शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पुन्हा एकदा अपक्ष

By admin | Updated: October 20, 2014 10:01 IST

अमळनेर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेच्या प्रवाहाविरुद्ध कौल देत जनमानसात रुजलेल्या पक्षांना नाकारून पुन्हा एकदा अपक्ष उमेदवाराला संधी दिली आहे.

अमळनेर विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेच्या प्रवाहाविरुद्ध कौल देत, भाजप, राष्ट्रवादी, कॉँग्रेस, शिवसेना यासारख्या जनमानसात रुजलेल्या पक्षांना नाकारून पुन्हा एकदा अपक्ष उमेदवाराला संधी दिली आहे. निवडणुकीत धनशक्तीचा जोर राहिला असला तरी, जनशक्तीही परिवर्तनासाठी एकवटली होती हेदेखील तेवढेच खरे आहे. तरुण व मराठेतर असलेल्या चौधरींनी दीड वर्षातच आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. सर्वप्रथम त्यांनी नगरपालिकेत सत्तांतर घडवून आणले. तेव्हाच विधानसभेचे निकालही अनपेक्षित लागू शकतील याची चुणूक मिळाली होती. पालिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर त्यांनी शहरात काही प्रमाणात कामेही केली. त्याचा परिपाक म्हणून, मतदारांनी त्यांना भरघोस मतदान केले. शिवाय या निवडणुकीला अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक असाही रंग दिला गेला होता. अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधी निवडण्याची ही संधी असल्याची भावनिक साद घातली गेली, त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला. राज्यात युती-आघाडीची जागा वाटपावरून बोलणीच सुरू राहिल्याने, या मतदारसंघातील भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे ठरत नसताना, चौधरींनी योग्य नियोजनाद्वारे इतर पक्षांच्या मानाने प्रचारातही आघाडी घेतली. त्याचा परिपाक विजयात झाला. आघाडी-युती फिसकटल्याने, चारही पक्ष स्वतंत्र लढले. भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. या निवडणुकीत कॉँग्रेसचे अस्तित्वही दिसले नाही. कॉँग्रेसच्या उमेदवाराला चारअंकी संख्या मोठय़ा मुश्किलीने गाठता आली. यावरून अमळनेर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे अस्तित्व किती शिल्लक राहिले आहे, याची सहज कल्पना येऊ शकेल. शिवसेनेने ऐनवेळी निवडणुकीचे शिवधनुष्य उचलले. मात्र ते त्यांना पेलवले नसले तरी, निवडणुकीत सेनेची कामगिरी ही कॉँग्रेसपेक्षा वरचढ ठरली, एवढी त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे. खरी लढाई भाजप व राष्ट्रवादी यांच्यात होणार अशी अपेक्षा होती. मात्र चौधरींनी या दोन पक्षांच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले होते. भाजपचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना नगरपालिकेच्या कारभाराचा मोठा फटका बसला. डॉ.बी.एस. पाटील यांच्या स्वगृही परतण्याने भाजपाला फायदा होईल ही अपेक्षाही फोल ठरली. राष्ट्रवादीचे सहयोगी असलेले साहेबराव पाटील यांनी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने, त्यांच्याबद्दलही एकप्रकारे नाराजीच होती. ही नाराजी मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. एकला चलो रे ही भूमिका मतदारांना जास्त दिवस चालत नाही, हे या निकालातून दिसून आले. अन्य पक्षांच्या उमेदवारांची मतदारांनी फारशी दखलही घेतलेली नाही. त्यांची उमेदवारी नावालाच राहिली.