शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

संयम आवश्यक, पहिल्या अनलॉकनंतरची पुनरावृत्ती नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध हटवित काही बंधनांसह जिल्हा अनलॉक तर झाला, मात्र आता पहिल्या अनलॉकनंतर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध हटवित काही बंधनांसह जिल्हा अनलॉक तर झाला, मात्र आता पहिल्या अनलॉकनंतर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी सर्वांचा संयम आवश्यक राहणार असून यातूनच सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासह रोजगार व अर्थचक्रही सुरळीत राहण्यास मदत होऊ शकणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी तब्बल सहा महिने लागले. त्यानंतर मात्र फेब्रुवारी महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा जिल्हावासीयांसह प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांची चिंता वाढली. या सोबतच पुन्हा निर्बंध लावावे लागले व अर्थचक्र पुन्हा एकदा थांबले. त्यानंतर प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्यासह वेगवेगळ्या उपाययोजना करीत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणला. यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहेच. यामुळेच अनलॉकच्या पाच टप्प्यात जळगाव जिल्हा पहिल्याच टप्प्यात राहू शकला. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर दोन टक्क्यांच्या खाली येण्यासह जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची उपलब्धताही निकषापेक्षा कितीतरी अधिक आहे. या सर्व कारणांमुळे जिल्हा अनलॉक झाला. यामुळे आता सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत होणार असून रोजंदारीने काम करणाऱ्या व रोज व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्यांना मोठा आधार झाला आहे. इतकेच नव्हे करोडो रुपयांचा माल भरुन ठेवलेल्या व्यापारी बांधवांचाही व्यवसायाचा मार्ग खुला झाला आहे. हे सर्व दिलासादायक असले तरी आता पहिल्या लाटेनंतर झालेल्या चुका सर्वांनीच टाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या अनलाॅकनंतर सणासुदीचा काळ सुरू झाला व त्या वेळी बाजारपेठेत कधी नव्हे एवढी गर्दी होऊ लागली. या सोबतच सामाजिक समारंभ, लग्न समारंभ, अंत्यविधी या साठी घालून दिलेल्या निर्बंधाकडे दुर्लक्ष करीत सर्वच ठिकाणी मोठी गर्दी होऊ लागली. यात राजकारणी मंडळीदेखील मागे राहिले नाही. राजकीय कार्यक्रम, बैठका, आंदोलन, दौरे करण्याचा धडाका सुरू झाला. यात भरात भर म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान व निकालावेळी झालेली गर्दी सर्वांचीच चिंता वाढविणारी होती. हे होत नाही की पुन्हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पुढारी मंडळींचे जिल्हा दौरे झाल्याने मोठा संसर्ग वाढीस वाव मिळाला. या सर्वांमध्ये बहुतांश जणांना तर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रीचाही विसर पडत गेला व ज्याची भीती होती ती खरी ठरत कोरोनाची दुसरी लाट आली व अनेकांना आपल्या आप्तस्वकीयांना गमवावे लागले. आता ही वेळ पुन्हा येऊ द्यायची नसल्यास अनलॉक झाले असले तरी नियमांचे पालन करणे, गर्दी टाळणे गरजेचे राहणार आहे. अन्यथा तिसरी लाट दूर नाही हे सामान्य नागरिक, व्यावसायिक यांच्यासह राजकारण्यांनीही लक्षात ठेवले पाहिजे.