शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण का केली? आमदार संजय गायकवाड म्हणाले, 'वरण खराब निघाल्याने..."
3
"लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा"; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या
4
मुंबई: आईला म्हणाला, 'लवकरच जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच
5
Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा
6
जमीन खणताच नशीब फळफळलं, मजुराच्या हाती लागली मौल्यवान वस्तू, काही तासांतच झाला लखपती    
7
Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातील 'त्या' १९ लोकांवर गुजरात सरकारने केले अंत्यसंस्कार; पण कारण काय?
8
तुमचं जनधन खातं बंद होणार? खातेधारकांमध्ये गोंधळ, सरकारनं दिलं स्पष्टीकरण
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
10
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
11
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
12
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
13
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
14
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
15
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
16
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
17
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
18
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
19
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
20
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही

जीव धोक्यात पिकांना रात्रीचा पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST

शेतकरी बांधवांतर्फे दिवसा विज पुरवठा होण्याबाबत अनेकवेळा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, कायम स्वरूपी दिवसा विज पुरवठा दिल्यावर सब ...

शेतकरी बांधवांतर्फे दिवसा विज पुरवठा होण्याबाबत अनेकवेळा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, कायम स्वरूपी दिवसा विज पुरवठा दिल्यावर सब स्टेशन ओव्हलोड होऊन सिस्टीम ढासळण्याची शक्यता असल्याने दिवसा विज पुरवठा देणे टाळण्यात येत आहे. या संदर्भात शासनाने दिवसा विज पुरवठा करण्यासाठी सर्वच यंत्रणा दुप्पट करण्याची शेतकऱ्यांची मागणी असून, याबाबत शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांमधुन नाराजी निर्माण होत आहे.

रात्रीचे भारनियमन जीवघेणेच :

दिवसभर शेतात राबराब राबुन, पुन्हा बागायतदार शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यायला जावेच लागते. रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी देतांना कुठल्याही स्वरूपाचा अपघात घडण्याची शक्यता असते. , रानडुक्कर, बिबट्या यासह साप व इतर हिंस्र पाण्याचा हल्ला होण्याची भिती असते. तसेच विजेचा शॉक लागण्याचीही भिती असते.

इन्फो :

शेतकऱ्यांना दिवसा शेतात काम करून, पुन्हा रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. रात्रीच्यावेळी काम करतांना हिस्त्र प्राणी किंवा इतर जलचर प्राण्यांचा धोका असतो. मात्र, तरीदेखील शेतकरी बांधव जीव धोक्यात घालून पिकांना देतात. शासनाने बाराही महिने दिवसा विज पुरवठा देणे गरजेचे आहे.

कशोर चौधरी, शेतकरी.

इन्फो :

शेतकरी बांधवांना विज पुरवठा करण्यासंदर्भात हे राज्य पातळीवरच धोरण ठरविण्यात येते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला विज पुरवठा करण्यात येतो, शेतकऱ्यांना कायम स्वरूपी दिवसा विज पुरवठ्याबाबत शासन स्तरावरच निर्णय घेण्यात येईल.

फारुख शेख, अधिक्षक अभियंता, महावितरण.

चांगला पाऊस झाल्याने मुबलक पाणी :

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगला पाऊस झाल्याने, विहिरी फुल्ल भरलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच शेतकरी आता जुन पर्यंत वर्षभर पिके घेतील. पावसाळी हंगाम संपल्यानंतर आता हिवाळी हंगामासाठी तयारी करतील. उन्हाळी हंगामातील पिकांना जास्त भाव मिळत असल्याने, शेतकरी गहू व हरभरा पिके काढण्यावर जास्तीत जास्त भर देतात.

- जळगाव तालुक्यात गिरणा नदी असल्यामुळे या नदीचाही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. नदीच्या परिसरातील विहिरींना बाराही महिने मुबलक पाणी असते. पाऊस कमी पडला तरी या विहरींना वर्षभर पाणी असते. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्षभर पिके घेतात. दरम्यान, यंदा पाऊस चांगला झाला असल्यामुळे नदीलाही जास्त आवर्तने सोडण्यात येणार असल्याने यंदा पाणी मुबलक राहणार आहे.