शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा अपक्ष

By admin | Updated: October 20, 2014 10:01 IST

अमळनेर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेच्या प्रवाहाविरुद्ध कौल देत जनमानसात रुजलेल्या पक्षांना नाकारून पुन्हा एकदा अपक्ष उमेदवाराला संधी दिली आहे.

अमळनेर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेच्या प्रवाहाविरुद्ध कौल देत, भाजप, राष्ट्रवादी, कॉँग्रेस, शिवसेना यासारख्या जनमानसात रुजलेल्या पक्षांना नाकारून पुन्हा एकदा अपक्ष उमेदवाराला संधी दिली आहे. निवडणुकीत धनशक्तीचा जोर राहिला असला तरी, जनशक्तीही परिवर्तनासाठी एकवटली होती हेदेखील तेवढेच खरे आहे. तरुण व मराठेतर असलेल्या चौधरींनी दीड वर्षातच आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. सर्वप्रथम त्यांनी नगरपालिकेत सत्तांतर घडवून आणले. तेव्हाच विधानसभेचे निकालही अनपेक्षित लागू शकतील याची चुणूक मिळाली होती. पालिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांनी शहरात काही प्रमाणात कामेही केली. त्याचा परिपाक म्हणून, मतदारांनी त्यांना भरघोस मतदान केले. शिवाय या निवडणुकीला अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक असाही रंग दिला गेला होता. अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधी निवडण्याची ही संधी असल्याची भावनिक साद घातली गेली, त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला. राज्यात युती-आघाडीची जागा वाटपावरून बोलणीच सुरू राहिल्याने, या मतदारसंघातील भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे ठरत नसताना, चौधरींनी योग्य नियोजनाद्वारे इतर पक्षांच्या मानाने प्रचारातही आघाडी घेतली. त्याचा परिपाक विजयात झाला. आघाडी-युती फिसकटल्याने, चारही पक्ष स्वतंत्र लढले. भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. या निवडणुकीत कॉँग्रेसचे अस्तित्वही दिसले नाही. कॉँग्रेसच्या उमेदवाराला चारअंकी संख्या मोठय़ा मुश्किलीने गाठता आली. यावरून अमळनेर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे अस्तित्व किती शिल्लक राहिले आहे, याची सहज कल्पना येऊ शकेल. शिवसेनेने ऐनवेळी निवडणुकीचे शिवधनुष्य उचलले. मात्र ते त्यांना पेलवले नसले तरी, निवडणुकीत सेनेची कामगिरी ही कॉँग्रेसपेक्षा वरचढ ठरली, एवढी त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे. खरी लढाई भाजप व राष्ट्रवादी यांच्यात होणार अशी अपेक्षा होती. मात्र चौधरींनी या दोन पक्षांच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले होते. भाजपचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना नगरपालिकेच्या कारभाराचा मोठा फटका बसला. डॉ.बी.एस. पाटील यांच्या स्वगृही परतण्याने भाजपाला फायदा होईल ही अपेक्षाही फोल ठरली. राष्ट्रवादीचे सहयोगी असलेले साहेबराव पाटील यांनी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने, त्यांच्याबद्दलही एकप्रकारे नाराजीच होती. ही नाराजी मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. एकला चलो रे ही भूमिका मतदारांना जास्त दिवस चालत नाही, हे या निकालातून दिसून आले. अन्य पक्षांच्या उमेदवारांची मतदारांनी फारशी दखलही घेतलेली नाही. त्यांची उमेदवारी नावालाच राहिली.