शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

दहशत नाही मात्र भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जळगाव शहरात थैमान घातले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जळगाव शहरात थैमान घातले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यानंतर जुलैपर्यंत कोरोनाने मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकदेखील उपस्थित राहत नसल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्या काळात नेरी नाका स्मशानभूमीत जवळपास ५० मृतदेहांवर नातेवाईकांच्या अनुपस्थितीतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र नंतरच्या काळात कोरोनाची दहशत कमी होत गेली. आता सर्वच मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असताना नातेवाईक उपस्थित असतात. मात्र काही जण अजूनही मृतदेह असलेल्या रॅपिंग बॅगला हातही लावत नाहीत. अशा वेळी सर्व कामे मनपा कर्मचाऱ्यांनाच करावी लागत आहेत.

वर्षभरात कोरोनाने अनेकांचे जीव घेतले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या महामारीच्या काळात अनेकांचे संसार रस्त्यावर आले. आतापर्यंत कोणत्याही आजाराने मृत्यू झाला तरी मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी आवर्जून हजेरी लावत किंवा नंतर द्वारदर्शनासाठी तरी जात असत. मात्र कोरोनाच्या काळात फक्त जवळचे नातेवाईकच अंत्यसंस्काराला जात आहेत. वर्षभरापासून तर द्वारदर्शनदेखील बंदच आहे.

जळगावच्या नेरीनाका येथील स्मशानभूमीत आतापर्यंत शहरातील आणि शहराबाहेरील शेकडो कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यासाठी मनपाने तेथे कर्मचारीदेखील नेमले आहेत.

गेल्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात कोरोनावर फारशी उपचार पद्धती समोर आलेली नव्हती. त्यामुळे बाधितांचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराला अनेक अडचणी येत होत्या. मृतांचे नातेवाईक समोर येत नव्हते. त्यामुळे प्रशासनालाच त्यांचे अंत्यसंस्कार करावे लागत होते. जून ते जुलै या काळात या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या.

पाच जणांना परवानगी, अनेकांच्या नशिबी तेही नाही

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्ययात्रेत २० जणांना परवानगी आहे. मृतदेह हा वेगळ्या प्रकारच्या रॅपिंग बॅगमध्ये ठेवला जातो. अंत्यसंस्कार करणाऱ्यांना पीपीई किट घालावी लागते. मात्र अनेक मृतांच्या नशिबी नातेवाईकांच्या नाही तर मनपा कर्मचाऱ्याच्या हातूनच अग्नी आहे. जुलैच्या आधी नातेवाईक स्मशानभूमीतदेखील येत नव्हते. आता नातेवाईक किमान स्मशानभूमीत येतात. मात्र काहीजण भीतीपोटी त्या रॅपिंग बॅगला हातदेखील लावत नाही किंवा कोणतेही क्रियाकर्म करत नाहीत.

जळगाव शहरात कोरोनाने झालेले मृत्यू - ४९५

नेरी नाका स्मशानभूमीत नातेवाईकांशिवाय झालेले अंत्यसंस्कार - जवळपास ५०

कोट -

गेल्या वर्षभरापासून आम्ही कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत आहोत. त्यात बहुतेकवेळा नातेवाईकदेखील येत नाहीत. हे प्रमाण मागच्या वर्षी जुलैच्या आधी होते. आतादेखील अनेक जण स्मशानभूमीत येतात मात्र मृतदेहाला हात लावत नाही. अशा वेळी आम्हालाच सर्व काही करावे लागते.

- धनराज सपकाळे, अंत्यसंस्कार करणारे.