जामनेर : येथील भूमी अभिलेख कार्यालयाने वीज बिल न भरल्याने तब्बल 20 दिवसांपासून वीजपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. थकीत बिल हे सुमारे 14 हजार 480 आहे. वीजपुरवठा बंद असल्याने कार्यालयीन ऑनलाइन कामकाज ठप्प झाले आहे.या कार्यालयामार्फत शेतीची मोजणी केली जाते व त्यासाठी भरावयाच्या रकमेचे ऑनलाइन चलन संगणकाकडून काढावे लागते. शेतक:यांना द्यावयाच्या नोटिसादेखील या संगणकीकृतच दिल्या जात असल्याने ही सर्व कामे खोळंबली आहेत.असे असले तरी ज्यांना तातडीने काम करून घ्यायचे आहे ते बाहेरील खा2गी संगणक केंद्रावर जाऊन ऑनलाइन काम करीत आहे.या कार्यालयाचे उपअधीक्षक अशोक देशमुख यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, वीज बिल भरण्यासाठीची रक्कम न मिळाल्याने पुरवठा खंडित झाला. वरिष्ठांकडून निधी उपलब्ध झाला असून येत्या दोन दिवसात वीज बिल भरले जाईल.माङया शेतजमिनीची मोजणी करावयाची असल्याने कार्यालयाकडे मागणी अर्ज दिला. मात्र वीज खंडित असल्याने काम होऊ शकले नाही. मात्र मला कामाची तातडी असल्याने बाहेरून चलन प्रिंट करून घेतल़े-रंगलाल राठोड, शेतकरी, कुंभारी
्रजामनेरला भूमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 00:33 IST