शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दहशत नाही मात्र भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जळगाव शहरात थैमान घातले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जळगाव शहरात थैमान घातले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यानंतर जुलैपर्यंत कोरोनाने मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकदेखील उपस्थित राहत नसल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्या काळात नेरी नाका स्मशानभूमीत जवळपास ५० मृतदेहांवर नातेवाईकांच्या अनुपस्थितीतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र नंतरच्या काळात कोरोनाची दहशत कमी होत गेली. आता सर्वच मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असताना नातेवाईक उपस्थित असतात. मात्र काही जण अजूनही मृतदेह असलेल्या रॅपिंग बॅगला हातही लावत नाहीत. अशा वेळी सर्व कामे मनपा कर्मचाऱ्यांनाच करावी लागत आहेत.

वर्षभरात कोरोनाने अनेकांचे जीव घेतले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या महामारीच्या काळात अनेकांचे संसार रस्त्यावर आले. आतापर्यंत कोणत्याही आजाराने मृत्यू झाला तरी मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी आवर्जून हजेरी लावत किंवा नंतर द्वारदर्शनासाठी तरी जात असत. मात्र कोरोनाच्या काळात फक्त जवळचे नातेवाईकच अंत्यसंस्काराला जात आहेत. वर्षभरापासून तर द्वारदर्शनदेखील बंदच आहे.

जळगावच्या नेरीनाका येथील स्मशानभूमीत आतापर्यंत शहरातील आणि शहराबाहेरील शेकडो कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यासाठी मनपाने तेथे कर्मचारीदेखील नेमले आहेत.

गेल्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात कोरोनावर फारशी उपचार पद्धती समोर आलेली नव्हती. त्यामुळे बाधितांचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराला अनेक अडचणी येत होत्या. मृतांचे नातेवाईक समोर येत नव्हते. त्यामुळे प्रशासनालाच त्यांचे अंत्यसंस्कार करावे लागत होते. जून ते जुलै या काळात या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या.

पाच जणांना परवानगी, अनेकांच्या नशिबी तेही नाही

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्ययात्रेत २० जणांना परवानगी आहे. मृतदेह हा वेगळ्या प्रकारच्या रॅपिंग बॅगमध्ये ठेवला जातो. अंत्यसंस्कार करणाऱ्यांना पीपीई किट घालावी लागते. मात्र अनेक मृतांच्या नशिबी नातेवाईकांच्या नाही तर मनपा कर्मचाऱ्याच्या हातूनच अग्नी आहे. जुलैच्या आधी नातेवाईक स्मशानभूमीतदेखील येत नव्हते. आता नातेवाईक किमान स्मशानभूमीत येतात. मात्र काहीजण भीतीपोटी त्या रॅपिंग बॅगला हातदेखील लावत नाही किंवा कोणतेही क्रियाकर्म करत नाहीत.

जळगाव शहरात कोरोनाने झालेले मृत्यू - ४९५

नेरी नाका स्मशानभूमीत नातेवाईकांशिवाय झालेले अंत्यसंस्कार - जवळपास ५०

कोट -

गेल्या वर्षभरापासून आम्ही कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत आहोत. त्यात बहुतेकवेळा नातेवाईकदेखील येत नाहीत. हे प्रमाण मागच्या वर्षी जुलैच्या आधी होते. आतादेखील अनेक जण स्मशानभूमीत येतात मात्र मृतदेहाला हात लावत नाही. अशा वेळी आम्हालाच सर्व काही करावे लागते.

- धनराज सपकाळे, अंत्यसंस्कार करणारे.