शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

लॉकडाऊन नंतरच गाळेधारकांची भूमिका होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे ताब्यात घेऊन त्या गाळ्यांच्या लिलाव करण्याचा ठराव महासभेत मंजूर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे ताब्यात घेऊन त्या गाळ्यांच्या लिलाव करण्याचा ठराव महासभेत मंजूर केल्यानंतर अजूनही गाळेधारकांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शहरातील १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारक गेल्या दीड महिन्यांपासून संपावर आहेत. त्यात आता गाळेधारकांच्या विरोधातील प्रस्ताव महासभेने मंजूर केल्यामुळे गाळेधारकांची आंदोलनाची भूमिका नेमकी कशी राहील याबाबत आता लॉक डाऊन नंतरच गाळेधारक आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या प्रश्न प्रलंबित होता. यामुळे गाळेधारकांसह मनपाचे देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. अखेर १२ मे रोजी झालेल्या महासभेत बहुमताने मनपा प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव मंजूर केल्यामुळे आता थकीत भाडे वसूल करण्यासह गाळे कारवाईची प्रक्रियादेखील महापालिकेला करता येणार आहे. मात्र मनपा प्रशासनाचा प्रस्ताव गाळेधारकांना मान्य नसून याबाबत या प्रस्तावावर पूर्ण अभ्यास केल्यानंतरच गाळेधारक संघटना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. तोपर्यंत गाळे धारकांचा संप कायम कायम राहणार आहे. दरम्यान महासभेत मंजूर झालेल्या ठरावाबाबत देखील गाळेधारकांचे आक्षेप असून, विरोधी पक्ष असलेल्या भाजप सोबत हा ठराव विखंडित करण्यासाठी आता गाळेधारक व भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गाळेधारकांच्या सुनावणीस होणार सुरुवात ?

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळेधारकांच्या प्रश्नावर महासभेने मंजुरी दिल्यामुळे आता पुढील प्रक्रियेसाठी मनपा प्रशासनाकडून देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. मनपा प्रशासनाने मनपा अधिनियमातील ७९ क कलम अंतर्गत जे गाळेधारक नूतनीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. त्या गाळेधारकांचे प्रस्ताव मागवले जाणार आहेत. त्यानंतर सुनावणी प्रक्रिया घेऊन गाळेधारक नूतनीकरणासाठी पात्र की अपात्र याबाबतची चाचणी देखील करण्यात येणार आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थकीत भाडे वसूल करून मुदत संपलेले गाळे ताब्यात घेऊन लिलावाची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. जुलै महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी देखील आता मनपा प्रशासनाने केली आहे.