शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

दहशत नाही मात्र भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जळगाव शहरात थैमान घातले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जळगाव शहरात थैमान घातले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यानंतर जुलैपर्यंत कोरोनाने मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकदेखील उपस्थित राहत नसल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्या काळात नेरी नाका स्मशानभूमीत जवळपास ५० मृतदेहांवर नातेवाईकांच्या अनुपस्थितीतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र नंतरच्या काळात कोरोनाची दहशत कमी होत गेली. आता सर्वच मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असताना नातेवाईक उपस्थित असतात. मात्र काही जण अजूनही मृतदेह असलेल्या रॅपिंग बॅगला हातही लावत नाहीत. अशा वेळी सर्व कामे मनपा कर्मचाऱ्यांनाच करावी लागत आहेत.

वर्षभरात कोरोनाने अनेकांचे जीव घेतले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या महामारीच्या काळात अनेकांचे संसार रस्त्यावर आले. आतापर्यंत कोणत्याही आजाराने मृत्यू झाला तरी मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी आवर्जून हजेरी लावत किंवा नंतर द्वारदर्शनासाठी तरी जात असत. मात्र कोरोनाच्या काळात फक्त जवळचे नातेवाईकच अंत्यसंस्काराला जात आहेत. वर्षभरापासून तर द्वारदर्शनदेखील बंदच आहे.

जळगावच्या नेरीनाका येथील स्मशानभूमीत आतापर्यंत शहरातील आणि शहराबाहेरील शेकडो कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यासाठी मनपाने तेथे कर्मचारीदेखील नेमले आहेत.

गेल्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात कोरोनावर फारशी उपचार पद्धती समोर आलेली नव्हती. त्यामुळे बाधितांचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराला अनेक अडचणी येत होत्या. मृतांचे नातेवाईक समोर येत नव्हते. त्यामुळे प्रशासनालाच त्यांचे अंत्यसंस्कार करावे लागत होते. जून ते जुलै या काळात या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या.

पाच जणांना परवानगी, अनेकांच्या नशिबी तेही नाही

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्ययात्रेत २० जणांना परवानगी आहे. मृतदेह हा वेगळ्या प्रकारच्या रॅपिंग बॅगमध्ये ठेवला जातो. अंत्यसंस्कार करणाऱ्यांना पीपीई किट घालावी लागते. मात्र अनेक मृतांच्या नशिबी नातेवाईकांच्या नाही तर मनपा कर्मचाऱ्याच्या हातूनच अग्नी आहे. जुलैच्या आधी नातेवाईक स्मशानभूमीतदेखील येत नव्हते. आता नातेवाईक किमान स्मशानभूमीत येतात. मात्र काहीजण भीतीपोटी त्या रॅपिंग बॅगला हातदेखील लावत नाही किंवा कोणतेही क्रियाकर्म करत नाहीत.

जळगाव शहरात कोरोनाने झालेले मृत्यू - ४९५

नेरी नाका स्मशानभूमीत नातेवाईकांशिवाय झालेले अंत्यसंस्कार - जवळपास ५०

कोट -

गेल्या वर्षभरापासून आम्ही कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत आहोत. त्यात बहुतेकवेळा नातेवाईकदेखील येत नाहीत. हे प्रमाण मागच्या वर्षी जुलैच्या आधी होते. आतादेखील अनेक जण स्मशानभूमीत येतात मात्र मृतदेहाला हात लावत नाही. अशा वेळी आम्हालाच सर्व काही करावे लागते.

- धनराज सपकाळे, अंत्यसंस्कार करणारे.