शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

मुंबईतील बैठक काँग्रेससाठी पोषक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

मुंबईत झालेल्या बैठकीत स्थानिक संघटनात्मक बदलांवर ऊहापोह झाला. यात जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्यापासून ते उपाध्यक्ष अविनाश ...

मुंबईत झालेल्या बैठकीत स्थानिक संघटनात्मक बदलांवर ऊहापोह झाला. यात जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्यापासून ते उपाध्यक्ष अविनाश भालेराव, राजीव पाटील, विजय महाजन, अशोक खलाणे अशी नावे आता आगामी जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत येत आहेत. ॲड. संदीप पाटील यांच्याबद्दल दोनही मतप्रवाह या बैठकीत उमटले. आमदार शिरीष चौधरी यांना पक्षाच्या बाबतीत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार या बैठकीत देण्यात आले आहेत. आगामी निवडणुकांचा विचार केला असता होणारे हे बदल काँग्रेससाठी अत्यावश्यक असल्याचा सूर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांकडून उमटतो. येत्या सहा ते आठ महिन्यांत जिल्हा परिषदेची मोठी निवडणूक राहणार आहे. यासह पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसची ताकद सद्य:स्थितीत कमी आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे चार सदस्य आहेत. मात्र, त्यातील एक सदस्य हे भाजपच्या गोटात आहेत. त्यामुळे कागदावर चार, प्रत्यक्षात तीन सदस्य अशी काँग्रेसची जिल्हा परिषदेत अवस्था आहे. त्यात शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्या दिल्यानंतर आता आपल्यालाही स्वबळाच्या ताकदीवरच पुढील निवडणुकांमध्ये उतरायचे असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केले आहे. त्या मानाने काँग्रेसकडे वेळ कमी आहे. त्यामुळे होणारे बदल हे संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने अगदी विचारपूर्वक करावे लागणार आहेत. मात्र, त्यात स्मार्ट वर्क ही संकल्पना काँग्रेसला राबवावी लागणार आहे. मात्र, स्थानिक काँग्रेसकडे पक्षश्रेष्ठींनी लक्ष दिल्याचा एक संदेश मुंबईच्या बैठकीतून गेला आहे, जो अनेक झोपलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना जागे करणारा आहे.