शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

तिरपोळे, मांदुर्णे शाळांमध्ये फक्त सहा विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे आणि मांदुर्णे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये फक्त सहा विद्यार्थी आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे आणि मांदुर्णे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये फक्त सहा विद्यार्थी आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील तब्बल ६० जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे. त्यांच्या संच मान्यतेनंतर समायोजन होऊ शकते. किंवा त्याबाबतचा निर्णय होऊ शकतो.

जिल्हा परिषदेच्या शाळांची सध्या वाईट अवस्था आहे. या शाळांमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. तर विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक देण्यात येत असल्याने एकच शिक्षक विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. तर सध्या कोरोनाच्या काळात बहुतांश विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणदेखील बंद आहेत. त्यात पटसंख्येअभावी जिल्ह्यातील तब्बल ६० शाळा या संच मान्यतेनंतर बंद केल्या जाऊ शकता. त्यात उर्दु शाळा, मुलींच्या शाळांचादेखील समावेश आहे.

त्यात तब्बल ६० शाळांमध्ये शिकणाऱ्या शेकडो मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. प्राथमिक शाळेसाठी मुलांच्या राहण्याच्या जागेपासून एक किमी अंतरावर जी शाळा असेल त्यात त्याला प्रवेश देण्याचा निकष आहे. मात्र जर एक किमी अंतरात दुसरी शाळा नसेल तर तेथे समायोजन करण्याबाबत प्रश्न उपस्थित होतात. त्यासोबतच समायोजन करण्याचे किंवा शाळा बंद करण्याचे इतरही निकष आहेत. मात्र त्या प्रक्रियेला संच मान्यतेनंतर सुरुवात होणार आहे.

शिक्षकांचे काय?

या आधी ज्या शाळा समायोजित करण्यात आल्या होत्या. त्या शाळेच्या शिक्षकांचे समायोजन इतर शाळांमध्ये करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करून देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांचे काय?

प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षण देतांना शाळेचे अंतर किती हा निकष देखील तपासला जातो. त्यामुळे जवळच्या एक किमी अंतरातील शाळा नेमक्या कुठे आहेत. आणि त्या किती आहेत. हे तपासूनच शाळांचे समायोजन केले जाते. मात्र तसे न झाल्यास ग्रामीण भागातील मुले ही शाळा बाह्य होण्याची भीती आहे.

या शाळांची पटसंख्या २० च्या खाली

भोरटेक जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद उर्दु शाळा, शिरसाळे, खेड़ी, धावडे, शाळा क्रमांक तीन भडगाव, रेवती, तिरपोळे, मांदुर्णे, धुप घाट, मंहिदळे, फेकरी, कान्हळे, सोनवद, वडगाव यासह इतर गावांतील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. त्यामुळे या शाळांचे समायोजन होऊ शकते.

अशी आहे आकडेवारी

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा - १८२०

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा ६०

कोट - शाळांना समायोजित करायचे की नाही याचा निर्णय शासनाने संच मान्यता दिल्यावर केला जातो. त्यासोबतच प्राथमिक शाळांचे समायोजन किंवा शाळा बंद करण्याचे इतर निकष देखील असतात. - विजय पवार, गटशिक्षणाधिकारी, जि.प. जळगाव