शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

..नकोशी होतेय हवीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सन ...

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मुलींचा जन्मदर वाढत असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सन २०१५-१६ मध्ये हजार मुलांमागे असलेली ९१४ मुलींची संख्या सन २०१९-२० या वर्षात तब्बल ९८३ पर्यंत गेली आहे. शासनातर्फे मुलींच्या जन्मदरात ‌विविध माध्यमातून करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळे मुलीच्या जन्मदरात वाढ होत असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, या अंधश्रद्धेपोटी काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर जन्मापूर्वीच मुलींना मारण्यात आले. परिणामी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर दर हजार मुलांमागे मुलींच्या जन्मोत्तराचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे शासनाने मुलींचा जन्मदर वाढण्याकरिता कठोर कायदे अंमलात आणले आहेत. बेटी बचाओ-बेटी पढाओ या अभियानातर्गंत मुलींच्या जन्माचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. महिलांना गरोदरपणात वेळीच उपचार व काळजी घेण्यासाठी गाव तेथे आशा सेविकांची नियुक्ती केली आहे. तसेच २० आठवड्यांच्या आत नावनोंदणीचे प्रमाण, गरोदरपणात लसीकरण, प्रसूतीनंतर घरपोहोच आरोग्यसेवा, तसेच प्रसूतीसाठी मोफत शासकीय रुग्णालये व वाहनांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. त्यामुळे मुलींचा जन्मदर २०१५-१६ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये एक हजार मुलांमागे ६९ मुलींचे प्रमाण वाढलेले आहे.

---

२०१५-१६ मध्ये हजार मुलांमागे मुली - ९१४

२०१९-२० मध्ये हजार मुलांमागे मुली -९८३

इन्फो -

महिलांना सवलतीत आरोग्य सुविधा

महिलांचे बाळंतपणासह आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार दारिद्रय रेषेखालील महिलांना आर्थिक मदत देण्यात येत असून, याव्यक्तिरिक्त सामान्य प्रसूती किंवा सिझेरियन, उपचारपद्धती, औषधे व रूग्णालयाचा खर्च विनामूल्य देण्यात येत आहे.

बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष

बाळतपणानंतर रूग्णालयात बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. बाळाला डीसीजी, पोलिओ आदी रोगप्रतिकारक लसी देण्यात येत असतात. विशेषत: बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महिलांना स्तनपान करण्याचे सांगितले जात आहे. तसेच डॉक्टरांकडून वेळोवेळी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.