शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जिल्ह्यात एकूण कोरोना चाचण्यांपैकी अजूनही १० टक्के अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना सदृश लक्षणे असलेल्या नागरिकांची प्राधान्याने कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना सदृश लक्षणे असलेल्या नागरिकांची प्राधान्याने कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाख २२३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून चाचण्यांचा १४ लाखांचा टप्पा पार झाला आहे. यात २३ जुलैपर्यंत एक लाख ४२ हजार ५५२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. एकूण कोरोना चाचण्यांपैकी १० टक्के अहवाल पॉझिटिव्ह असून यात अँटिजन चाचण्यांचे ९.१२ तर आरटीपीसीआर चाचण्यांमधून १२.२५ टक्के पॉझिटिव्ह अहवाल आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब असली तरी भविष्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हावासीयांनी यापुढेही कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

‘ट्रिपल टी’वर भर

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २८ मार्च २०२० रोजी आढळून आला होता. तेव्हापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ट्रिपल टी’ (ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट)वर भर दिला असून यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या.

३०८ अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या १४ लाख २२३ व्यक्तींच्या कोरोना चाचण्यांपैकी ९ लाख २८ हजार २३६ व्यक्तींची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली असून यापैकी ८४ हजार ७३२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर ४ लाख ७१ हजार ९८७ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्या पैकी ५७ हजार ८२० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तसेच १ हजार ९०४ इतर अहवाल आढळले असून सध्या ३०८ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण यांनी दिली.

नियमांचे पालन करा

त्वरीत निदान, त्वरित उपचार या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीस कोरोनासदृश लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरित नजीकच्या रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी जिल्हावासीयांनी यापुढेही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.