शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जंक्शन’ ची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST

रेल्वेच्या माध्यमातून अवघ्या देशाला जोडणारे शहर म्हणून भुसावळ जंक्शनची ओळख आहे. देशातील बहुतांश सर्वच भागातून गाड्या येथे येत असल्यामुळे ...

रेल्वेच्या माध्यमातून अवघ्या देशाला जोडणारे शहर म्हणून भुसावळ जंक्शनची ओळख आहे. देशातील बहुतांश सर्वच भागातून गाड्या येथे येत असल्यामुळे विविध भागातून, राज्यातून नागरिक येथे येतात व काही काळ थांबल्यानंतर पुढील प्रवासास येथून रवाना होतात. त्यामुळे प्रचंड गर्दी या रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी असते. तर काही परदेशी पर्यटकही येथे येऊन अजिंठा व अन्य पर्यंटनाच्या ठिकाणी रवाना होत असतात.

दहशत संपली, पण...

रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाच्या या शहरात गेल्या वर्षी पहिल्या लाटेत व आता दुसऱ्या लाटेत भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. देान लाटेत मिळून येथे आजअखेर १३ हजार २०१ बाधित येथे आढळून आले आहेत. तर ३३५ जणांचा कोेरोनाने बळी घेतला आहे. या लाटेत तर एक वेळ अशी होती, की स्मशानभूमीत मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नव्हती. अंत्यविधीसाठी मृतांच्या नातेवाइकांना शव घेऊन काही तास प्रतीक्षा करावी लागत होती. ही स्थिती भुसावळकरांनी अनुभवली आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने एक दिलासादायक चित्र तालुक्यात आहे.

----

पाच दिवसातील बाधित व सक्रिय रुग्ण

३० जून --- ० --- ४७

१ जुलै --- ४----४८

२ जुलै ---१----४६

३ जुलै ---१----४२

४ जुलै ---०---३९

-----

आतापर्यंतचे लसीकरण

कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत आहे; मात्र लसीकरणावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तालुक्यात आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ४३ हजार ६९१ एवढी आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १६ हजार ४४५ एवढी आहे. आतापर्यंत एकूण ६० हजार १३६ बाधितांनी लस घेतली आहे. लसीकरण वाढवावे व त्यासाठी केंद्रांची संख्याही वाढवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

-----

नियम पाळले जावेत

कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असली तरी शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी काटेकाेर करणे गरजेचे आहे. यात नागरिकांचाही जास्तीत जास्त सहभाग असणे गरजेेचे आहे. व्यापारी पेठा शनिवार व रविवार बंद असतात; मात्र अन्य दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू असतात. याचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे, तसेच मास्क लावणे, सॅनिटाईझरचा वापर याकडेही नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे असून, यावर पालिका तसेच पोलीस प्रशासनाने काटेकोर पालन करायला लावणे गरजेचे आहे. कारण अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही मास्क न लावता फिरताना दिसतात. त्यावर गांभीर्याने लक्ष दिले जाणे आवश्यक आहे.