शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

आंदोलने झाली ‘अनलॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात अनलॉक होऊन आता दहा दिवस उलटले आहेत. याच दहाव्या दिवशी सरकारविरोधात चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात अनलॉक होऊन आता दहा दिवस उलटले आहेत. याच दहाव्या

दिवशी सरकारविरोधात चार विविध संस्था आणि संघटनांनी जिल्हाधिकारी

कार्यालयासमोर आंदोलन केले. आदिवासी संघर्ष समितीने आदिवासी विकास

विभागाच्या ७ जूनच्या आदेशाची होळी केली. तर मनपा मार्केटमधील

गाळेधारकांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द

केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आंदोलन

केले. तसेच कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सीटूने आंदोलन केले.

आदिवासी संघर्ष समिती

आदिवासी संघर्ष समितीने राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने

राज्यातील १ कोटी आदिवासींच्या विरोधात ७ जून रोजी आदेश काढल्याचा आरोप

करीत तो रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात

आले. तसेच आदिवासी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या

आंदोलनाची होळी केली. या निवेदनात म्हटले की, आदिवासी विभागातच

आदिवासींवर अन्याय करण्याचे धोरण हाती घेतले जात आहे. तसेच यातील अनेक

मुद्दे हे समितीच्या कार्यकक्षेच्या बाहेर असल्याचेही त्यांनी निवेदनात

म्हटले आहे. या वेळी ॲड. गणेश सोन‌वणे, डॉ. शांताराम सोनवणे, प्रल्हाद

सोनवणे, नितीन कांडेलकर, सुरेश नन्नवरे, मंगल कांडेलकर, जगदीश सोनवणे,

मालती तायडे, प्रदीप धायडे, सोपान कोळी, मनोहर कोळी, सागर सोनवणे, समाधान

मोरे, संजय कांडेलकर, संतोष कोळी, संजय कोळी, योगेश कोळी आदी उपस्थित होते.

समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख मोईनोद्दिन इक्बाल यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, केंद्र शासनाने चुकीच्या धोरणांनी जनतेची दिशाभूल केली आहे. इंधन, गॅस, पेट्रोल, डिझेल आणि खाद्य तेलात भरमसाट दरवाढ केली आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीदेखील समाजवादी पार्टीने या निवेदनात केली आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २८ हजार ओबीसींच्या हक्काच्या जागांवर घाला घातला जाणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने ओबीसींच्या हिताचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आंदोलन केले. त्या वेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मागणीचे निवेदनदेखील देण्यात आले. या वेळी शालिग्राम मालकर, किसनराव जोर्वेकर, वसंत पाटील, सतीश महाजन, ज्ञानेश्वर महाजन, संतोष माळी, भगवान महाजन आदी उपस्थित होते.