शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

दररोज ५० पेक्षा जास्त जणांच्या नशिबी नाही शिवभोजन थाळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने गरीबासाठी पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरु ...

आकाश नेवे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने गरीबासाठी पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरु केली आहे. मात्र प्रत्यक्षात मंजूर थाळीची संख्या आणि लाभार्थींची संख्या लक्षात घेता दररोज किमान ५० पेक्षा जास्त जणांना जेवणाअभावी परत जावे लागत आहे. दिवसभर काम करतांना त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे विदारक चित्र आहे.

राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेत जिल्ह्यात एकुण ३८ केंद्रे आहेत. त्यात ३४२५ थाळ्या लाभार्थ्यांना दिल्या जात होत्या. त्यात जिल्हा प्रशासनाने दीड पट वाढीव इष्टांकांनुसार ५१२५ थाळ्या मंजूर करण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातून शहरात दररोज येणारे नागरिक आणि शहरातील लाभार्थ्यांची संख्या पाहता शहरात विविध भागात १५ केंद्रे कार्यरत आहेत. त्यातून १७२५ लाभार्थ्यांना भोजन दिले जाते. मात्र सध्या लाभार्थ्यांची वाढलेली संख्या पाहता काहींना उपाशीपोटीच रहावे लागत आहे. त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात आणखी दोन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच आणखी २५० थाळ्या उपलब्ध होऊ शकतील.

५० जण उपाशी पोटी परतले

चित्रा चौकातील शिवभोजन केंद्र - चित्रा चौकातील शिवभोजन केंद्रावर दाणा बाजारात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचीच जास्त गर्दी असते. या केंद्रात देखील लवकरच थाळींचा कोटा संपतो. त्यामुळे अनेकांना उपाशी परत जावे लागते. किंवा अन्य ठिकाणी गरिबांच्या खिशाला न परवडणारे जेवण घ्यावे लागते.

विसनजी नगरातील केंद्र - मुख्य रस्त्यावर विसनजी नगरात असलेल्या शिवभोजन केंद्रांवर दररोज दुपारी १२ वाजेपासून गर्दी सुरू होते. मात्र काही वेळातच येथे ७५ शिवभोजन थाळ्यांचा कोटा संपतो. मग अनेकांना मिळेल. त्या अन्नावर गुजरान करावी लागते. किंवा अन्य ठिकाणी जावे लागते. काही जण येथुनही उपाशी परततात. या आधीदेखील येथे सेवाभावी संस्थेतर्फे मोफत खिचडीचे वाटप केले जात होते.त्यामुळे येथे केंद्रावर बरीच गर्दी असते.

दररोज भरते साडेतीन हजार नागरिकांचे पोट

जिल्ह्यात दररोज ५१२५ थाळींचे वितरण केले जाते. मात्र त्यासोबतच अनेकांना उपाशी पोटी परत जावे लागत आहे.त्यामुळे बहुतेक केंद्रावर थाळींचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळीकेंद्र - ३८

रोज लाभार्थ्यांची संख्या - ५१२५

शहरातील केंद्र - १५

शहरातील दररोज थाळींची संख्या - १७२५