शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळात सापडले १८ हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ एप्रिल ते १ मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ एप्रिल ते १ मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, या पंधरा दिवसांच्या काळात नवीन रुग्णांची संख्या कमी झालेली नसली तरी तपासण्यांची संख्या वाढल्यामुळे नवीन रुग्ण लवकर समोर आले व गेल्या महिन्याच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण दोन टक्क्यांनी घसरले आहे. शिवाय, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही अधिक असल्याने हे एक दिलासादायक चित्र आहे.

गेल्या पंधरा दिवसानंतर १ मे रोजी प्रथमच रुग्णसंख्या १ हजाराखाली नोंदविण्यात आली होती. गेले दोन आठवडे ही संख्या १ हजारांवर स्थिर होती. मात्र, गेल्या महिन्याच्या तुलनेत गेले दोन आठवडे परिस्थिती नियंत्रणात असून बऱ्यापैकी बेडची उपलब्धता आहे. दुसरीकडे बरे होणारे रुग्ण वाढत असल्याची समाधानकारक स्थिती सर्वत्र असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

३१ मार्च ते १४ एप्रिल

टेस्टींग १, ३५, ९३३

बाधित १७,२५७

रिकव्हर १७,१०५

पॉझिटिव्हिटी : १२ टक्के

रिकव्हरी रेट एकत्रित : ८७.२२ टक्के

१५ एप्रिल ते १ मे

टेस्टींग १,७७,१५७

बाधित १८,७०८

रिकव्हरी १९,५५८

पॉझिटिव्हिटी १० टक्के

रिकव्हरी रेट एकत्रित ८९.६५ टक्के

रुग्ण वाढले मात्र, बाधितांचे प्रमाण घटले

अ) ३१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान व १५ एप्रिल ते १ मे या कालावधीतील विश्लेषण केले असता रुग्णसंख्या ही संचारबंदीच्या काळात अधिक वाढलेली आहे. मात्र, या कालावधीत ४० हजारांपर्यंत अधिक तपासण्या झालेल्या आहेत.

ब) बाधितांचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण १२ वरून १० टक्क्यांवर आले आहे. संचारबंदीचा परिणाम अजून आगामी पंधरा दिवसांनी समोर येईल, असेही काही तज्ज्ञ सांगतात.

क) संचारबंदी असली तरी तिचे पालन पूर्णत: होताना दिसत नव्हते. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी मात्र, टाळता येत नव्हती.

शहरातच अधिक रुग्ण

ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागातच अधिक रुग्ण आढळून येत आहेत. याचे कारण तपासण्यांची संख्या वाढविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यात जळगाव शहरात आता दररोज साधारण १५०० तपासण्या होत आहेत. त्यामानाने जळगाव ग्रामीणमध्ये मात्र, कमी चाचण्या होत आहेत. जळगाव शहरात सरासरी १५० रुग्ण आढळून येत आहेत. तर ग्रामीण भागात सरासरी ३० रुग्ण समोर येत आहेत. मात्र, शहरात गेल्या आठवडाभरापासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहेत. लॉकडाऊनमुळे शहरातील पॉझिटिव्हिटी घटली आहे. आधी ती ४० टक्यांवर होती. ती आता १० टक्क्यांवर आली आहे.