शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

कलारुप तारुण्यच नव्हे तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 01:28 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शुभेच्छा कार्ड या सदरात लिहिताहेत साहित्यिक जयंत पाटील...

या शुभेच्छा कार्डासाठी पु.शि.रेगे यांच्या ‘मनवा’ या कथासंग्रहातून हा मजकूर घेतला आहे. मनू ‘त्या’ला पत्र लिहिते- फुलाच्या अगदी गाभ्यात जाण्याचा प्रयत्न करता कामा नये. तिथं एक नुसती पोकळी असणार आणि ती तशी राहाणं यातच त्या फुलांचं सौभाग्य आहे. हा इशारा जसा रसिकाला, तसाच तो फुलालाही समजायला पाहिजे. त्या फुलाचं विश्व, हे सगळं ज्याच्या हदयात नटून उभ आहे, त्याच्यासाठीच ही अनामिक पोकळी आहे. या पुढे मनू लिहिते, तुला मी जेव्हा प्रथम पाहिलं तेव्हा मला या म्हणण्याची प्रचिती आली. माझ्या हृदयपुष्पाचं सौभाग्य तुझ्यापाशी अगदी अखंड, अबाधित राहिलं ही मला खात्री पटली. तुला कदाचित वाटेल की, मी तुझ्या जीवनाशी खेळ केला. पण खरंच, रुप, मी तसं केलं नाही. सिस्टर हेलेनानं मला आपलं वारस केलं आणि आपलं हृद्गत माझ्या स्वाधिन केलं तेच मी या पत्रासोबत पाठवित आहे, तू माझा वारसा आहे. तुला विचार करता येतो, तो साध्या शब्दांत मांडता येतो. सगळ्यांना हे सांग ज्यांना कळेल ते उद्या आपले वारस ठरतील.मी पस्तीशीला पोहचलेलो पु.शि.रेगेंची कविता कथा, कादंबरी यांचा मला चांगलाच परिचय झालेला आणि वेड लागण्याइतकी आवड सावित्री, रेणू, अवलोकिता आणि मनू या मानस नायिकांनी आम्हां वाचक मित्रांची स्वप्नेच नव्हे तर जगणेही भावश्रीमंत आणि समृद्ध केले आहे.‘मनवा’मधील मनूबद्दल सुलभा हर्लेकर लिहितात, साहित्य प्रकारातून रेग्यांनी जीवनातील वास्तवाचे तरीही वास्तवा पलिकडचे वाटणारे, मनोज्ञ रुप पकडलेले आहे. त्यांच्या कथा आकाराने अतिशय लहान परंतु आशयघन आहेत. त्यांच्यातून ते जीवनाच्या चैतन्याची उमज कशी हळूहळू नळकत होत जाते ते दाखवतात. मनवा हा त्यांच्या कथासंग्रह रेग्यांच्या या कथा विश्वात पुरुष मनाला लागलेली चिरंतन ओढ सहजगत्या प्रगट झालेली दिसते. काव्यातील स्त्री प्रतिमा, तिचे सौंदर्य, तिच्या मनाचा ध्यास कथेत जशाच्या तसा प्रगट झाला आहे. रेग्यांच्या कथेतील स्त्री ही धीट, मोकळी आहे. तर पुरुष हा अनासक्त, कशातच न गुंतणारा स्थाणूकाय वृक्षासारखा आहे. रेगे कथांमधून चिंतनशील जाणिवांचा फारसा प्रत्येय देत नाहीत. मनू ही अपवाद. मोजक्या शब्दात परंतु कथेत येणारा प्रत्येक शब्द, प्रसंग हा त्या कथेचा अविभाज्य घटक बनून जातो. या शुभेच्छा कार्डाला माझे सन्मित्र स्व.पुणतांबेकर सर यांनी दि.४ जानेवारी १९८३ रोजी दिलेले उत्तर- फुलांची अनामिक पोकळी वास्तविक पोकळी नसून ती त्याच्या केशराचे मंदिर आहे. या केशरापर्यंत किती लोक पोचलेत! पाकळ्यांच्या रुपाला-रंगाला भुललेत लोक काही सुगंधालाही तुमच्यासारखे रसिकच पोहचू शकले आणि मंदिरात केशराच संस्पर्शाने तंद्रीभूत होऊन तुम्ही जे बीजग्रहण केलेत त्याचा प्रसव कलारुपाने हसता-खिदळता रुदन करतादेखील दिसून येतो आहे. हे कलारुप तारुण्यच नव्हे तर वृद्धत्वही पाहो हीच या मंगलप्रसंगी इच्छा.-जयंत पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव