शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

निसर्ग कोपला अन् बळीराजाच्या मुळावर उठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST

हा प्रवाह वाढत वाढत तो ९० हजार ते १ लाख क्युसेकपर्यंत वाढला. पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की, त्याने ...

हा प्रवाह वाढत वाढत तो ९० हजार ते १ लाख क्युसेकपर्यंत वाढला. पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की, त्याने पूर्ण नांद्रे गावाला वेढा दिला. अचानक वाढलेल्या नदीच्या प्रवाहामुळे नांद्रे येथील सर्व ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र अक्षरश: जागून काढली. संपूर्ण गाव भयभीत झाले. नदीचा प्रवाह बदलला. एक मार्ग जाणारा प्रवाह हा गावाच्या वरच्या भागाकडून दोन भागात विभागला गेला. त्यामुळे गावाला वेढा बसून शेतातूनच नदीने मार्गक्रमण करीत शेतात उभ्या असलेल्या ऊस, कपाशी, केळी, पपई ही पिके अक्षरश: पाण्यात वाहून गेली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून नदीने प्रवाह बदलला, त्या शेतकऱ्यांची शेतातील मातीच वाहून गेली. तेथे नदीचा आकार तयार झाला तर काही शेतकऱ्यांचे पाणी उपसण्याच्या मोटारी, इलेक्ट्रिक पोल, तार, पाइपलाइन, ठिबकच्या नळ्या वाहून गेल्यात.

रवींद्र शिवराम पाटील, बाळासाहेब मांगो पाटील, नलिंद्र दयाराम पाटील, भाऊसाहेब नाना पाटील, बाळकृष्ण जगन्नाथ पाटील, चंद्रकांत पुंडलिक पाटील, बाळासाहेब भगवान पाटील, रामभाऊ दयाराम पाटील, सीताराम तुकाराम पाटील, हरिदास भिला पाटील, सुरेश भिला पाटील, ज्ञानेश्वर धर्मा पाटील तसेच इतर काही शेतकऱ्यांचे ऊसाचे व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रवींद्र पाटील व बाळासाहेब पाटील, शिरसाठ तलाठी यांच्या शेतात तर मातीच राहिली नाही. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांच्या गायी व म्हशी तसेच पत्र्याचे शेड पुरात वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. १९७२ पासून मन्याड धरणाची निर्मिती झाली, तेव्हापासून तर आजपर्यंत कधी न पाहिलेला महापूर प्रथमच बघायला मिळाला.

सकाळीच मन्याडवरील माणिकपुंज धरण फुटल्याची अफवा कानावर येताच सर्व ग्रामस्थांनी गाव सोडून जवळच असलेल्या काकडणे रस्त्याकडील भिल्ल वस्तीच्या टेकडीचा आधार घेत काही तासांत गाव खाली केले. नंतर दुपारी १२-१च्या दरम्यान नदीचा पूर ओसरलेला पाहून तसेच माणिकपुंज फुटल्याची अफवा असल्याची खात्री करून नंतर गाव व परिसरात अजून किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेत होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी दुपारी नांद्रे सायगावला भेट देत नुकसानाची पाहणी केली.

080921\08jal_13_08092021_12.jpg~080921\08jal_14_08092021_12.jpg~080921\08jal_15_08092021_12.jpg

गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.~गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.~गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.