शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात पिकांना रात्रीचा पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST

शेतकरी बांधवांतर्फे दिवसा विज पुरवठा होण्याबाबत अनेकवेळा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, कायम स्वरूपी दिवसा विज पुरवठा दिल्यावर सब ...

शेतकरी बांधवांतर्फे दिवसा विज पुरवठा होण्याबाबत अनेकवेळा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, कायम स्वरूपी दिवसा विज पुरवठा दिल्यावर सब स्टेशन ओव्हलोड होऊन सिस्टीम ढासळण्याची शक्यता असल्याने दिवसा विज पुरवठा देणे टाळण्यात येत आहे. या संदर्भात शासनाने दिवसा विज पुरवठा करण्यासाठी सर्वच यंत्रणा दुप्पट करण्याची शेतकऱ्यांची मागणी असून, याबाबत शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांमधुन नाराजी निर्माण होत आहे.

रात्रीचे भारनियमन जीवघेणेच :

दिवसभर शेतात राबराब राबुन, पुन्हा बागायतदार शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यायला जावेच लागते. रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी देतांना कुठल्याही स्वरूपाचा अपघात घडण्याची शक्यता असते. , रानडुक्कर, बिबट्या यासह साप व इतर हिंस्र पाण्याचा हल्ला होण्याची भिती असते. तसेच विजेचा शॉक लागण्याचीही भिती असते.

इन्फो :

शेतकऱ्यांना दिवसा शेतात काम करून, पुन्हा रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. रात्रीच्यावेळी काम करतांना हिस्त्र प्राणी किंवा इतर जलचर प्राण्यांचा धोका असतो. मात्र, तरीदेखील शेतकरी बांधव जीव धोक्यात घालून पिकांना देतात. शासनाने बाराही महिने दिवसा विज पुरवठा देणे गरजेचे आहे.

कशोर चौधरी, शेतकरी.

इन्फो :

शेतकरी बांधवांना विज पुरवठा करण्यासंदर्भात हे राज्य पातळीवरच धोरण ठरविण्यात येते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला विज पुरवठा करण्यात येतो, शेतकऱ्यांना कायम स्वरूपी दिवसा विज पुरवठ्याबाबत शासन स्तरावरच निर्णय घेण्यात येईल.

फारुख शेख, अधिक्षक अभियंता, महावितरण.

चांगला पाऊस झाल्याने मुबलक पाणी :

गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगला पाऊस झाल्याने, विहिरी फुल्ल भरलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच शेतकरी आता जुन पर्यंत वर्षभर पिके घेतील. पावसाळी हंगाम संपल्यानंतर आता हिवाळी हंगामासाठी तयारी करतील. उन्हाळी हंगामातील पिकांना जास्त भाव मिळत असल्याने, शेतकरी गहू व हरभरा पिके काढण्यावर जास्तीत जास्त भर देतात.

- जळगाव तालुक्यात गिरणा नदी असल्यामुळे या नदीचाही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. नदीच्या परिसरातील विहिरींना बाराही महिने मुबलक पाणी असते. पाऊस कमी पडला तरी या विहरींना वर्षभर पाणी असते. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्षभर पिके घेतात. दरम्यान, यंदा पाऊस चांगला झाला असल्यामुळे नदीलाही जास्त आवर्तने सोडण्यात येणार असल्याने यंदा पाणी मुबलक राहणार आहे.