शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

वार्तापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असो किंवा उच्च शिक्षण विभाग सर्वच ठिकाणी सध्या महत्वाच्या पदांवर प्रभारी राज सुरू ...

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असो किंवा उच्च शिक्षण विभाग सर्वच ठिकाणी सध्या महत्वाच्या पदांवर प्रभारी राज सुरू आहे. त्यामुळे प्रभारीचं सध्या शिक्षण विभागांचा गाडा हाकताना दिसून येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव जिल्ह्याला लागलेले प्रभारी राजचे ग्रहण सुटतान दिसून येत नाही.

मनपा शिक्षण मंडळाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी यांच्याकडे तब्बल चार ते पाच तालुक्याचा अतिरिक्त पदभार होता. दुसरीकडे उच्च शिक्षण सहसंचालक यांच्याकडेही औरंगाबाद आणि जळगाव कार्यालयाचा पदभार आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील आयटीआयमध्ये सुध्दा प्राचार्यांची पदे रिक्त आहे. त्यामुळे नियमित प्राचार्यांवर इतर संस्थांचे पदभार सोपविण्यात आले आहे. सोबतचं विद्यापीठात कुलगुरू, प्र-कुलगुरू तसेच कुलसचिव देखील प्रभारीचं आहे. मध्यंतरी प्रभारी प्र-कुलगुरू व कुलसचिव यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या जागीच प्रभारीवर प्रभारी अधिका-यांची नेमणूक करण्‍यात आली होती. जिल्हा परिषद शिक्षण विभागात देखील प्राथमिक शिक्षणाधिकरी व उपशिक्षणाधिकारी पदे ही प्रभारीचं आहेत. उपशिक्षणाधिकारीसाठी चार वर्षांपूर्वी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, त्याचा अद्यापही निकाल जाहीर करण्‍यात आलेला नाही. एकंदरीत प्रमुख पदांवर प्रभारी राज सुरू आहे. यामुळे अनेकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रभारी राजचे ग्रहण सोडविण्यात यावे, अशी मागणी होत आहे. बाहेर जिल्ह्यातील अधिका-यांकडे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदांचा पदभार देण्‍यात येतो. परिणामी, दोन्ही कार्यालयांचा पदभार सांभाळणे गरजेचे असल्यामुळे तीन दिवस एका जिल्ह्यात तर तीन दिवस ज्या ठिकाणी नियुक्ती मिळाली त्या जिल्ह्यात अधिकारी थांबतात. मात्र, काही वेळेस अधिका-यांना अतिरिक्त मिळालेल्या नियुक्ती ठिकाणी जाणे शक्य होत नाही. परिणामी, नागरिकांचे काम रखडले जाते. त्यामुळे अधिकारी जागेवर मिळत नाही, अशा तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात. त्यामुळे रिक्त जागांवर नियमित अधिकारी देण्यात यावेत, अशी मागणी होताना दिसून येत आहे.