शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर गाड्या ‘बंद’ने व्यवसाय ‘लॉकच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST

भुसावळ : एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असतानाच मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या व प्रत्येकी दोन डोस घेतलेल्यांना ...

भुसावळ : एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असतानाच मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या व प्रत्येकी दोन डोस घेतलेल्यांना पासेस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. असे असले तरी अन्यत्र मात्र नोकरी तथा व्यवसायानिमित्त नियमित रेल्वेद्वारे ये-जा करणाऱ्यांसाठी अद्याप पासेसची सुविधा रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली नाही. दुसरीकडे विशेष गाड्या सुरू असल्या तरी पॅसेंजर सुरू न केल्यामुळे सामान्य प्रवाशांना अडचणीचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केवळ पॅसेंजर रेल्वेच अद्यापही लॉक का? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत.

भुसावळ येथून सावदा, रावेर, बराणपूर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मलकापूर, नांदुरा, शेगाव येथून व्यवसाय तथा नोकरीनिमित्ताने अनेक जण ये-जा करत आहेत. मात्र, त्यांना पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वे बोर्ड अद्याप या पॅसेंजर गाड्यांना परवानगी देत नाही.

या एक्स्प्रेस आहेत सुरू

अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, बिकानेर-सिकंदराबाद एक्स्प्रेस, ओखा- गुवाहाटी द्वारका एक्स्प्रेस, गांधीधाम पुरी एक्स्प्रेस यासह आणखी चार एक्स्प्रेस धावत आहे.

पॅसेंजर सुरू होण्याची प्रतीक्षा

मध्य रेल्वेअंतर्गत भुसावळ विभागातून जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या वर्धा भुसावळ, नागपूर-भुसावळ, नरखेड-भुसावळ भुसावळ-इटारसी, भुसावळ-कटनी यासह मुंबईकडे जाणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या आहेत. मात्र, प्रदीर्घ कालावधीपासून त्या बंद आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना अडचणीचे ठरत आहे.

व्यवसायावर परिणाम

सुखद, सुलभ, सुरक्षित, आरामदायी व कमी दरात प्रवास करण्यासाठी रेल्वेची ओळख आहे. ग्रामीण भागासह अनेक छोट्या-मोठ्या शहरांना जोडण्याकरिता पॅसेंजर गाडीचा प्रवास सोयीचा असतो. सकाळी पॅसेंजर गाडीने उद्योग व्यवसायासाठी निघाले की संध्याकाळी, रात्रीपर्यंत आरामात पॅसेंजर गाडी पकडून घरी येणे हा पूर्ण सर्वांचाच नित्य नियम होता. त्यामुळे चांगला व्यवसाय होत होता. मात्र, सद्य:स्थितीत पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे अनेकांना महागडा बस प्रवास परवडत नाही. यामुळे महागड्या प्रवासातच पैसे गेले तर दोन पैसे वाचतील कसे? यामुळे उद्योग-व्यवसाय ‘लॉक’ झालेले आहेत. पॅसेंजर गाड्या सुरू झाल्यास गोरगरिबांच्या त्या हाताला काम मिळेल, हे मात्र नक्की.

रेल्वेचा स्पेशल प्रवास परवडेना

एक्स्प्रेस रेल्वेचे भाडे अधिक आहे. आम्ही नियमित अपडाऊन करणारे आहोत. त्यामुळे आम्हाला परिस्थिती पूर्ववत होत असताना मुंबईतील लोकलप्रमाणे पासेसची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. पॅसेंजर रेल्वेही सुरू केल्यास अधिक सुलभ होईल. लसीचे डोस घेतले आहेत.

- नाझेर अहमद, अपडाऊन करणारे प्रवासी, भुसावळ

व्यवसाय झाला ‘लॉक’

‘पॅसेंजर गाडीने पूर्वी अगदी लहान सहान गावांनाही जाणे कमी भाड्यात सोयीचे होत होते. शिवाय वेळेचीही बचत होती. यामुळे दोन पैसे शिल्लक राहून संसाराचा गाडा ओढण्यासाठी मदत होत होती. मात्र, सद्य:स्थितीत चारचाकी वाहनाने महागडे भाडे लागणारा वेळ यामुळे व्यवसाय करणे जणू ‘लॉक’ झाले आहे.

-हिमांशू तिवारी, व्यावसायिक, भुसावळ