शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

चार दिवसांत फक्त ११५ प्रवाशांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्चपासून बंद असलेली राजधानी एक्स्प्रेस महिनाभरापासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली ...

कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्चपासून बंद असलेली राजधानी एक्स्प्रेस महिनाभरापासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली असून, ही गाडी आठवड्यातून चार दिवस धावत होती. त्यामुळे ही गाडी दररोज धावण्याबाबत प्रवाशांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात येत होती. याबाबत गेल्या महिन्यात खासदार उन्मेश पाटील यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेटही घेतली होती. खासदारांची ही मागणी मान्य करून, रेल्वे प्रशासनातर्फे १९ जानेवारीपासून दररोज मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस सोडण्यात येत आहे.

इन्फो :

प्रवाशांचा मात्र अत्यल्प प्रतिसाद :

१९ जानेवारीपासून दररोज धावणाऱ्या या राजधानी एक्स्प्रेसला जळगाव स्टेशनवर चार दिवसांत अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. या गाडीला भुसावळ स्टेशनवरही थांबा नसल्यामुळे, दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना जळगावला यावे लागते. नाशिकनंतर जळगावलाच थांबा असतानाही या गाडीला फारसा प्रतिसाद नसल्याचे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये १९ जानेवारी रोजी जळगावहून ११ प्रवासी बसले, २० जानेवारीला ४१ प्रवासी, २१ रोजी १७ प्रवासी तर २२ रोजी ४६ प्रवासी गेले. चार दिवसांत फक्त ११५ प्रवाशांनी लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश प्रवासी हे भोपाळ व आग्रा स्टेशनपर्यंतच जात असल्यामुळे, या गाडीला फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे.