शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
2
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
3
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
4
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
5
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
6
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: “हे आम्ही खपवून घेणार नाही”; मतदान केल्यावर राज ठाकरेंचा इशारा
7
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
8
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
9
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
10
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
11
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
12
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
13
२१ जानेवारीपासून अमेरिकेची दारे बंद! ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया रोखली; भारतावर काय होणार परिणाम?
14
मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
15
PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
16
निवृत्तीची चिंता संपली! पोस्टाची 'ही' स्कीम करेल मालामाल; दरमहा होईल ₹२०,००० ची कमाई, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल
18
कर्मचाऱ्यांना मिळणार ₹२ कोटींपर्यंतच्या इन्शुरन्स, स्वस्त लोनसह हे फायदे; लाँच झाली नवी सुविधा, जाणून घ्या
19
काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव 
20
731666404000 रुपये 'साफ'...! मुकेश अंबानी 100 अब्ज डॉलरच्या क्लब मधून बाहेर; आता Q3 वर नजर
Daily Top 2Weekly Top 5

दररोज ५० पेक्षा जास्त जणांच्या नशिबी नाही शिवभोजन थाळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने गरीबासाठी पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरु ...

आकाश नेवे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने गरीबासाठी पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरु केली आहे. मात्र प्रत्यक्षात मंजूर थाळीची संख्या आणि लाभार्थींची संख्या लक्षात घेता दररोज किमान ५० पेक्षा जास्त जणांना जेवणाअभावी परत जावे लागत आहे. दिवसभर काम करतांना त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे विदारक चित्र आहे.

राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेत जिल्ह्यात एकुण ३८ केंद्रे आहेत. त्यात ३४२५ थाळ्या लाभार्थ्यांना दिल्या जात होत्या. त्यात जिल्हा प्रशासनाने दीड पट वाढीव इष्टांकांनुसार ५१२५ थाळ्या मंजूर करण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातून शहरात दररोज येणारे नागरिक आणि शहरातील लाभार्थ्यांची संख्या पाहता शहरात विविध भागात १५ केंद्रे कार्यरत आहेत. त्यातून १७२५ लाभार्थ्यांना भोजन दिले जाते. मात्र सध्या लाभार्थ्यांची वाढलेली संख्या पाहता काहींना उपाशीपोटीच रहावे लागत आहे. त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात आणखी दोन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच आणखी २५० थाळ्या उपलब्ध होऊ शकतील.

५० जण उपाशी पोटी परतले

चित्रा चौकातील शिवभोजन केंद्र - चित्रा चौकातील शिवभोजन केंद्रावर दाणा बाजारात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचीच जास्त गर्दी असते. या केंद्रात देखील लवकरच थाळींचा कोटा संपतो. त्यामुळे अनेकांना उपाशी परत जावे लागते. किंवा अन्य ठिकाणी गरिबांच्या खिशाला न परवडणारे जेवण घ्यावे लागते.

विसनजी नगरातील केंद्र - मुख्य रस्त्यावर विसनजी नगरात असलेल्या शिवभोजन केंद्रांवर दररोज दुपारी १२ वाजेपासून गर्दी सुरू होते. मात्र काही वेळातच येथे ७५ शिवभोजन थाळ्यांचा कोटा संपतो. मग अनेकांना मिळेल. त्या अन्नावर गुजरान करावी लागते. किंवा अन्य ठिकाणी जावे लागते. काही जण येथुनही उपाशी परततात. या आधीदेखील येथे सेवाभावी संस्थेतर्फे मोफत खिचडीचे वाटप केले जात होते.त्यामुळे येथे केंद्रावर बरीच गर्दी असते.

दररोज भरते साडेतीन हजार नागरिकांचे पोट

जिल्ह्यात दररोज ५१२५ थाळींचे वितरण केले जाते. मात्र त्यासोबतच अनेकांना उपाशी पोटी परत जावे लागत आहे.त्यामुळे बहुतेक केंद्रावर थाळींचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळीकेंद्र - ३८

रोज लाभार्थ्यांची संख्या - ५१२५

शहरातील केंद्र - १५

शहरातील दररोज थाळींची संख्या - १७२५