शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
2
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
3
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
4
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
5
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
6
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: “हे आम्ही खपवून घेणार नाही”; मतदान केल्यावर राज ठाकरेंचा इशारा
7
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
8
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
9
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
10
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
11
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
12
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
13
२१ जानेवारीपासून अमेरिकेची दारे बंद! ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया रोखली; भारतावर काय होणार परिणाम?
14
मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
15
PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
16
निवृत्तीची चिंता संपली! पोस्टाची 'ही' स्कीम करेल मालामाल; दरमहा होईल ₹२०,००० ची कमाई, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल
18
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
19
काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव 
20
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एकूण कोरोना चाचण्यांपैकी अजूनही १० टक्के अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना सदृश लक्षणे असलेल्या नागरिकांची प्राधान्याने कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना सदृश लक्षणे असलेल्या नागरिकांची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाख २२३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून चाचण्यांचा १४ लाखांचा टप्पा पार झाला आहे. यात २३ जुलैपर्यंत एक लाख ४२ हजार ५५२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. एकूण कोरोना चाचण्यांपैकी १० टक्के अहवाल पॉझिटिव्ह असून यात अँटिजन चाचण्यांचे ९.१२ तर आरटीपीसीआर चाचण्यांमधून १२.२५ टक्के पॉझिटिव्ह अहवाल आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब असली तरी भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हावासीयांनी यापुढेही कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

‘ट्रिपल टी’वर भर

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २८ मार्च २०२० रोजी आढळून आला होता. तेव्हापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ट्रिपल टी’ (ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट)वर भर दिला असून यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या.

३०८ अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या १४ लाख २२३ व्यक्तींच्या कोरोना चाचण्यांपैकी ९ लाख २८ हजार २३६ व्यक्तींची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली असून यापैकी ८४ हजार ७३२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर ४ लाख ७१ हजार ९८७ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्या पैकी ५७ हजार ८२० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच १ हजार ९०४ इतर अहवाल आढळले असून सध्या ३०८ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण यांनी दिली.

नियमांचे पालन करा

त्वरीत निदान, त्वरित उपचार या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीस कोरोनासदृश लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरित नजीकच्या रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी जिल्हावासीयांनी यापुढेही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.