शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
7
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
8
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
9
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
10
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
11
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
12
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
13
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
14
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
15
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
16
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
17
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
18
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
19
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
20
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

दररोज ५० पेक्षा जास्त जणांच्या नशिबी नाही शिवभोजन थाळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने गरीबासाठी पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरु ...

आकाश नेवे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने गरीबासाठी पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरु केली आहे. मात्र प्रत्यक्षात मंजूर थाळीची संख्या आणि लाभार्थींची संख्या लक्षात घेता दररोज किमान ५० पेक्षा जास्त जणांना जेवणाअभावी परत जावे लागत आहे. दिवसभर काम करतांना त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे विदारक चित्र आहे.

राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेत जिल्ह्यात एकुण ३८ केंद्रे आहेत. त्यात ३४२५ थाळ्या लाभार्थ्यांना दिल्या जात होत्या. त्यात जिल्हा प्रशासनाने दीड पट वाढीव इष्टांकांनुसार ५१२५ थाळ्या मंजूर करण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातून शहरात दररोज येणारे नागरिक आणि शहरातील लाभार्थ्यांची संख्या पाहता शहरात विविध भागात १५ केंद्रे कार्यरत आहेत. त्यातून १७२५ लाभार्थ्यांना भोजन दिले जाते. मात्र सध्या लाभार्थ्यांची वाढलेली संख्या पाहता काहींना उपाशीपोटीच रहावे लागत आहे. त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात आणखी दोन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच आणखी २५० थाळ्या उपलब्ध होऊ शकतील.

५० जण उपाशी पोटी परतले

चित्रा चौकातील शिवभोजन केंद्र - चित्रा चौकातील शिवभोजन केंद्रावर दाणा बाजारात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचीच जास्त गर्दी असते. या केंद्रात देखील लवकरच थाळींचा कोटा संपतो. त्यामुळे अनेकांना उपाशी परत जावे लागते. किंवा अन्य ठिकाणी गरिबांच्या खिशाला न परवडणारे जेवण घ्यावे लागते.

विसनजी नगरातील केंद्र - मुख्य रस्त्यावर विसनजी नगरात असलेल्या शिवभोजन केंद्रांवर दररोज दुपारी १२ वाजेपासून गर्दी सुरू होते. मात्र काही वेळातच येथे ७५ शिवभोजन थाळ्यांचा कोटा संपतो. मग अनेकांना मिळेल. त्या अन्नावर गुजरान करावी लागते. किंवा अन्य ठिकाणी जावे लागते. काही जण येथुनही उपाशी परततात. या आधीदेखील येथे सेवाभावी संस्थेतर्फे मोफत खिचडीचे वाटप केले जात होते.त्यामुळे येथे केंद्रावर बरीच गर्दी असते.

दररोज भरते साडेतीन हजार नागरिकांचे पोट

जिल्ह्यात दररोज ५१२५ थाळींचे वितरण केले जाते. मात्र त्यासोबतच अनेकांना उपाशी पोटी परत जावे लागत आहे.त्यामुळे बहुतेक केंद्रावर थाळींचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळीकेंद्र - ३८

रोज लाभार्थ्यांची संख्या - ५१२५

शहरातील केंद्र - १५

शहरातील दररोज थाळींची संख्या - १७२५