शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादला पावसाळ्यातही आठव्या दिवशी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यातसुद्धा आर.ओ. प्रणालीचे शुद्ध पाणी मिळाले नाही. उन्हाळा गेला, पावसाळा आला; मात्र स्थिती तीच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ...

ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यातसुद्धा आर.ओ. प्रणालीचे शुद्ध पाणी मिळाले नाही. उन्हाळा गेला, पावसाळा आला; मात्र स्थिती तीच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कायम होत असल्या तरी समस्या मात्र कायमच आहे.

जिल्ह्यातील मोठे गाव व राजकीयदृष्ट्या महत्त्व म्हणून ओळख असलेल्या नशिराबाद गावात पाणी टंचाईची समस्या वर्षानुवर्षांपासून कायम आहे. येथे दरवर्षी पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. कायमस्वरूपी पाणीटंचाईवर मात करण्याकरिता अनेक योजनांचे नियोजन करण्यात आले. काही योजना अमलात आल्या; मात्र त्या यशस्वी झाल्या नाहीत. सुमारे १६ कोटी रुपयांची शेळगाव बॅरेजची पाणी योजना पाण्यातच गेली आहे. अनेकांनी या योजनेबाबत ताशेरे ओढले; मात्र आता गावकऱ्यांची पाणी समस्या सोडविण्याकरिता एकही जण पुढे येत नाही, ही शोकांतिका आहे. शेळगाव बॅरेज पाणीयोजना सुरुवात झाल्यापासूनच यशस्वी ठरली नाही. योजनेचे वीज बिल लाखोंच्या घरात असल्यामुळे नाकापेक्षा मोती जड, अशी योजनेची स्थिती झाली आहे.

सध्या गावाला आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. गावातील स्थानिक जलस्रोत यांसह बेळी, वाघुर, मुर्दापूर आदी ठिकाणावरून संकलित केलेल्या पाण्याचा गावाला पुरवठा केला जातो; मात्र बेळी येथून येणाऱ्या पाण्याचा पुरवठा मुबलक आहे, मात्र नियोजन नाही. तर मुर्दापूर येथे जलपातळी खोल गेल्यामुळे पाणी पुरवठा करण्यावर परिणाम होत आहे. आठवड्यातून एक वेळ, अवेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे महिला त्रस्त आहेत.

सध्या ग्रामपंचायत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी गप्प आहेत. नगरपंचायतची स्वप्नपूर्ती अमलात येईल तोपर्यंत ग्रामस्थांच्या समस्या कायमच राहतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शंभरी गाठणारी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरली आहे.

दरम्यान आमदार, खासदार, मंत्री नशिराबाद पाणी समस्येची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकदा ओरड होऊनसुद्धा याबाबत बिकट बनलेल्या पाणीप्रश्नी सर्वांनीच पाठ फिरविली असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहे, पाण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत भुरळ घालणारे नेते लोकप्रतिनिधी आता गेलेत कुठे? अशी चर्चा आता गावात रंगू लागली आहे. सध्या ग्रामपंचायत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी गप्प आहेत. नगरपंचायतची स्वप्नपूर्ती अमलात येईल, तोपर्यंत ग्रामस्थांच्या समस्या कायमच राहतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शंभरी गाठणारी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरली आहे.

दरम्यान आमदार, खासदार, मंत्री नशिराबाद पाणी समस्येची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकदा ओरड होऊनसुद्धा याबाबत बिकट बनलेल्या पाणीप्रश्नी सर्वांनीच पाठ फिरविली असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहेत. पाण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत भुरळ घालणारे नेते, लोकप्रतिनिधी आता गेलेत कुठे? अशी चर्चा आता गावात रंगू लागली आहे.