शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

‘जंक्शन’ ची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST

रेल्वेच्या माध्यमातून अवघ्या देशाला जोडणारे शहर म्हणून भुसावळ जंक्शनची ओळख आहे. देशातील बहुतांश सर्वच भागातून गाड्या येथे येत असल्यामुळे ...

रेल्वेच्या माध्यमातून अवघ्या देशाला जोडणारे शहर म्हणून भुसावळ जंक्शनची ओळख आहे. देशातील बहुतांश सर्वच भागातून गाड्या येथे येत असल्यामुळे विविध भागातून, राज्यातून नागरिक येथे येतात व काही काळ थांबल्यानंतर पुढील प्रवासास येथून रवाना होतात. त्यामुळे प्रचंड गर्दी या रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी असते. तर काही परदेशी पर्यटकही येथे येऊन अजिंठा व अन्य पर्यंटनाच्या ठिकाणी रवाना होत असतात.

दहशत संपली, पण...

रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाच्या या शहरात गेल्या वर्षी पहिल्या लाटेत व आता दुसऱ्या लाटेत भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. देान लाटेत मिळून येथे आजअखेर १३ हजार २०१ बाधित येथे आढळून आले आहेत. तर ३३५ जणांचा कोेरोनाने बळी घेतला आहे. या लाटेत तर एक वेळ अशी होती, की स्मशानभूमीत मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नव्हती. अंत्यविधीसाठी मृतांच्या नातेवाइकांना शव घेऊन काही तास प्रतीक्षा करावी लागत होती. ही स्थिती भुसावळकरांनी अनुभवली आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने एक दिलासादायक चित्र तालुक्यात आहे.

----

पाच दिवसातील बाधित व सक्रिय रुग्ण

३० जून --- ० --- ४७

१ जुलै --- ४----४८

२ जुलै ---१----४६

३ जुलै ---१----४२

४ जुलै ---०---३९

-----

आतापर्यंतचे लसीकरण

कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत आहे; मात्र लसीकरणावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तालुक्यात आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ४३ हजार ६९१ एवढी आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १६ हजार ४४५ एवढी आहे. आतापर्यंत एकूण ६० हजार १३६ बाधितांनी लस घेतली आहे. लसीकरण वाढवावे व त्यासाठी केंद्रांची संख्याही वाढवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

-----

नियम पाळले जावेत

कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असली तरी शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी काटेकाेर करणे गरजेचे आहे. यात नागरिकांचाही जास्तीत जास्त सहभाग असणे गरजेेचे आहे. व्यापारी पेठा शनिवार व रविवार बंद असतात; मात्र अन्य दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू असतात. याचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे, तसेच मास्क लावणे, सॅनिटाईझरचा वापर याकडेही नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे असून, यावर पालिका तसेच पोलीस प्रशासनाने काटेकोर पालन करायला लावणे गरजेचे आहे. कारण अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही मास्क न लावता फिरताना दिसतात. त्यावर गांभीर्याने लक्ष दिले जाणे आवश्यक आहे.