शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

नगरपालिका, नगरपंचायतीची प्रभागरचना अडकली कच्च्या आराखड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST

अमळनेर : राज्यातील काही जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथे हल्ली प्रभाग रचना ...

अमळनेर : राज्यातील काही जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथे हल्ली प्रभाग रचना निश्चित करण्याचे काम सुरू आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेले हे काम किती दिवसांत पूर्ण करायचे? तयार करण्यात आलेले कच्चे आराखडे केव्हा आयोगाकडे पाठवायचे? याबाबतचे कोणतेही वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायतींची प्रभाग रचना एका अर्थाने कच्च्या आराखड्यातच अडकली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे संकेत देत प्रभाग रचना निश्चित करण्याचे काम सुरू करायला सांगितले. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कार्यकाळ संपुष्टात येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.

अमळनेरात तयारी सुरू

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे नेते, इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी निवडणुकांची तयारी सुरू आहे. बहुतांश नेत्यांनी रणनितीचे पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. मात्र त्यांची व्यूहरचना तयार असल्याचे दिसून येते. आरक्षणाच्या चक्राकार पद्धतीप्रमाणे यावेळी नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती किंवा जमातीसाठी राखीव राहणार असल्याचीही चर्चा आहे. या शक्यतेला गृहीत धरूनही काहींचे आराखडे तयार करणे सुरू आहे. अर्थात जोपर्यंत राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचनेच्या आराखड्याला अंतिम मंजुरी देत नाही, तोपर्यंत या सर्व बाबी ‘जर-तर’च्याच चौकटीत अडकल्या आहेत. त्यामुळे तूर्तास तरी राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकाची वाट बघणे सुरू आहे. जनता जनार्दन, नेते आणि इच्छुकांसह नगरपालिका प्रशासनही वेळापत्रकाच्याच प्रतीक्षेत आहे.