शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोंगाटातही साधला जातोय नेम

By admin | Updated: March 4, 2017 12:55 IST

दोन आंतरराष्ट्रीय नेमबाज, ७० ते ८० राष्ट्रीय खेळाडू आणि पाच हजारांच्या वर इतर खेळाडू घडले, ते ही शूटिंग रेंजशिवाय. ही कामगिरी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनने करून दाखवली आहे.

जळगाव : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडवूनही रेंजशिवाय शूटींग आकाश नेवे, ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. ४ -  दोन आंतरराष्ट्रीय नेमबाज, ७० ते ८० राष्ट्रीय खेळाडू आणि पाच हजारांच्या वर इतर खेळाडू घडले, ते ही शूटिंग रेंजशिवाय. ही कामगिरी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनने करून दाखवली आहे. या खेळाला जळगावात सुरू होऊन ३० वर्षे झालेली असली तरी अजूनही खेळाडू खुल्या जागेत गोंधळ, गोंगाटातच सराव करतात.जिल्ह्यातील नेमबाजांचा वनवास आज ३० वर्षांनंतरही कायम आहे. संघटनेच्या स्थापनेला ३० वर्षे झालेली असली तर शासनाने अजून जिल्ह्यात शूटिंग रेंज उपलब्ध करून दिलेली नाही. या बिकट परिस्थितीत संघटनेचे सचिव आणि प्रशिक्षक दिलीप गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्ग काढत दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच ५०० च्या वर राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत.१९८६-८७ च्या सुमारास जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनची स्थापना केली. राज्यभरात तोपर्यंत मुंबई आणि कोल्हापूर येथेच या खेळाच्या अधिकृत संघटना कार्यरत होत्या. जळगावात स्थापन झालेली ही तिसरीच संघटना. त्या वेळी मेहरूण शिवारातील शिवाजी उद्यानात खुल्या जागेत नेमबाजीचा सराव केला जात होता. त्यानंतर महापालिकेच्या शाळेत सराव केला जात होता. कालांतराने गणपतीनगरात पायोनियर स्पोर्ट्स क्लबने नेमबाजांना सरावासाठी जागा उपलब्ध करून दिली.नेमबाजीचा सराव हा बंदिस्त जागेत केला जातो. मात्र, जळगावात आजही सराव खुल्या जागेत केला जातो. हा सराव करताना आवाज, गोंगाट होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. मात्र, बंदिस्त जागेअभावी अशी कोणतीही सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिली जात नाही. आपण मारलेले शॉट हे योग्य जागी लागलेले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी सध्या इलेक्ट्रॉनिक पुली किंवा अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला जातो. त्याचद्वारे खेळाडूचे गुणही मोजले जातात. मात्र, जळगाव जिल्हा संघटनेकडे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा नाही. जिल्हा संघटनेकडे फक्त पूर्वीच्या काळी वापरली जात होती, तशीच पुली आहे.त्यामुळे खेळाडूंना आपले गुण किती आहेत, हे नेमके कळत नाही. सराव जुन्या पद्धतीच्या साहित्यावर होत असला तरी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धा मात्र अत्याधुनिक साहित्यावरच होतात. त्यामुळे ऐन स्पर्धेत खेळाडूंना याचा फटका बसतो.रायफल असोसिएशनकडे जागेची वानवा असल्याने आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धेच्या सरावासाठी एका साहित्य ठेवायच्या चिंचोळ््या खोलीतच दोन नेमबाज सराव करू शकतील, अशी रेंज सुरू केली आहे. याला पत्र्याचे छप्पर असल्याने पावसात पत्र्याच्या आवाजाने आणि उन्हाळ््यात उष्णतेमुळे ही रेंज वापरण्याच्या योग्य राहत नाही. त्याशिवाय बाजूलाच इतर खेळांचा सराव होत असतो. त्यामुळे नेमबाजाच्या कामगिरीवर आवाजाचा परिणामही होतो. याच खोलीच्या पुढे मोकळ््या जागेत इतर खेळाडू सराव करतात. स्पर्धांमध्ये ५० मीटरवर खेळणारे खेळाडू सराव मात्र दहा मीटरवरच करतात. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. असे असले तरी जिल्ह्यातील नेमबाजांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.