शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

संयम आवश्यक, पहिल्या अनलॉकनंतरची पुनरावृत्ती नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध हटवित काही बंधनांसह जिल्हा अनलॉक तर झाला, मात्र आता पहिल्या अनलॉकनंतर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध हटवित काही बंधनांसह जिल्हा अनलॉक तर झाला, मात्र आता पहिल्या अनलॉकनंतर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी सर्वांचा संयम आवश्यक राहणार असून यातूनच सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासह रोजगार व अर्थचक्रही सुरळीत राहण्यास मदत होऊ शकणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी तब्बल सहा महिने लागले. त्यानंतर मात्र फेब्रुवारी महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा जिल्हावासीयांसह प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांची चिंता वाढली. या सोबतच पुन्हा निर्बंध लावावे लागले व अर्थचक्र पुन्हा एकदा थांबले. त्यानंतर प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्यासह वेगवेगळ्या उपाययोजना करीत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणला. यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहेच. यामुळेच अनलॉकच्या पाच टप्प्यात जळगाव जिल्हा पहिल्याच टप्प्यात राहू शकला. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर दोन टक्क्यांच्या खाली येण्यासह जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची उपलब्धताही निकषापेक्षा कितीतरी अधिक आहे. या सर्व कारणांमुळे जिल्हा अनलॉक झाला. यामुळे आता सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत होणार असून रोजंदारीने काम करणाऱ्या व रोज व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्यांना मोठा आधार झाला आहे. इतकेच नव्हे करोडो रुपयांचा माल भरुन ठेवलेल्या व्यापारी बांधवांचाही व्यवसायाचा मार्ग खुला झाला आहे. हे सर्व दिलासादायक असले तरी आता पहिल्या लाटेनंतर झालेल्या चुका सर्वांनीच टाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या अनलाॅकनंतर सणासुदीचा काळ सुरू झाला व त्या वेळी बाजारपेठेत कधी नव्हे एवढी गर्दी होऊ लागली. या सोबतच सामाजिक समारंभ, लग्न समारंभ, अंत्यविधी या साठी घालून दिलेल्या निर्बंधाकडे दुर्लक्ष करीत सर्वच ठिकाणी मोठी गर्दी होऊ लागली. यात राजकारणी मंडळीदेखील मागे राहिले नाही. राजकीय कार्यक्रम, बैठका, आंदोलन, दौरे करण्याचा धडाका सुरू झाला. यात भरात भर म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान व निकालावेळी झालेली गर्दी सर्वांचीच चिंता वाढविणारी होती. हे होत नाही की पुन्हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पुढारी मंडळींचे जिल्हा दौरे झाल्याने मोठा संसर्ग वाढीस वाव मिळाला. या सर्वांमध्ये बहुतांश जणांना तर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रीचाही विसर पडत गेला व ज्याची भीती होती ती खरी ठरत कोरोनाची दुसरी लाट आली व अनेकांना आपल्या आप्तस्वकीयांना गमवावे लागले. आता ही वेळ पुन्हा येऊ द्यायची नसल्यास अनलॉक झाले असले तरी नियमांचे पालन करणे, गर्दी टाळणे गरजेचे राहणार आहे. अन्यथा तिसरी लाट दूर नाही हे सामान्य नागरिक, व्यावसायिक यांच्यासह राजकारण्यांनीही लक्षात ठेवले पाहिजे.