेवींवर अवलंबून आहे व होते. त्यामुळे शेवटच्या ठेवीदाराला त्याची रक्कम कशी मिळेल, यासाठी पाठपुरावा करू.

इन्फो....

जाणूनबुजून कर्ज बुडविले

संस्थेतील अनेक कर्जदारांनी क्षमता असतानाही जाणूनबुजून कर्ज बुडविले आहे. त्याचा फटका ठेवीदारांना बसत आहे. बीएचआरने मालमत्ता त्यांच्या जवळच्या लोकांना कमी दरात विक्री केलेल्या आहेत. ३ मार्च २०१५ पासून संस्थेचे लेखापरीक्षण झाले नाही. नाशिकच्या एका लेखापरीक्षकाच्या लेखापरीक्षणात संस्थेत अनेक त्रुट्या आढळून आल्याने कंडारे याने त्यांना काढून टाकले. त्यामुळे तेव्हा लेखापरीक्षण अपूर्णच राहिले. सीआयडीचे अधिकारी तपासाला आले असता त्यांनाही पूर्ण माहिती न देता दिशाभूल करण्यात आली.

कोण आहेत ॲड. कीर्ती पाटील

ॲड. कीर्ती पाटील या माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या पत्नी आहेत. न्हावी (ता. यावल) येथील त्यांचे माहेर आहे. २०१५ पासून त्या जळगाव न्यायालयात वकिली करतात. इनरव्हील क्लब जळगाव ईस्ट, बॉक्स ऑफ हेल्थ व व्हीनस फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवा करतात. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्या सिनेट सदस्य आहेत. २०१७ पासून त्यांनी बीएचआर ठेवीदारांशी कायदेशीर मार्गाने लढा उभारला.

--