शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

सत्ताधारी नाही, प्रशासक विचारेना, नशिराबादकरांचा वाली कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:22 IST

नगरपंचायतीची निवडणूक व्हावी यासाठी उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणूक वर टाकलेला बहिष्कार. त्यामुळे या ठिकाणी सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र ...

नगरपंचायतीची निवडणूक व्हावी यासाठी उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणूक वर टाकलेला बहिष्कार. त्यामुळे या ठिकाणी सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र गावकऱ्यांच्या समस्या वाढत असल्याने नशिराबादकरांचा वाली कोण? ग्रामस्थ अधांतरीच, असे आता बोलले जात आहे.

दिवसेंदिवस गावाचा विस्तार व लोकसंख्या वाढतच आहे. येथील पाण्यासह रस्ते गटारी आदी समस्या कायमच आहे. ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण गावातील विविध समस्या कायम असल्याने ग्रामस्थ कर भरीत नाही. पाणी, रस्ते, अतिक्रमण, गटारी, शौचालय, बंद असलेल्या ५६ सीसीटीव्ही कॅमेरे समस्यांबाबत कोणाला सांगायचे? हाच मुद्दा आहे. या संदर्भात अनेकदा ओरड होऊन ही दुर्लक्षच केले जाते. दरम्यान नशिराबाद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू असतांनाच नशिराबादचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याची उद्घोषणा झाली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ८२ पैकी ८१ जणांनी माघार घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकला व नगरपंचायतीची निवडणूक व्हावी, अशी मागणी केली. त्या संदर्भातदेखील हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र नगरपंचायतीची निवडणूक होणार केव्हा याची प्रतीक्षा ग्रामस्थांना कायम आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांनी माघार घेतली त्यामुळे सध्या प्रशासकीय राजवट आहे. पण दुर्दैवाने प्रशासकांचा येथे पत्ताच नाही. त्यामुळे कर्मचारीची वेतन कोण देणार? वेतन मिळत नाही म्हणून कर्मचाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. पण आश्वासन मिळाल्याने संप मागे घेतला. ग्रामस्थांनी कोणाजवळ दाद मागायची हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

थकीत वीज बिलामुळे गावातील तिघी आरो प्रणाली केंद्राची वीज कापण्यात आली आहे. शेळगाव बॅरेज येथून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यासोबत ग्रामपंचायत कार्यालयाची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार अंधारात आला आहे. गावातील मेनरोड बस स्थानक चौक, विडी गोडाऊनसह गावातील प्रमुख रस्त्यांवर दिवसागणिक अतिक्रमणांची वेढा वाढतच आहे काही ठिकाणी तर गटारी घाणीने तुडुंब भरलेले आहेत. या ठिकाणी डासांची उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र आता याची दखल घेणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इन्फो

संभाव्य पाणीटंचाईचे आतापासूनच नियोजन करा

संभाव्य पाणीटंचाईचे आतापासूनच नियोजन करण्यात यावे. गावातील तिघे आरो प्रणाली केंद्र पूर्ववत सुरू व्हावे. गावाला नियमित येणारा प्रशासक नेमावाव गावाला अधांतरी सोडू नये, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.