शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

नशिराबादला पावसाळ्यातही आठव्या दिवशी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यातसुद्धा आर.ओ. प्रणालीचे शुद्ध पाणी मिळाले नाही. उन्हाळा गेला, पावसाळा आला; मात्र स्थिती तीच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ...

ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यातसुद्धा आर.ओ. प्रणालीचे शुद्ध पाणी मिळाले नाही. उन्हाळा गेला, पावसाळा आला; मात्र स्थिती तीच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कायम होत असल्या तरी समस्या मात्र कायमच आहे.

जिल्ह्यातील मोठे गाव व राजकीयदृष्ट्या महत्त्व म्हणून ओळख असलेल्या नशिराबाद गावात पाणी टंचाईची समस्या वर्षानुवर्षांपासून कायम आहे. येथे दरवर्षी पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. कायमस्वरूपी पाणीटंचाईवर मात करण्याकरिता अनेक योजनांचे नियोजन करण्यात आले. काही योजना अमलात आल्या; मात्र त्या यशस्वी झाल्या नाहीत. सुमारे १६ कोटी रुपयांची शेळगाव बॅरेजची पाणी योजना पाण्यातच गेली आहे. अनेकांनी या योजनेबाबत ताशेरे ओढले; मात्र आता गावकऱ्यांची पाणी समस्या सोडविण्याकरिता एकही जण पुढे येत नाही, ही शोकांतिका आहे. शेळगाव बॅरेज पाणीयोजना सुरुवात झाल्यापासूनच यशस्वी ठरली नाही. योजनेचे वीज बिल लाखोंच्या घरात असल्यामुळे नाकापेक्षा मोती जड, अशी योजनेची स्थिती झाली आहे.

सध्या गावाला आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. गावातील स्थानिक जलस्रोत यांसह बेळी, वाघुर, मुर्दापूर आदी ठिकाणावरून संकलित केलेल्या पाण्याचा गावाला पुरवठा केला जातो; मात्र बेळी येथून येणाऱ्या पाण्याचा पुरवठा मुबलक आहे, मात्र नियोजन नाही. तर मुर्दापूर येथे जलपातळी खोल गेल्यामुळे पाणी पुरवठा करण्यावर परिणाम होत आहे. आठवड्यातून एक वेळ, अवेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे महिला त्रस्त आहेत.

सध्या ग्रामपंचायत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी गप्प आहेत. नगरपंचायतची स्वप्नपूर्ती अमलात येईल तोपर्यंत ग्रामस्थांच्या समस्या कायमच राहतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शंभरी गाठणारी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरली आहे.

दरम्यान आमदार, खासदार, मंत्री नशिराबाद पाणी समस्येची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकदा ओरड होऊनसुद्धा याबाबत बिकट बनलेल्या पाणीप्रश्नी सर्वांनीच पाठ फिरविली असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहे, पाण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत भुरळ घालणारे नेते लोकप्रतिनिधी आता गेलेत कुठे? अशी चर्चा आता गावात रंगू लागली आहे. सध्या ग्रामपंचायत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी गप्प आहेत. नगरपंचायतची स्वप्नपूर्ती अमलात येईल, तोपर्यंत ग्रामस्थांच्या समस्या कायमच राहतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शंभरी गाठणारी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरली आहे.

दरम्यान आमदार, खासदार, मंत्री नशिराबाद पाणी समस्येची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकदा ओरड होऊनसुद्धा याबाबत बिकट बनलेल्या पाणीप्रश्नी सर्वांनीच पाठ फिरविली असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहेत. पाण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत भुरळ घालणारे नेते, लोकप्रतिनिधी आता गेलेत कुठे? अशी चर्चा आता गावात रंगू लागली आहे.