शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

तिरपोळे, मांदुर्णे शाळांमध्ये फक्त सहा विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे आणि मांदुर्णे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये फक्त सहा विद्यार्थी आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे आणि मांदुर्णे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये फक्त सहा विद्यार्थी आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील तब्बल ६० जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे. त्यांच्या संच मान्यतेनंतर समायोजन होऊ शकते. किंवा त्याबाबतचा निर्णय होऊ शकतो.

जिल्हा परिषदेच्या शाळांची सध्या वाईट अवस्था आहे. या शाळांमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. तर विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक देण्यात येत असल्याने एकच शिक्षक विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. तर सध्या कोरोनाच्या काळात बहुतांश विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणदेखील बंद आहेत. त्यात पटसंख्येअभावी जिल्ह्यातील तब्बल ६० शाळा या संच मान्यतेनंतर बंद केल्या जाऊ शकता. त्यात उर्दु शाळा, मुलींच्या शाळांचादेखील समावेश आहे.

त्यात तब्बल ६० शाळांमध्ये शिकणाऱ्या शेकडो मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. प्राथमिक शाळेसाठी मुलांच्या राहण्याच्या जागेपासून एक किमी अंतरावर जी शाळा असेल त्यात त्याला प्रवेश देण्याचा निकष आहे. मात्र जर एक किमी अंतरात दुसरी शाळा नसेल तर तेथे समायोजन करण्याबाबत प्रश्न उपस्थित होतात. त्यासोबतच समायोजन करण्याचे किंवा शाळा बंद करण्याचे इतरही निकष आहेत. मात्र त्या प्रक्रियेला संच मान्यतेनंतर सुरुवात होणार आहे.

शिक्षकांचे काय?

या आधी ज्या शाळा समायोजित करण्यात आल्या होत्या. त्या शाळेच्या शिक्षकांचे समायोजन इतर शाळांमध्ये करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांचे काय?

प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षण देतांना शाळेचे अंतर किती हा निकष देखील तपासला जातो. त्यामुळे जवळच्या एक किमी अंतरातील शाळा नेमक्या कुठे आहेत. आणि त्या किती आहेत. हे तपासूनच शाळांचे समायोजन केले जाते. मात्र तसे न झाल्यास ग्रामीण भागातील मुले ही शाळा बाह्य होण्याची भीती आहे.

या शाळांची पटसंख्या २० च्या खाली

भोरटेक जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद उर्दु शाळा, शिरसाळे, खेड़ी, धावडे, शाळा क्रमांक तीन भडगाव, रेवती, तिरपोळे, मांदुर्णे, धुप घाट, मंहिदळे, फेकरी, कान्हळे, सोनवद, वडगाव यासह इतर गावांतील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. त्यामुळे या शाळांचे समायोजन होऊ शकते.

अशी आहे आकडेवारी

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा - १८२०

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा ६०

कोट - शाळांना समायोजित करायचे की नाही याचा निर्णय शासनाने संच मान्यता दिल्यावर केला जातो. त्यासोबतच प्राथमिक शाळांचे समायोजन किंवा शाळा बंद करण्याचे इतर निकष देखील असतात. - विजय पवार, गटशिक्षणाधिकारी, जि.प. जळगाव