शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

निसर्ग कोपला अन् बळीराजाच्या मुळावर उठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST

हा प्रवाह वाढत वाढत तो ९० हजार ते १ लाख क्युसेकपर्यंत वाढला. पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की, त्याने ...

हा प्रवाह वाढत वाढत तो ९० हजार ते १ लाख क्युसेकपर्यंत वाढला. पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की, त्याने पूर्ण नांद्रे गावाला वेढा दिला. अचानक वाढलेल्या नदीच्या प्रवाहामुळे नांद्रे येथील सर्व ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र अक्षरश: जागून काढली. संपूर्ण गाव भयभीत झाले. नदीचा प्रवाह बदलला. एक मार्ग जाणारा प्रवाह हा गावाच्या वरच्या भागाकडून दोन भागात विभागला गेला. त्यामुळे गावाला वेढा बसून शेतातूनच नदीने मार्गक्रमण करीत शेतात उभ्या असलेल्या ऊस, कपाशी, केळी, पपई ही पिके अक्षरश: पाण्यात वाहून गेली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून नदीने प्रवाह बदलला, त्या शेतकऱ्यांची शेतातील मातीच वाहून गेली. तेथे नदीचा आकार तयार झाला तर काही शेतकऱ्यांचे पाणी उपसण्याच्या मोटारी, इलेक्ट्रिक पोल, तार, पाइपलाइन, ठिबकच्या नळ्या वाहून गेल्यात.

रवींद्र शिवराम पाटील, बाळासाहेब मांगो पाटील, नलिंद्र दयाराम पाटील, भाऊसाहेब नाना पाटील, बाळकृष्ण जगन्नाथ पाटील, चंद्रकांत पुंडलिक पाटील, बाळासाहेब भगवान पाटील, रामभाऊ दयाराम पाटील, सीताराम तुकाराम पाटील, हरिदास भिला पाटील, सुरेश भिला पाटील, ज्ञानेश्वर धर्मा पाटील तसेच इतर काही शेतकऱ्यांचे ऊसाचे व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रवींद्र पाटील व बाळासाहेब पाटील, शिरसाठ तलाठी यांच्या शेतात तर मातीच राहिली नाही. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांच्या गायी व म्हशी तसेच पत्र्याचे शेड पुरात वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. १९७२ पासून मन्याड धरणाची निर्मिती झाली, तेव्हापासून तर आजपर्यंत कधी न पाहिलेला महापूर प्रथमच बघायला मिळाला.

सकाळीच मन्याडवरील माणिकपुंज धरण फुटल्याची अफवा कानावर येताच सर्व ग्रामस्थांनी गाव सोडून जवळच असलेल्या काकडणे रस्त्याकडील भिल्ल वस्तीच्या टेकडीचा आधार घेत काही तासांत गाव खाली केले. नंतर दुपारी १२-१च्या दरम्यान नदीचा पूर ओसरलेला पाहून तसेच माणिकपुंज फुटल्याची अफवा असल्याची खात्री करून नंतर गाव व परिसरात अजून किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेत होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी दुपारी नांद्रे सायगावला भेट देत नुकसानाची पाहणी केली.

080921\08jal_13_08092021_12.jpg~080921\08jal_14_08092021_12.jpg~080921\08jal_15_08092021_12.jpg

गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.~गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.~गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.