शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संत मुक्ताई पालखीसोबत १०० वारकऱ्यांना परवानगी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यावर्षी राज्य सरकारने आषाढी एकादशीच्या वारीसाठी १०० वारकऱ्यांना पंढरपूरला पायी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यावर्षी राज्य सरकारने आषाढी एकादशीच्या वारीसाठी १०० वारकऱ्यांना पंढरपूरला पायी जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी श्रीसंत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्रीसंत मुक्ताईचा पालखी सोहळ्याचे १४ जून रोजी प्रस्थान होणार आहे. यावर्षी सुदैवाने वारी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीअंशी कमी झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आषाढीच्या वारीसाठी पालखी सोहळ्यासोबत १०० वारकऱ्यांना पायी चालत जाण्याची परवानगी द्यावी. वारकरी बांधव शिस्त पाळून पालखी सोहळ्यात सहभागी होतील, असे श्रीसंत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रमुख मानाच्या पालख्यांपैकी एक पालखी

दरवर्षी आषाढी एकादशीच्या वारीसाठी मुक्ताईनगर येथून श्रीसंत मुक्ताई पालखी निघत असते. राज्यातील प्रमुख मानाच्या पालख्यांपैकी एक असलेली संत मुक्ताईच्या पालखीचे राज्यात सर्वप्रथम प्रस्थान होते. पंढरपूरजवळ वाखारी येथे संत मुक्ताईच्या पालखीसोबत श्रीसंत तुकाराम, श्रीसंत ज्ञानेश्वर, श्रीसंत सोपानदेव यांच्या पालख्या भेटतात. नंतर पालख्या एकत्रितपणे पंढरपूरला दाखल होतात.

राज्य सरकारप्रमाणे आमचीही जबाबदारी आहे, हे भान जपत आम्ही वारी पूर्ण करू. वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा कायम राहावी, म्हणून राज्य सरकारने दोन दिवसांत आम्हाला सकारात्मक निर्णय द्यावा, अशी मागणी ॲड. रवींद्र पाटील यांनी केली.