शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

निसर्ग कोपला अन् बळीराजाच्या मुळावर उठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST

हा प्रवाह वाढत वाढत तो ९० हजार ते १ लाख क्युसेकपर्यंत वाढला. पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की, त्याने ...

हा प्रवाह वाढत वाढत तो ९० हजार ते १ लाख क्युसेकपर्यंत वाढला. पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की, त्याने पूर्ण नांद्रे गावाला वेढा दिला. अचानक वाढलेल्या नदीच्या प्रवाहामुळे नांद्रे येथील सर्व ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र अक्षरश: जागून काढली. संपूर्ण गाव भयभीत झाले. नदीचा प्रवाह बदलला. एक मार्ग जाणारा प्रवाह हा गावाच्या वरच्या भागाकडून दोन भागात विभागला गेला. त्यामुळे गावाला वेढा बसून शेतातूनच नदीने मार्गक्रमण करीत शेतात उभ्या असलेल्या ऊस, कपाशी, केळी, पपई ही पिके अक्षरश: पाण्यात वाहून गेली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून नदीने प्रवाह बदलला, त्या शेतकऱ्यांची शेतातील मातीच वाहून गेली. तेथे नदीचा आकार तयार झाला तर काही शेतकऱ्यांचे पाणी उपसण्याच्या मोटारी, इलेक्ट्रिक पोल, तार, पाइपलाइन, ठिबकच्या नळ्या वाहून गेल्यात.

रवींद्र शिवराम पाटील, बाळासाहेब मांगो पाटील, नलिंद्र दयाराम पाटील, भाऊसाहेब नाना पाटील, बाळकृष्ण जगन्नाथ पाटील, चंद्रकांत पुंडलिक पाटील, बाळासाहेब भगवान पाटील, रामभाऊ दयाराम पाटील, सीताराम तुकाराम पाटील, हरिदास भिला पाटील, सुरेश भिला पाटील, ज्ञानेश्वर धर्मा पाटील तसेच इतर काही शेतकऱ्यांचे ऊसाचे व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रवींद्र पाटील व बाळासाहेब पाटील, शिरसाठ तलाठी यांच्या शेतात तर मातीच राहिली नाही. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांच्या गायी व म्हशी तसेच पत्र्याचे शेड पुरात वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. १९७२ पासून मन्याड धरणाची निर्मिती झाली, तेव्हापासून तर आजपर्यंत कधी न पाहिलेला महापूर प्रथमच बघायला मिळाला.

सकाळीच मन्याडवरील माणिकपुंज धरण फुटल्याची अफवा कानावर येताच सर्व ग्रामस्थांनी गाव सोडून जवळच असलेल्या काकडणे रस्त्याकडील भिल्ल वस्तीच्या टेकडीचा आधार घेत काही तासांत गाव खाली केले. नंतर दुपारी १२-१च्या दरम्यान नदीचा पूर ओसरलेला पाहून तसेच माणिकपुंज फुटल्याची अफवा असल्याची खात्री करून नंतर गाव व परिसरात अजून किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेत होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी दुपारी नांद्रे सायगावला भेट देत नुकसानाची पाहणी केली.

080921\08jal_13_08092021_12.jpg~080921\08jal_14_08092021_12.jpg~080921\08jal_15_08092021_12.jpg

गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.~गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.~गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.