शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादला पावसाळ्यातही आठव्या दिवशी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यातसुद्धा आर.ओ. प्रणालीचे शुद्ध पाणी मिळाले नाही. उन्हाळा गेला, पावसाळा आला; मात्र स्थिती तीच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ...

ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यातसुद्धा आर.ओ. प्रणालीचे शुद्ध पाणी मिळाले नाही. उन्हाळा गेला, पावसाळा आला; मात्र स्थिती तीच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कायम होत असल्या तरी समस्या मात्र कायमच आहे.

जिल्ह्यातील मोठे गाव व राजकीयदृष्ट्या महत्त्व म्हणून ओळख असलेल्या नशिराबाद गावात पाणी टंचाईची समस्या वर्षानुवर्षांपासून कायम आहे. येथे दरवर्षी पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. कायमस्वरूपी पाणीटंचाईवर मात करण्याकरिता अनेक योजनांचे नियोजन करण्यात आले. काही योजना अमलात आल्या; मात्र त्या यशस्वी झाल्या नाहीत. सुमारे १६ कोटी रुपयांची शेळगाव बॅरेजची पाणी योजना पाण्यातच गेली आहे. अनेकांनी या योजनेबाबत ताशेरे ओढले; मात्र आता गावकऱ्यांची पाणी समस्या सोडविण्याकरिता एकही जण पुढे येत नाही, ही शोकांतिका आहे. शेळगाव बॅरेज पाणीयोजना सुरुवात झाल्यापासूनच यशस्वी ठरली नाही. योजनेचे वीज बिल लाखोंच्या घरात असल्यामुळे नाकापेक्षा मोती जड, अशी योजनेची स्थिती झाली आहे.

सध्या गावाला आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. गावातील स्थानिक जलस्रोत यांसह बेळी, वाघुर, मुर्दापूर आदी ठिकाणावरून संकलित केलेल्या पाण्याचा गावाला पुरवठा केला जातो; मात्र बेळी येथून येणाऱ्या पाण्याचा पुरवठा मुबलक आहे, मात्र नियोजन नाही. तर मुर्दापूर येथे जलपातळी खोल गेल्यामुळे पाणी पुरवठा करण्यावर परिणाम होत आहे. आठवड्यातून एक वेळ, अवेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे महिला त्रस्त आहेत.

सध्या ग्रामपंचायत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी गप्प आहेत. नगरपंचायतची स्वप्नपूर्ती अमलात येईल तोपर्यंत ग्रामस्थांच्या समस्या कायमच राहतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शंभरी गाठणारी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरली आहे.

दरम्यान आमदार, खासदार, मंत्री नशिराबाद पाणी समस्येची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकदा ओरड होऊनसुद्धा याबाबत बिकट बनलेल्या पाणीप्रश्नी सर्वांनीच पाठ फिरविली असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहे, पाण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत भुरळ घालणारे नेते लोकप्रतिनिधी आता गेलेत कुठे? अशी चर्चा आता गावात रंगू लागली आहे. सध्या ग्रामपंचायत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने अनेक लोकप्रतिनिधी गप्प आहेत. नगरपंचायतची स्वप्नपूर्ती अमलात येईल, तोपर्यंत ग्रामस्थांच्या समस्या कायमच राहतील का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शंभरी गाठणारी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरली आहे.

दरम्यान आमदार, खासदार, मंत्री नशिराबाद पाणी समस्येची दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकदा ओरड होऊनसुद्धा याबाबत बिकट बनलेल्या पाणीप्रश्नी सर्वांनीच पाठ फिरविली असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहेत. पाण्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही, असे आश्वासन देत भुरळ घालणारे नेते, लोकप्रतिनिधी आता गेलेत कुठे? अशी चर्चा आता गावात रंगू लागली आहे.