शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महावितरणचा थकबाकीदारांना ` शॉक `

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

जळगाव : कोरोनामुळे अनेक ग्राहकांनी विजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, परिणामी खान्देशात ६०० कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. ग्राहकांनी ...

जळगाव : कोरोनामुळे अनेक ग्राहकांनी विजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, परिणामी खान्देशात ६०० कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. ग्राहकांनी थकबाकी भरण्याबाबत महावितरणने आक्रमक भूमिका घेतली असून,जळगावसह धुळे व नंदुरबार मिळून १ हजार ७६२ थकबाकीदारांना बिल भरण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. तसेच दिलेल्या मुदतीत बिलाचा भरणा न केल्यास, अशा थकबाकीदारांचा थेट विज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महावितरणतर्फे शासनाच्या आदेशानुसार घरोघरी जाऊन रिडींग न घेता, ग्राहकांना सरासरी बिले देण्यात आली. मात्र, देण्यात आलेली सरासरी बिले ही जादा असल्याच्या अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या. ग्राहकांच्या या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणने जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरे घेतली.

यामध्ये अनेक ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येऊन, विजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्राहकांना हफ्त्यानेही बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

मात्र, तरीदेखील खान्देशातील घरगुती, औद्योगिक, कृषी, लघु आदी ग्राहकांनी मार्च २०२० पासून विजबिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीदारांची संख्या वाढत असून, वसुलीसाठी महावितरणपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

इन्फो :

कृषी पंपधारक ग्राहकांना वगळले

महावितरणच्या जळगाव परिमंडळात घरगुती, कृषी, औद्योगिक, वाणिज्य व इतर असे एकूण २२ लाखांच्या घरात ग्राहक आहेत. यामध्ये साडेतीन लाख ग्राहक हे कृषी पंप धारक शेतकरी आहेत. शासनाच्या सुचनेनुसार या कृषी पंपधारक शेतकऱ्यांना थकबाकी भरण्याबाबत कुठलीही नोटीस पाठविण्यात आलेली नाही.

इन्फो :

कोरोनामुळे कारवाई लांबली

शासनाने लॉकडाऊन कालावधीत घरोघरी जाऊन रिडींग न घेता, ग्राहकांना सरासरी विजबिले देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महावितरणतर्फे सरासरी बिले देण्यात आली. तसेच शासनातर्फे कोरोना काळात थकबाकीदार ग्राहकांकडुन कुठलीही वसुली अथवा कारवाई न करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळे महावितरणतर्फे कोरोनामुळे थकबाकीदारांविरोधात कुठलिही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, शासनाने नुकतेच हे निर्बध उठविल्यामुळे, महावितरणतर्फे थकबाकीदारांना नोटीसा पाठवून, कारवाईचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

इन्फो :

महावितरणतर्फे जास्त क्षमतेच्या विज वापर असलेल्या थकबाकीदार ग्राहकांना बिल भरण्याबबात नोटीस बजावण्यात येत असून, आतापर्यंत १ हजार ७६२ ग्राहकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांची संख्या मोठी असल्यामुळे महावितरणतर्फे शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक वायरमनला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. कोरोनामुळे थांबलेली वसुलीची मोहिम आता सुरू करण्यात आली आहे.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण जळगाव परिमंडळ.