शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संयम आवश्यक, पहिल्या अनलॉकनंतरची पुनरावृत्ती नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:19 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध हटवित काही बंधनांसह जिल्हा अनलॉक तर झाला, मात्र आता पहिल्या अनलॉकनंतर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध हटवित काही बंधनांसह जिल्हा अनलॉक तर झाला, मात्र आता पहिल्या अनलॉकनंतर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी सर्वांचा संयम आवश्यक राहणार असून यातूनच सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासह रोजगार व अर्थचक्रही सुरळीत राहण्यास मदत होऊ शकणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी तब्बल सहा महिने लागले. त्यानंतर मात्र फेब्रुवारी महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा जिल्हावासीयांसह प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांची चिंता वाढली. या सोबतच पुन्हा निर्बंध लावावे लागले व अर्थचक्र पुन्हा एकदा थांबले. त्यानंतर प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्यासह वेगवेगळ्या उपाययोजना करीत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणला. यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहेच. यामुळेच अनलॉकच्या पाच टप्प्यात जळगाव जिल्हा पहिल्याच टप्प्यात राहू शकला. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर दोन टक्क्यांच्या खाली येण्यासह जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची उपलब्धताही निकषापेक्षा कितीतरी अधिक आहे. या सर्व कारणांमुळे जिल्हा अनलॉक झाला. यामुळे आता सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत होणार असून रोजंदारीने काम करणाऱ्या व रोज व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्यांना मोठा आधार झाला आहे. इतकेच नव्हे करोडो रुपयांचा माल भरुन ठेवलेल्या व्यापारी बांधवांचाही व्यवसायाचा मार्ग खुला झाला आहे. हे सर्व दिलासादायक असले तरी आता पहिल्या लाटेनंतर झालेल्या चुका सर्वांनीच टाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या अनलाॅकनंतर सणासुदीचा काळ सुरू झाला व त्या वेळी बाजारपेठेत कधी नव्हे एवढी गर्दी होऊ लागली. या सोबतच सामाजिक समारंभ, लग्न समारंभ, अंत्यविधी या साठी घालून दिलेल्या निर्बंधाकडे दुर्लक्ष करीत सर्वच ठिकाणी मोठी गर्दी होऊ लागली. यात राजकारणी मंडळीदेखील मागे राहिले नाही. राजकीय कार्यक्रम, बैठका, आंदोलन, दौरे करण्याचा धडाका सुरू झाला. यात भरात भर म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान व निकालावेळी झालेली गर्दी सर्वांचीच चिंता वाढविणारी होती. हे होत नाही की पुन्हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पुढारी मंडळींचे जिल्हा दौरे झाल्याने मोठा संसर्ग वाढीस वाव मिळाला. या सर्वांमध्ये बहुतांश जणांना तर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रीचाही विसर पडत गेला व ज्याची भीती होती ती खरी ठरत कोरोनाची दुसरी लाट आली व अनेकांना आपल्या आप्तस्वकीयांना गमवावे लागले. आता ही वेळ पुन्हा येऊ द्यायची नसल्यास अनलॉक झाले असले तरी नियमांचे पालन करणे, गर्दी टाळणे गरजेचे राहणार आहे. अन्यथा तिसरी लाट दूर नाही हे सामान्य नागरिक, व्यावसायिक यांच्यासह राजकारण्यांनीही लक्षात ठेवले पाहिजे.