शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

सत्ताधारी नाही, प्रशासक विचारेना, नशिराबादकरांचा वाली कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:22 IST

नगरपंचायतीची निवडणूक व्हावी यासाठी उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणूक वर टाकलेला बहिष्कार. त्यामुळे या ठिकाणी सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र ...

नगरपंचायतीची निवडणूक व्हावी यासाठी उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणूक वर टाकलेला बहिष्कार. त्यामुळे या ठिकाणी सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र गावकऱ्यांच्या समस्या वाढत असल्याने नशिराबादकरांचा वाली कोण? ग्रामस्थ अधांतरीच, असे आता बोलले जात आहे.

दिवसेंदिवस गावाचा विस्तार व लोकसंख्या वाढतच आहे. येथील पाण्यासह रस्ते गटारी आदी समस्या कायमच आहे. ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण गावातील विविध समस्या कायम असल्याने ग्रामस्थ कर भरीत नाही. पाणी, रस्ते, अतिक्रमण, गटारी, शौचालय, बंद असलेल्या ५६ सीसीटीव्ही कॅमेरे समस्यांबाबत कोणाला सांगायचे? हाच मुद्दा आहे. या संदर्भात अनेकदा ओरड होऊन ही दुर्लक्षच केले जाते. दरम्यान नशिराबाद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू असतांनाच नशिराबादचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याची उद्घोषणा झाली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ८२ पैकी ८१ जणांनी माघार घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकला व नगरपंचायतीची निवडणूक व्हावी, अशी मागणी केली. त्या संदर्भातदेखील हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र नगरपंचायतीची निवडणूक होणार केव्हा याची प्रतीक्षा ग्रामस्थांना कायम आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांनी माघार घेतली त्यामुळे सध्या प्रशासकीय राजवट आहे. पण दुर्दैवाने प्रशासकांचा येथे पत्ताच नाही. त्यामुळे कर्मचारीची वेतन कोण देणार? वेतन मिळत नाही म्हणून कर्मचाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. पण आश्वासन मिळाल्याने संप मागे घेतला. ग्रामस्थांनी कोणाजवळ दाद मागायची हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

थकीत वीज बिलामुळे गावातील तिघी आरो प्रणाली केंद्राची वीज कापण्यात आली आहे. शेळगाव बॅरेज येथून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यासोबत ग्रामपंचायत कार्यालयाची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार अंधारात आला आहे. गावातील मेनरोड बस स्थानक चौक, विडी गोडाऊनसह गावातील प्रमुख रस्त्यांवर दिवसागणिक अतिक्रमणांची वेढा वाढतच आहे काही ठिकाणी तर गटारी घाणीने तुडुंब भरलेले आहेत. या ठिकाणी डासांची उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र आता याची दखल घेणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इन्फो

संभाव्य पाणीटंचाईचे आतापासूनच नियोजन करा

संभाव्य पाणीटंचाईचे आतापासूनच नियोजन करण्यात यावे. गावातील तिघे आरो प्रणाली केंद्र पूर्ववत सुरू व्हावे. गावाला नियमित येणारा प्रशासक नेमावाव गावाला अधांतरी सोडू नये, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.