शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

संचारबंदीच्या काळात सापडले १८ हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ एप्रिल ते १ मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ एप्रिल ते १ मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, या पंधरा दिवसांच्या काळात नवीन रुग्णांची संख्या कमी झालेली नसली तरी तपासण्यांची संख्या वाढल्यामुळे नवीन रुग्ण लवकर समोर आले व गेल्या महिन्याच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण दोन टक्क्यांनी घसरले आहे. शिवाय, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही अधिक असल्याने हे एक दिलासादायक चित्र आहे.

गेल्या पंधरा दिवसानंतर १ मे रोजी प्रथमच रुग्णसंख्या १ हजाराखाली नोंदविण्यात आली होती. गेले दोन आठवडे ही संख्या १ हजारांवर स्थिर होती. मात्र, गेल्या महिन्याच्या तुलनेत गेले दोन आठवडे परिस्थिती नियंत्रणात असून बऱ्यापैकी बेडची उपलब्धता आहे. दुसरीकडे बरे होणारे रुग्ण वाढत असल्याची समाधानकारक स्थिती सर्वत्र असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

३१ मार्च ते १४ एप्रिल

टेस्टींग १, ३५, ९३३

बाधित १७,२५७

रिकव्हर १७,१०५

पॉझिटिव्हिटी : १२ टक्के

रिकव्हरी रेट एकत्रित : ८७.२२ टक्के

१५ एप्रिल ते १ मे

टेस्टींग १,७७,१५७

बाधित १८,७०८

रिकव्हरी १९,५५८

पॉझिटिव्हिटी १० टक्के

रिकव्हरी रेट एकत्रित ८९.६५ टक्के

रुग्ण वाढले मात्र, बाधितांचे प्रमाण घटले

अ) ३१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान व १५ एप्रिल ते १ मे या कालावधीतील विश्लेषण केले असता रुग्णसंख्या ही संचारबंदीच्या काळात अधिक वाढलेली आहे. मात्र, या कालावधीत ४० हजारांपर्यंत अधिक तपासण्या झालेल्या आहेत.

ब) बाधितांचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण १२ वरून १० टक्क्यांवर आले आहे. संचारबंदीचा परिणाम अजून आगामी पंधरा दिवसांनी समोर येईल, असेही काही तज्ज्ञ सांगतात.

क) संचारबंदी असली तरी तिचे पालन पूर्णत: होताना दिसत नव्हते. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी मात्र, टाळता येत नव्हती.

शहरातच अधिक रुग्ण

ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागातच अधिक रुग्ण आढळून येत आहेत. याचे कारण तपासण्यांची संख्या वाढविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यात जळगाव शहरात आता दररोज साधारण १५०० तपासण्या होत आहेत. त्यामानाने जळगाव ग्रामीणमध्ये मात्र, कमी चाचण्या होत आहेत. जळगाव शहरात सरासरी १५० रुग्ण आढळून येत आहेत. तर ग्रामीण भागात सरासरी ३० रुग्ण समोर येत आहेत. मात्र, शहरात गेल्या आठवडाभरापासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहेत. लॉकडाऊनमुळे शहरातील पॉझिटिव्हिटी घटली आहे. आधी ती ४० टक्यांवर होती. ती आता १० टक्क्यांवर आली आहे.