शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

मुंबईतील बैठक काँग्रेससाठी पोषक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

मुंबईत झालेल्या बैठकीत स्थानिक संघटनात्मक बदलांवर ऊहापोह झाला. यात जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्यापासून ते उपाध्यक्ष अविनाश ...

मुंबईत झालेल्या बैठकीत स्थानिक संघटनात्मक बदलांवर ऊहापोह झाला. यात जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्यापासून ते उपाध्यक्ष अविनाश भालेराव, राजीव पाटील, विजय महाजन, अशोक खलाणे अशी नावे आता आगामी जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत येत आहेत. ॲड. संदीप पाटील यांच्याबद्दल दोनही मतप्रवाह या बैठकीत उमटले. आमदार शिरीष चौधरी यांना पक्षाच्या बाबतीत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार या बैठकीत देण्यात आले आहेत. आगामी निवडणुकांचा विचार केला असता होणारे हे बदल काँग्रेससाठी अत्यावश्यक असल्याचा सूर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांकडून उमटतो. येत्या सहा ते आठ महिन्यांत जिल्हा परिषदेची मोठी निवडणूक राहणार आहे. यासह पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसची ताकद सद्य:स्थितीत कमी आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे चार सदस्य आहेत. मात्र, त्यातील एक सदस्य हे भाजपच्या गोटात आहेत. त्यामुळे कागदावर चार, प्रत्यक्षात तीन सदस्य अशी काँग्रेसची जिल्हा परिषदेत अवस्था आहे. त्यात शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्या दिल्यानंतर आता आपल्यालाही स्वबळाच्या ताकदीवरच पुढील निवडणुकांमध्ये उतरायचे असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केले आहे. त्या मानाने काँग्रेसकडे वेळ कमी आहे. त्यामुळे होणारे बदल हे संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने अगदी विचारपूर्वक करावे लागणार आहेत. मात्र, त्यात स्मार्ट वर्क ही संकल्पना काँग्रेसला राबवावी लागणार आहे. मात्र, स्थानिक काँग्रेसकडे पक्षश्रेष्ठींनी लक्ष दिल्याचा एक संदेश मुंबईच्या बैठकीतून गेला आहे, जो अनेक झोपलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना जागे करणारा आहे.