शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

केळी निर्यात, फळनिगा तंत्रज्ञानासाठी अनुदान व पॅकहाऊस उभारणीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

रावेर : केळी उत्पादन संबंध भारतातून होत असले तरी जळगावच्या केळीत असलेला टिकाऊपणा, लुसलुसीत व सोनेरी तजेलदारपणा, केळीचा पारंपरिक ...

रावेर : केळी उत्पादन संबंध भारतातून होत असले तरी जळगावच्या केळीत असलेला टिकाऊपणा, लुसलुसीत व सोनेरी तजेलदारपणा, केळीचा पारंपरिक स्वाद व असलेली खनिजसमुद्राची मुबलकता तथा सतत वर्षभर केळी निर्यातीसाठी असलेली मालाची उपलब्धता पाहता केळी निर्यातीला चालना देण्यासाठी शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना आंध्र प्रदेश व व मध्य प्रदेश शासनाप्रमाणे फळनिगा तंत्रज्ञानासाठी शासन अनुदान व पॅकहाऊस उभारणीची गरज असल्याचे मत केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केले.

नाशिक जिल्ह्यातील मोहाडी (ता. दिंडोरी) येथे शासनाच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषी संजीवनी मोहिमेतील विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होते.

मोहाडी येथे शासनाच्या कृषी विभागाद्वारे कृषी संजीवनी मोहिमेतील ‘विकेल ते पिकेल’ राज्यस्तरीय शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्यशाळेचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

प्रारंभी भुसे, झिरवाळ, कृषी आयुक्त, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, नाशिक येथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी जळगाव जिल्ह्यातील केळी निर्यातदार शेतकरी प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन, विशाल अग्रवाल, वरुण अग्रवाल व देसाई एक्सपोर्ट कंपनीचे नरेश चौधरी यांनी जिल्ह्यातील केळी निर्यातीची विशेषत: व त्यासाठी शासनाकडून अत्यावश्यक असलेल्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची अपेक्षा याबाबत सविस्तर विवेचन या केळी निर्यातदार शेतकऱ्यांनी विशद केले.

दरम्यान, राज्यभरातील शेतमाल निर्यातदार शेतकऱ्यांतर्फे केळी निर्यातदार शेतकऱ्यांतर्फे विशाल अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी शासनाचा कोणताही आधार नसताना सुमारे दोन दोन लाख मेट्रिक टन केळी जिल्ह्यातून निर्यात केल्याची बाब अभिमानाने सादर करून शासनाने आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश शासनाप्रमाणे फळनिगा तंत्रज्ञानासाठी शासन अनुदान अदा करावे व केळी उत्पादक क्षेत्रात पॅक हाऊसची, कोल्ड स्टोरेज व प्रिकुलिंग स्टोअरेज उभारण्याचे गरज असल्याचे मत व्यक्त केले.

दरम्यान, केळी निर्यातदार शेतकरी प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन, विशाल अग्रवाल व वरूण अग्रवाल यांनी कृषिमंत्री दादा भुसे व राज्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निर्यातक्षम व गुणात्मक दर्जाची निर्यातीसाठी पॅकेजिंग केलेल्या केळीचा बॉक्स प्रदान केला.