शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

१५ पैकी फक्त भुसावळ तालुका हगणदरीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 00:05 IST

शौचालये उभारणीकडे दुर्लक्ष : वाईट स्थिती असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश

जळगाव : हगणदरीमुक्तीबाबत खराब कामगिरी असलेल्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश आहे. या आठ जिल्ह्यांमध्येही जळगाव मागेच असून, अजून दोन लाख ४१ हजार व्यक्तिगत लाभाची शौचालये उभारण्याचे मोठे उद्दीष्ट जळगावला पूर्ण करायचे आहे. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यास ८० हजार शौचालये बांधायची होती. त्यातील फक्त ३८ हजार शौचालये आतापर्यंत उभारण्यात आली. या महिनाअखेरपर्यंत तब्बल ४२ हजार शौचालये जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला उभारायची आहेत. तर २०१७-१८ या वर्षात म्हणजेच पुढील वर्षभरात दोन लाख शौचालये बांधायची आहेत. पण या कामासंबंधी अशीच संथ गती राहिली तर हे उद्दीष्ट कसे पूर्ण होईल, अशी चिंता राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार मीणा यांनी गुरुवारीच आढावा बैठकीमध्ये व्यक्त केली. राज्यात नाशिक, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नगर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये व्यक्तीगत शौचालये उभारणीसंबंधीचे कामकाज संथ आहे. या जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त भुसावळ तालुका हगणदरीमुक्त झाला आहे. अलीकडेच या तालुक्याचा पालकमंत्र्यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. पं.स.सभापती राजेंद्र चौधरी यांनी सन्मान स्वीकारला होता.जिल्हा प्रशासनातर्फे हगणदरीबाबत मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी सामूहिक शौचालये नाहीत, ज्या ठिकाणी आहेत, तेथे पाण्याचा व स्वच्छतेचा अभाव असल्याने त्यांचा वापर होत नाही. त्याकडेही प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. शौचालयांची कामे दिवाळीनंतर सुरू झाली. आता कामांना वेग आला आहे. रोजचे अहवाल येत असून, त्यात कामाची गती दिसून येत आहे. या वर्षातील लक्ष्यांक महिनाअखेर पूर्ण होईल. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही पथनाट्य, दृक् माध्यमातून जनजागृती ग्रामपातळीवर केली. लोकांची मानसिकता बदलल्याशिवाय खºया अर्थाने यश मिळणार नाही. -राजन पाटील, उपमुख्य  कार्यकारी अधिकारी, जि.प.जलसंपदामंत्र्यांच्या मतदारसंघात बिकट स्थितीजलसंपदामंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात ९२ ग्रा.पं. आहेत. यातील अपवाद वगळता एकही ग्रा.पं. हगणदरीमुक्त झालेली नाही. या तालुक्याची हगणदरीमुक्तीसंबंधीची टक्केवारी ३६.५३ एवढी आहे.