शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

ताडे तलावाचा विकास करण्याची गरज

By admin | Updated: January 13, 2017 00:33 IST

अमळनेर : तलावात अनेक वर्षापासून साचलेले आहे अस्वच्छ पाणी, पर्यटनस्थळ म्हणून चालना द्यावी

अमळनेर : शहरातील शनिपेठ भागातील ताडेपुरा तलावात अनेक वर्षापासून अस्वच्छ पाणी साचलेले आहे. यामुळे हा तलाव डास उत्पत्ती केंद्र झाला आहे. परिणामी ताडेपुरा आणि शनिपेठ परिसरात तापाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. या तलावाची  स्वच्छता करून याठिकाणी पिकनिक पॉईंट विकसित करण्याची मागणी होत आहे.पैलाड भागात शनीपेठ परिसरात मोठा  एका खडय़ात पाणी साचलेले आहे. यालाच ताडेपुरा तलाव म्हणतात.  दुष्काळीस्थितीतदेखील या तलावाचे  पाणी आटत नाही. पावसाळ्यात पारोळा आणि हेडावे रस्त्याकडून पाण्याची मोठी अवाक असल्याने हा तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहत असतो.या तलावात अनेक प्रकारची घाण टाकली जाते. गणपती विसर्जन करून निर्माल्यदेखील येथे टाकले जाते. ते पाण्यात कुजून त्याची दरुगधी परिसरात पसरते. या तलाव परिसरात रहिवास आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.या तलावाची नगरपरिषदेकडून अनेक वर्षापासून स्वच्छताच झालेली नाही. केवळ गणपती उत्सवात नागरिकांना गणरायाचं विसर्जन करता यावे यासाठी याठिकाणी दिवे लावले जातात. त्याव्यतिरिक्त नगरपरिषदेचा स्वच्छता कर्मचारी येथे दिसत नाही.या  तलावाच्या आजूबाजूला वीट भट्टय़ा आहेत. तलावाचे पाणी विटा बनवण्यासाठी वापरले जाते. मात्र वीट भट्टय़ांमधून निघणा:या धुराने परिसरात हवेचेदेखील प्रदूषण होते. डास आणि हवेचे प्रदूषण यामुळे परिसर पूर्णपणे मानवी आरोग्यास बाधक ठरू पाहत आहे.पिकनिक  पॉईंट म्हणून विकास व्हावा ताडेपुरा तलावाच्या काठावर शिरपूरच्या धर्तीवर चौपाटी विकसित केल्यास शहरवासीयांसाठी तो एक पिकनिक पॉईंट ठरू शकतो. त्यासाठी नगरपरिषदेने तलावाची नियमित स्वच्छता केल्यास आणि तलाव काठचे अतिक्रमण काढून तिथे दिवे लावून, बोटिंगची व्यवस्था झाल्यास या भागाचा कायापालट होऊ शकतो. तलावाच्या शेजारी मंगळग्रह मंदिर आहे. तिथे  परराज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. ताडेपुरा तलाव विकसित झाल्यास शहर सौंदर्यात भर पडणार आहे. त्यातून नगरपरिषदेचे उत्पन्नदेखील वाढणार आहे.माजी आमदार साहेबराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात सदर तलावाचा विकास आराखडा तयार केला होता. त्यासाठी निधीची मागणीदेखील केली होती. आता नगर परिषदेत त्यांचीच सत्ता आहे, त्यामुळे त्यांनी शहराला दाखवलेले हे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.    (वार्ताहर) संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, प्रतापशेठजींची उद्योगभूमी व साने गुरुजींची कर्मभूमी व मंगळदेव ग्रह मंदिरामुळे अमळनेरचा लौकिक सर्वत्र वाढलेला आहे. या ताडे तलावाचा विकास करून त्याचा शिरपूर पॅटर्नप्रमाणे पिकनिक स्पॉट म्हणून विकास केल्यास, शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे. यासाठी पालिकेने प्रय} करण्याची आवश्यकता आहे.