शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
3
तुमचं गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार? आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?
4
डीके शिवकुमारांना मुख्यमंत्रिपदाची संधी कधी मिळणार? CM सिद्धारमैया थेट बोलले...
5
एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका
6
'एक कप और'ची सवय पडेल महागात; हिवाळ्यात जास्त चहा-कॉफी प्यायल्याने वाढू शकते गुडघेदुखी
7
सरकारी डिफेन्स कंपनीला २,४६१ कोटींची मोठी ऑर्डर! 'मेक इन इंडिया'मुळे नफ्यात ७६% ची रेकॉर्डब्रेक वाढ!
8
Nanded Murder Case: आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
9
Pankaja Munde: "मला आणि धनंजय मुंडेंना सतत बहीण-भाऊ' म्हणणं थांबवा!" पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
10
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
11
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
12
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
13
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
14
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
15
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
16
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
17
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
18
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
19
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
20
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग कोपला अन् बळीराजाच्या मुळावर उठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST

हा प्रवाह वाढत वाढत तो ९० हजार ते १ लाख क्युसेकपर्यंत वाढला. पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की, त्याने ...

हा प्रवाह वाढत वाढत तो ९० हजार ते १ लाख क्युसेकपर्यंत वाढला. पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की, त्याने पूर्ण नांद्रे गावाला वेढा दिला. अचानक वाढलेल्या नदीच्या प्रवाहामुळे नांद्रे येथील सर्व ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र अक्षरश: जागून काढली. संपूर्ण गाव भयभीत झाले. नदीचा प्रवाह बदलला. एक मार्ग जाणारा प्रवाह हा गावाच्या वरच्या भागाकडून दोन भागात विभागला गेला. त्यामुळे गावाला वेढा बसून शेतातूनच नदीने मार्गक्रमण करीत शेतात उभ्या असलेल्या ऊस, कपाशी, केळी, पपई ही पिके अक्षरश: पाण्यात वाहून गेली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून नदीने प्रवाह बदलला, त्या शेतकऱ्यांची शेतातील मातीच वाहून गेली. तेथे नदीचा आकार तयार झाला तर काही शेतकऱ्यांचे पाणी उपसण्याच्या मोटारी, इलेक्ट्रिक पोल, तार, पाइपलाइन, ठिबकच्या नळ्या वाहून गेल्यात.

रवींद्र शिवराम पाटील, बाळासाहेब मांगो पाटील, नलिंद्र दयाराम पाटील, भाऊसाहेब नाना पाटील, बाळकृष्ण जगन्नाथ पाटील, चंद्रकांत पुंडलिक पाटील, बाळासाहेब भगवान पाटील, रामभाऊ दयाराम पाटील, सीताराम तुकाराम पाटील, हरिदास भिला पाटील, सुरेश भिला पाटील, ज्ञानेश्वर धर्मा पाटील तसेच इतर काही शेतकऱ्यांचे ऊसाचे व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रवींद्र पाटील व बाळासाहेब पाटील, शिरसाठ तलाठी यांच्या शेतात तर मातीच राहिली नाही. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांच्या गायी व म्हशी तसेच पत्र्याचे शेड पुरात वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. १९७२ पासून मन्याड धरणाची निर्मिती झाली, तेव्हापासून तर आजपर्यंत कधी न पाहिलेला महापूर प्रथमच बघायला मिळाला.

सकाळीच मन्याडवरील माणिकपुंज धरण फुटल्याची अफवा कानावर येताच सर्व ग्रामस्थांनी गाव सोडून जवळच असलेल्या काकडणे रस्त्याकडील भिल्ल वस्तीच्या टेकडीचा आधार घेत काही तासांत गाव खाली केले. नंतर दुपारी १२-१च्या दरम्यान नदीचा पूर ओसरलेला पाहून तसेच माणिकपुंज फुटल्याची अफवा असल्याची खात्री करून नंतर गाव व परिसरात अजून किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेत होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी दुपारी नांद्रे सायगावला भेट देत नुकसानाची पाहणी केली.

080921\08jal_13_08092021_12.jpg~080921\08jal_14_08092021_12.jpg~080921\08jal_15_08092021_12.jpg

गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.~गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.~गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.