शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

कलारुप तारुण्यच नव्हे तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 01:28 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शुभेच्छा कार्ड या सदरात लिहिताहेत साहित्यिक जयंत पाटील...

या शुभेच्छा कार्डासाठी पु.शि.रेगे यांच्या ‘मनवा’ या कथासंग्रहातून हा मजकूर घेतला आहे. मनू ‘त्या’ला पत्र लिहिते- फुलाच्या अगदी गाभ्यात जाण्याचा प्रयत्न करता कामा नये. तिथं एक नुसती पोकळी असणार आणि ती तशी राहाणं यातच त्या फुलांचं सौभाग्य आहे. हा इशारा जसा रसिकाला, तसाच तो फुलालाही समजायला पाहिजे. त्या फुलाचं विश्व, हे सगळं ज्याच्या हदयात नटून उभ आहे, त्याच्यासाठीच ही अनामिक पोकळी आहे. या पुढे मनू लिहिते, तुला मी जेव्हा प्रथम पाहिलं तेव्हा मला या म्हणण्याची प्रचिती आली. माझ्या हृदयपुष्पाचं सौभाग्य तुझ्यापाशी अगदी अखंड, अबाधित राहिलं ही मला खात्री पटली. तुला कदाचित वाटेल की, मी तुझ्या जीवनाशी खेळ केला. पण खरंच, रुप, मी तसं केलं नाही. सिस्टर हेलेनानं मला आपलं वारस केलं आणि आपलं हृद्गत माझ्या स्वाधिन केलं तेच मी या पत्रासोबत पाठवित आहे, तू माझा वारसा आहे. तुला विचार करता येतो, तो साध्या शब्दांत मांडता येतो. सगळ्यांना हे सांग ज्यांना कळेल ते उद्या आपले वारस ठरतील.मी पस्तीशीला पोहचलेलो पु.शि.रेगेंची कविता कथा, कादंबरी यांचा मला चांगलाच परिचय झालेला आणि वेड लागण्याइतकी आवड सावित्री, रेणू, अवलोकिता आणि मनू या मानस नायिकांनी आम्हां वाचक मित्रांची स्वप्नेच नव्हे तर जगणेही भावश्रीमंत आणि समृद्ध केले आहे.‘मनवा’मधील मनूबद्दल सुलभा हर्लेकर लिहितात, साहित्य प्रकारातून रेग्यांनी जीवनातील वास्तवाचे तरीही वास्तवा पलिकडचे वाटणारे, मनोज्ञ रुप पकडलेले आहे. त्यांच्या कथा आकाराने अतिशय लहान परंतु आशयघन आहेत. त्यांच्यातून ते जीवनाच्या चैतन्याची उमज कशी हळूहळू नळकत होत जाते ते दाखवतात. मनवा हा त्यांच्या कथासंग्रह रेग्यांच्या या कथा विश्वात पुरुष मनाला लागलेली चिरंतन ओढ सहजगत्या प्रगट झालेली दिसते. काव्यातील स्त्री प्रतिमा, तिचे सौंदर्य, तिच्या मनाचा ध्यास कथेत जशाच्या तसा प्रगट झाला आहे. रेग्यांच्या कथेतील स्त्री ही धीट, मोकळी आहे. तर पुरुष हा अनासक्त, कशातच न गुंतणारा स्थाणूकाय वृक्षासारखा आहे. रेगे कथांमधून चिंतनशील जाणिवांचा फारसा प्रत्येय देत नाहीत. मनू ही अपवाद. मोजक्या शब्दात परंतु कथेत येणारा प्रत्येक शब्द, प्रसंग हा त्या कथेचा अविभाज्य घटक बनून जातो. या शुभेच्छा कार्डाला माझे सन्मित्र स्व.पुणतांबेकर सर यांनी दि.४ जानेवारी १९८३ रोजी दिलेले उत्तर- फुलांची अनामिक पोकळी वास्तविक पोकळी नसून ती त्याच्या केशराचे मंदिर आहे. या केशरापर्यंत किती लोक पोचलेत! पाकळ्यांच्या रुपाला-रंगाला भुललेत लोक काही सुगंधालाही तुमच्यासारखे रसिकच पोहचू शकले आणि मंदिरात केशराच संस्पर्शाने तंद्रीभूत होऊन तुम्ही जे बीजग्रहण केलेत त्याचा प्रसव कलारुपाने हसता-खिदळता रुदन करतादेखील दिसून येतो आहे. हे कलारुप तारुण्यच नव्हे तर वृद्धत्वही पाहो हीच या मंगलप्रसंगी इच्छा.-जयंत पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव