शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

ना वखरटी, ना नांगरटी तरीही पिक दमदार

By admin | Updated: July 8, 2017 14:01 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांनी आधुनिक शेतीचा ध्यास घेतला आहे.

 ऑनलाईन लोकमत / अजय कोतकर

 
गोंडगाव, जि. जळगाव, दि.8 - ता.भडगाव :  भोरटेक  येथील शेतकरी संजय बळीराम महाजन हे तीन-चार वर्षापासून शेतीची कुठल्याही प्रकारे मशागत अथात े ना वखरटी ना नांगरटी  करीत नसून तरीही उत्तम पिक मिळत असल्याचे ते सांगतात.
निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांनी आधुनिक शेतीचा ध्यास घेतला आहे. मागील वर्षी हळद, मका, ज्वारी हे पीक घेतले.  त्यात हळदीचे उत्पन्न दीड लाखाचे (एक एकर शेतीत) तर मका देखील सव्वा लाखाचा झाला. हे पीक घेतल्यावर त्यांनी कुठलीही मशागत केली नाही. ज्या स्थितीत शेती त्यातच त्यांनी आता कपाशीची लागवड केली आहे. गतवर्षी देखील रोपटे पध्दतीने ऊसाची लागवड केली होती. आपल्याकडे रोपटे पध्दतीने कधीही ऊस लागवड होत नाही. पण त्यांनी केली आणि ते पीक आता जोमाने बहरत आहे. ते रोज शेतक:यांना मार्गदर्शन करतात.  कुठलीही फी घेत नाही. त्यामुळे भडगाव कृषी विभागातर्फे मागे त्यांना कृषीमित्र हा पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले.
खर्चाची होते बचत
शेतकरी हा मेमध्येच शेतीची मशागत करतो.    हा महिना शेतक:याचा धावपळीचा असतो.  मजूर मिळत नाही, ट्रॅक्टर ट्रीलर मारण्यास मिळत नाही,  वखरटी, नांगरटी करणारा मिळत नाही. यासाठी अतोनात खर्च होतो व पाहीजे तसे उत्पन्न मिळत नाही. शेती मशागतीसाठीच जवळपास 4 ते 5 हजार रुपयार्पयत खर्च येतो. मात्र महाजन यांच्या पद्धतीने तो खर्च शेतक:याचा होत नाही. 
ट्रॅक्टरद्वारे नांगरटी केली तर एका एकर शेतीला 1500 रु., रोटर मारणे- एक एकर- 1000 रु. , स:या पाडणे - 1000 रु. असा एक एकर शेतीला 3500 रु. खर्च होतो तर तीन एकर शेतीला 10,500 रु. खर्च त्यांना आला असता तो त्यांनी केला नाही, असे  ते सांगतात, याअगोदर मका पीक घेतले होते. त्यात  कपाशी लावली. मकाचे जे खोड आहे त्याला खाली गांडूळ लागले म्हणजेच आपोआप गांडूळ खत तयार होते व ते गांडूळ नव्या पिकाकडे आकर्षित होतात, असेही महाजन यांनी सांगितले.
70 टक्के सेंद्रीय शेती
संजय महाजन हे रासायनिक शेतीबरोबरच सेंद्रीय शेतीही करतात.  70 टक्के सेंद्रीय तर 30 टक्के रासायनिक शेती ते करतात. एवढे असूनही ते 20 गायींचा सांभाळ करतात. म्हैस नसल्याचे ते ठामपणे सांगतात. म्हैस ही जास्त उत्पन्न देणरे साधन आहे परंतु मी शेतीतून अधिक उत्पन्न काढतो. यामुळे मी लक्ष्मीच्या रुपात आजही 20 गायींचा सांभाळ करीत आहे, असेही ते म्हणाले.
याबाबत महाजन यांनी सांगितले की, मी कोल्हापूर येथे कृषी प्रदर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी तेथील शेतकरी चिपळूणकर यांचे ‘विना नांगरटी वखरटीची शेती’ हे पुस्तक घेवून त्याचा अभ्यास करुन मी प्रथम प्रयोग केला. 2014 मध्ये बाजरी मका या पिकानंतर दोन एकर शेतीत कपाशी लागवड केली तर दोन एकर शेतीत 20 क्विंटल उत्पन्न मला मिळाले. यावरुन मी परिसरातील शेतक:यांनाही याचे मार्गदर्शन करतो.
ना नांगरटी ना वखरटी या प्रयोगाने गांडूळ सेंद्रीय खत तयार होवून अन्नद्रव्य पुरवठय़ाचे काम त्याद्वारे  केले जाते. गांडूळामुळे जमीन भुसभुशीत होते. पाण्याचा ओलावा जमिनीत टिकून राहतो. पिकास पोषक निर्मिती जमिनीत  होत, असे कृषीतज्ज्ञ   विजय जयवंत पाटील यांनी सांगितले.