शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

नशिराबादला पावसाळ्यातही आठव्या दिवशी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यातसुद्धा आर.ओ. प्रणालीचे शुद्ध पाणी मिळाले नाही. उन्हाळा गेला, पावसाळा आला; मात्र स्थिती तीच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ...

ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यातसुद्धा आर.ओ. प्रणालीचे शुद्ध पाणी मिळाले नाही. उन्हाळा गेला, पावसाळा आला; मात्र स्थिती तीच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कायम होत असल्या तरी समस्या मात्र कायमच आहे.

जिल्ह्यातील मोठे गाव व राजकीयदृष्ट्या महत्त्व म्हणून ओळख असलेल्या नशिराबाद गावात पाणी टंचाईची समस्या वर्षानुवर्षांपासून कायम आहे. येथे दरवर्षी पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. कायमस्वरूपी पाणीटंचाईवर मात करण्याकरिता अनेक योजनांचे नियोजन करण्यात आले. काही योजना अमलात आल्या; मात्र त्या यशस्वी झाल्या नाहीत. सुमारे १६ कोटी रुपयांची शेळगाव बॅरेजची पाणी योजना पाण्यातच गेली आहे. अनेकांनी या योजनेबाबत ताशेरे ओढले; मात्र आता गावकऱ्यांची पाणी समस्या सोडविण्याकरिता एकही जण पुढे येत नाही, ही शोकांतिका आहे. शेळगाव बॅरेज पाणीयोजना सुरुवात झाल्यापासूनच यशस्वी ठरली नाही. योजनेचे वीज बिल लाखोंच्या घरात असल्यामुळे नाकापेक्षा मोती जड, अशी योजनेची स्थिती झाली आहे.

सध्या गावाला आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. गावातील स्थानिक जलस्रोत यांसह बेळी, वाघुर, मुर्दापूर आदी ठिकाणावरून संकलित केलेल्या पाण्याचा गावाला पुरवठा केला जातो; मात्र बेळी येथून येणाऱ्या पाण्याचा पुरवठा मुबलक आहे, मात्र नियोजन नाही. तर मुर्दापूर येथे जलपातळी खोल गेल्यामुळे पाणी पुरवठा करण्यावर परिणाम होत आहे. आठवड्यातून एक वेळ, अवेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे महिला त्रस्त आहेत.

सध्या ग्रामपंचायत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी गप्प आहेत. नगरपंचायतची स्वप्नपूर्ती अमलात येईल तोपर्यंत ग्रामस्थांच्या समस्या कायमच राहतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शंभरी गाठणारी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरली आहे.

दरम्यान आमदार, खासदार, मंत्री नशिराबाद पाणी समस्येची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकदा ओरड होऊनसुद्धा याबाबत बिकट बनलेल्या पाणीप्रश्नी सर्वांनीच पाठ फिरविली असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहे, पाण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत भुरळ घालणारे नेते लोकप्रतिनिधी आता गेलेत कुठे? अशी चर्चा आता गावात रंगू लागली आहे. सध्या ग्रामपंचायत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी गप्प आहेत. नगरपंचायतची स्वप्नपूर्ती अमलात येईल, तोपर्यंत ग्रामस्थांच्या समस्या कायमच राहतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शंभरी गाठणारी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरली आहे.

दरम्यान आमदार, खासदार, मंत्री नशिराबाद पाणी समस्येची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकदा ओरड होऊनसुद्धा याबाबत बिकट बनलेल्या पाणीप्रश्नी सर्वांनीच पाठ फिरविली असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहेत. पाण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत भुरळ घालणारे नेते, लोकप्रतिनिधी आता गेलेत कुठे? अशी चर्चा आता गावात रंगू लागली आहे.