शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

ताडे तलावाचा विकास करण्याची गरज

By admin | Updated: January 13, 2017 00:33 IST

अमळनेर : तलावात अनेक वर्षापासून साचलेले आहे अस्वच्छ पाणी, पर्यटनस्थळ म्हणून चालना द्यावी

अमळनेर : शहरातील शनिपेठ भागातील ताडेपुरा तलावात अनेक वर्षापासून अस्वच्छ पाणी साचलेले आहे. यामुळे हा तलाव डास उत्पत्ती केंद्र झाला आहे. परिणामी ताडेपुरा आणि शनिपेठ परिसरात तापाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. या तलावाची  स्वच्छता करून याठिकाणी पिकनिक पॉईंट विकसित करण्याची मागणी होत आहे.पैलाड भागात शनीपेठ परिसरात मोठा  एका खडय़ात पाणी साचलेले आहे. यालाच ताडेपुरा तलाव म्हणतात.  दुष्काळीस्थितीतदेखील या तलावाचे  पाणी आटत नाही. पावसाळ्यात पारोळा आणि हेडावे रस्त्याकडून पाण्याची मोठी अवाक असल्याने हा तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहत असतो.या तलावात अनेक प्रकारची घाण टाकली जाते. गणपती विसर्जन करून निर्माल्यदेखील येथे टाकले जाते. ते पाण्यात कुजून त्याची दरुगधी परिसरात पसरते. या तलाव परिसरात रहिवास आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.या तलावाची नगरपरिषदेकडून अनेक वर्षापासून स्वच्छताच झालेली नाही. केवळ गणपती उत्सवात नागरिकांना गणरायाचं विसर्जन करता यावे यासाठी याठिकाणी दिवे लावले जातात. त्याव्यतिरिक्त नगरपरिषदेचा स्वच्छता कर्मचारी येथे दिसत नाही.या  तलावाच्या आजूबाजूला वीट भट्टय़ा आहेत. तलावाचे पाणी विटा बनवण्यासाठी वापरले जाते. मात्र वीट भट्टय़ांमधून निघणा:या धुराने परिसरात हवेचेदेखील प्रदूषण होते. डास आणि हवेचे प्रदूषण यामुळे परिसर पूर्णपणे मानवी आरोग्यास बाधक ठरू पाहत आहे.पिकनिक  पॉईंट म्हणून विकास व्हावा ताडेपुरा तलावाच्या काठावर शिरपूरच्या धर्तीवर चौपाटी विकसित केल्यास शहरवासीयांसाठी तो एक पिकनिक पॉईंट ठरू शकतो. त्यासाठी नगरपरिषदेने तलावाची नियमित स्वच्छता केल्यास आणि तलाव काठचे अतिक्रमण काढून तिथे दिवे लावून, बोटिंगची व्यवस्था झाल्यास या भागाचा कायापालट होऊ शकतो. तलावाच्या शेजारी मंगळग्रह मंदिर आहे. तिथे  परराज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. ताडेपुरा तलाव विकसित झाल्यास शहर सौंदर्यात भर पडणार आहे. त्यातून नगरपरिषदेचे उत्पन्नदेखील वाढणार आहे.माजी आमदार साहेबराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात सदर तलावाचा विकास आराखडा तयार केला होता. त्यासाठी निधीची मागणीदेखील केली होती. आता नगर परिषदेत त्यांचीच सत्ता आहे, त्यामुळे त्यांनी शहराला दाखवलेले हे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.    (वार्ताहर) संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, प्रतापशेठजींची उद्योगभूमी व साने गुरुजींची कर्मभूमी व मंगळदेव ग्रह मंदिरामुळे अमळनेरचा लौकिक सर्वत्र वाढलेला आहे. या ताडे तलावाचा विकास करून त्याचा शिरपूर पॅटर्नप्रमाणे पिकनिक स्पॉट म्हणून विकास केल्यास, शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे. यासाठी पालिकेने प्रय} करण्याची आवश्यकता आहे.