शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

ममुराबादला गढूळ पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

तापी नदीला पूर : जल शुद्धीकरण केंद्र फक्त नावालाच लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : गावाला तापी नदीवरून सध्या खूपच ...

तापी नदीला पूर : जल शुद्धीकरण केंद्र फक्त नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : गावाला तापी नदीवरून सध्या खूपच गढूळ पाणीपुरवठा होत असून, सामूहिक योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र बिनकामाचे ठरल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, तापीला मोठा पूर आल्यामुळे गढूळ पाण्याची समस्या उद‌्भवल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे.

नांद्रा खुर्द येथे ममुराबाद सामूहीक पाणीपुरवठा योजनेसाठी जलशुद्धीकरण केंद्र व पंपिग स्टेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून विशेषतः जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरणसुद्धा पूर्ण झाले आहे. त्यानंतरही ममुराबाद गावात शंभर टक्के शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात होता. आता पावसाळ्यात थेट नदीतील गाळमिश्रित पाणीच पंपिंग होऊ लागल्याने ग्रामस्थांच्या तोंडाचे पाणीच पळाले आहे. अक्षरशः उकळत्या चहासारखा रंग असलेले पाणी नळांना येत असल्याने ते अजिबात पिण्यायोग्य राहिलेले नाही. जलशुद्धीकरण केंद्राची व्यवस्था असतानासुद्धा गढूळ पाणी नळांना येतेच कसे, असा प्रश्न त्यामुळे अनेकांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यातील जलजन्य आजारांची वाढती शक्यता लक्षात घेता तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

------------------

हतनूरचे दरवाजे उघडण्यात आल्याने तापी नदीला पूर आला आहे. त्यामुळे ममुराबाद गावाला गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने दोन-तीन दिवस पंपिंग बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

- हेमंत चौधरी, सरपंच, ममुराबाद

-

फोटो- ममुराबाद येथे तापी नदीवरून सध्या असा गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.