शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

मनपाच्या ११ विषय समित्यांसाठी महासभेत सुचविली जाणार नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - मनपातील विषय समित्या लवकरच गठीत करण्यात येणार आहेत. गेल्या महासभेत ११ विषय समित्या बरखास्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - मनपातील विषय समित्या लवकरच गठीत करण्यात येणार आहेत. गेल्या महासभेत ११ विषय समित्या बरखास्त करून, नवीन विषय समित्या गठीत करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. आता १८ रोजी होणाऱ्या महासभेत ११ समित्यांच्या सदस्यांचे नावे भाजप व शिवसेनेच्या गटनेत्यांकडून सूचविली जाणार आहे. या निवडीसंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महापौरांच्या दालनात गटनेत्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत महापौर भारती सोनवणे यांच्यासह स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, भाजप गटनेते भगत बालाणी, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. विषय समिती सदस्यांची निवड ही एक वर्षांसाठी करण्यात येत असते. मनपात भाजपाची सत्ता आल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर म्हणजेच ऑगस्ट २०१९ मध्ये समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर पहिल्या वर्षात सत्ताधाऱ्यांनी समित्याच गठीत केल्या नव्हत्या.

शिवसेनेचे सदस्यही घेणार सहभाग

प्रत्येक समितीमध्ये ७ सदस्य असून त्यात पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या ५ तर सेनेच्या २ सदस्यांचा समावेश करता येणार आहे. गेल्यावर्षी स्थापन समित्यांमध्ये शिवसेनेच्या सदस्यांनी सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे सातही समित्यांवर भाजपच्याच सदस्यांची वर्णी लागली होती. मात्र, यावर्षी शिवसेना देखील आपल्या २ जागांवर सदस्यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती गटनेते अनंत जोशी यांनी दिली. दरम्यान, संख्येनुसार एमआयएमचे सदस्य कमी असल्याने त्यांच्या सदस्याचा समितीमध्ये समावेश करता येऊ शकणार नाही

या समित्या होणार गठीत

मनपात असलेल्या बांधकाम समिती, अतिक्रमण समिती, स्वच्छता समिती, पाणी पुरवठा समिती, दवाखाना समिती, नियोजन समिती, आस्थापना समिती, विधी समिती, वाहन व्यवस्था समिती, शिक्षण समिती, विद्युत समितीमध्ये सदस्य निवडीसाठी गटनेत्यांनी आपापल्या पक्षाच्या सदस्यांची नावे बंद पाकिटात महासभेत महापौरांकडे द्यायची असून त्यानंतर महासभेत समित्यांना मान्यता दिली जाणार आहे.