शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

तब्बल २४ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे २४ तासांपासून खंडित ...

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे २४ तासांपासून खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी सुरळीत झाला. यामुळे अंधारात चाचपडत असलेल्या निम्मे भुसावळवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

महामार्गाचे काम सुरू असून खेडी १३२ उपकेंद्रावरून तापीनगर केंद्राला वीज जोडणी करणाऱ्या अंडर ग्राउंड ३३ के.व्ही. टेबल किट २३ रोजी सकाळी अकराला जळाली. याचा परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर झाला. यामुळे अर्धे भुसावळकर हे अंधारात होते.

दुरुस्तीसाठी जळगावहून विशेष पथक

दुरुस्तीसाठी जळगाव येथून विशेष पथक बोलावण्यात आल्यानंतर अथक परिश्रम केल्याने १७७ मीटर ३३ के.व्ही.ची नवीन केबल टाकल्यानंतर अखेर २४ रोजी दुपारी दुपारच्या सुमारास गेल्या २४ तासांपासून खंडित असलेला वीजपुरवठा सुरळीत झाला.

तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी

दरम्यान, खंडित पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत करण्यासाठी साकेगाववरून वीज जोडणी करण्यात आली होती. विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पी.आर. घोरूडे, विभागीय अभियंता रवींद्र पद्मे व लाईनमनसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा जळालेली केबल बदलण्यासाठी घटनास्थळी युद्धपातळीवर कार्य करीत होता. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरच त्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

अंडर ग्राऊंड केबलमध्ये बिघाड

अंडर ग्राऊंड केबलमध्ये बिघाड झाल्याने अर्धे भुसावळ शहर अंधारात बुडाले होते. रेल्वे रुळाकडील उत्तरेकडचा संपूर्ण भागाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांकडून सातत्याने वीजपुरवठा केव्हा सुरळीत होईल? याबाबत विचारणा केली जात होती. शांतीनगर, तापी नगर, जुना सातारा गरुड प्लॉट, म्युनिसिपल पार्क, जळगाव रोड, यावल रोड, मामाजी टॉकीज रोड तसेच तसेच शहरातील अनेक भागांमध्ये बत्ती गूल झाल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले.

दुष्काळात तेरावा महिना

शहरात तापी पात्रामध्ये मुबलक पाणी असूनसुद्धा शहरवासीयांचा घसा कोरडाच आहे. कधी जीर्ण जलवाहिनी लिकेज होते, तर कधी ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड होतो, तर कधी महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यात नको त्या ठिकाणी जलवाहिनी फुटते. अशा अनेक कारणांमुळे शहराला होणारा पाणीपुरवठा रोटेशननुसार एक ते दोन दिवस पुढे टाकला जातो. यातच दुष्काळात तेरावा महिना वीजपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम सरळ पाणीपुरवठ्यावर झाल्यामुळे ज्या भागात बुधवारी सकाळी रोटेशननुसार पाणीपुरवठा करण्यात येणार होता. तो आता पुढे ढकलला गेला आहे. तसेच येणारे पाणीसुद्धा गढूळ येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

विजेवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे झाले हाल

लॉकडाऊनमध्ये हाताला काम नव्हते. आता हळूहळू परिस्थिती रुळावर येत आहे. मात्र ज्या व्यावसायिकांचे व्यवसाय विद्युत उपकरणावर अवलंबून असतात अशा व्यावसायिकांना बुधवारपासून मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. नागरिकांच्या घेतलेल्या ऑर्डरी वेळेवर देऊ न शकल्याने अनेकांशी तू तू मै मैसुद्धा झाले. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर कालपासून हातावर हात घेऊन बसलेल्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला गती मिळाली.

विद्यार्थ्यांचे झाले हाल

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अभ्यासाला बसलेले अनेक विद्यार्थी अंधारामुळे अभ्यास करू शकले नाही. तसेच जे विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करत होते वीज नसल्यामुळे मोबाइल चार्ज झाल्याने त्यांनाही ऑनलाइन अभ्यास करता आला नाही.

३३ के.व्ही. केबल किट जळाली होती, ती नवीन टाकली. नक्की दोष कुठे आहे ते शोधायला वेळ गेला. नंतर जळगावहून नवीन किट आणल्यानंतर संपूर्ण शहराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यापूर्वी साकेगाव फिडरवरून ज्या ठिकाणी शक्य झाले त्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

-प्रदीप घोरूडे, कार्यकारी अभियंता, विद्युत वितरण कंपनी कार्यालय, भुसावळ

२४ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. लहान मुलांचा अभ्यास बुडाला. याशिवाय विद्युत उपकरणावर अवलंबून असलेला व्यवसायही होऊ शकला नाही. तसेच पाणीपुरवठा न झाल्यामुळे हाल झाले, ते वेगळेच.

-अविनाश गवळी, व्यावसायिक, भुसावळ.