शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर गाड्या ‘बंद’ने व्यवसाय ‘लॉकच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST

भुसावळ : एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असतानाच मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या व प्रत्येकी दोन डोस घेतलेल्यांना ...

भुसावळ : एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असतानाच मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या व प्रत्येकी दोन डोस घेतलेल्यांना पासेस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. असे असले तरी अन्यत्र मात्र नोकरी तथा व्यवसायानिमित्त नियमित रेल्वेद्वारे ये-जा करणाऱ्यांसाठी अद्याप पासेसची सुविधा रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली नाही. दुसरीकडे विशेष गाड्या सुरू असल्या तरी पॅसेंजर सुरू न केल्यामुळे सामान्य प्रवाशांना अडचणीचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केवळ पॅसेंजर रेल्वेच अद्यापही लॉक का? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत.

भुसावळ येथून सावदा, रावेर, बराणपूर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मलकापूर, नांदुरा, शेगाव येथून व्यवसाय तथा नोकरीनिमित्ताने अनेक जण ये-जा करत आहेत. मात्र, त्यांना पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वे बोर्ड अद्याप या पॅसेंजर गाड्यांना परवानगी देत नाही.

या एक्स्प्रेस आहेत सुरू

अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, बिकानेर-सिकंदराबाद एक्स्प्रेस, ओखा- गुवाहाटी द्वारका एक्स्प्रेस, गांधीधाम पुरी एक्स्प्रेस यासह आणखी चार एक्स्प्रेस धावत आहे.

पॅसेंजर सुरू होण्याची प्रतीक्षा

मध्य रेल्वेअंतर्गत भुसावळ विभागातून जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या वर्धा भुसावळ, नागपूर-भुसावळ, नरखेड-भुसावळ भुसावळ-इटारसी, भुसावळ-कटनी यासह मुंबईकडे जाणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या आहेत. मात्र, प्रदीर्घ कालावधीपासून त्या बंद आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना अडचणीचे ठरत आहे.

व्यवसायावर परिणाम

सुखद, सुलभ, सुरक्षित, आरामदायी व कमी दरात प्रवास करण्यासाठी रेल्वेची ओळख आहे. ग्रामीण भागासह अनेक छोट्या-मोठ्या शहरांना जोडण्याकरिता पॅसेंजर गाडीचा प्रवास सोयीचा असतो. सकाळी पॅसेंजर गाडीने उद्योग व्यवसायासाठी निघाले की संध्याकाळी, रात्रीपर्यंत आरामात पॅसेंजर गाडी पकडून घरी येणे हा पूर्ण सर्वांचाच नित्य नियम होता. त्यामुळे चांगला व्यवसाय होत होता. मात्र, सद्य:स्थितीत पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे अनेकांना महागडा बस प्रवास परवडत नाही. यामुळे महागड्या प्रवासातच पैसे गेले तर दोन पैसे वाचतील कसे? यामुळे उद्योग-व्यवसाय ‘लॉक’ झालेले आहेत. पॅसेंजर गाड्या सुरू झाल्यास गोरगरिबांच्या त्या हाताला काम मिळेल, हे मात्र नक्की.

रेल्वेचा स्पेशल प्रवास परवडेना

एक्स्प्रेस रेल्वेचे भाडे अधिक आहे. आम्ही नियमित अपडाऊन करणारे आहोत. त्यामुळे आम्हाला परिस्थिती पूर्ववत होत असताना मुंबईतील लोकलप्रमाणे पासेसची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. पॅसेंजर रेल्वेही सुरू केल्यास अधिक सुलभ होईल. लसीचे डोस घेतले आहेत.

- नाझेर अहमद, अपडाऊन करणारे प्रवासी, भुसावळ

व्यवसाय झाला ‘लॉक’

‘पॅसेंजर गाडीने पूर्वी अगदी लहान सहान गावांनाही जाणे कमी भाड्यात सोयीचे होत होते. शिवाय वेळेचीही बचत होती. यामुळे दोन पैसे शिल्लक राहून संसाराचा गाडा ओढण्यासाठी मदत होत होती. मात्र, सद्य:स्थितीत चारचाकी वाहनाने महागडे भाडे लागणारा वेळ यामुळे व्यवसाय करणे जणू ‘लॉक’ झाले आहे.

-हिमांशू तिवारी, व्यावसायिक, भुसावळ