शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा बसेना मेळ अन् टोमॅटोचा झाला खेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाघडू, ता. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टोमॅटो. या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाघडू, ता. चाळीसगाव तालुक्यातील

शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टोमॅटो. या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते; पण सहा महिने कांदा साठवणूक करूनही त्यातून चार पैसे पदरात पडत नसतील तर कांदा साठवणूक करायची कशाला, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्यातून तोटाच सहन करावा लागत आहे.

अडीच हजारांवर गेलेला कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही शेतकऱ्यांना सरासरी अकराशे ते बाराशे रुपये दराने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडल्याने पुढील खरिपातील लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत सडत असल्याने याचा तोटाही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना कांदाचाळी उभारण्यासाठी अनुदान दिले याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा चाळीची उभारणी केली; पण हाच कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही तोट्यावर विकावा लागत असेल त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर होणार आहे. साठवून ठेवलेल्या कांद्याचे चार पैसे होतील व त्या पैशावर आपण पुढील पिके उभे करू या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा मात्र तोंडचा घास पळाला आहे. पुढील पिके उभे करण्यासाठी आहे त्या भावाने कांदा विकावा लागत आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांना टोमॅटोतून बऱ्यापैकी पैसे मिळाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. एक एकर टोमॅटो पीक उभे करण्यासाठी एक लाख रुपयांच्या आसपास खर्च येतो. यामध्ये ड्रीप, बांबू, तार, मल्चिंग पेपर, सुतळी, मजुरी असा मोठ्या प्रमाणात खर्च करून शेतकऱ्यांना आज मात्र या टोमॅटो पिकातून खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो पिकामध्ये नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर जनावरांचा चारा म्हणून टोमॅटोचा उपयोग केला आहे. एकूणच कांदा आणि टोमॅटोच्या आगारात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र बिघडले असून, मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया

भाववाढीच्या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली; पण आता दिवसेंदिवस कांदा खराब होत असून, आधीच अडीच हजारांवर गेलेला कांदा अकराशे ते बाराशे रुपयांवर आल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

-भगवान राठोड, कांदा उत्पादक शेतकरी